शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

गांधीनगरच्या व्यापाऱ्याचे अपहरण

By admin | Updated: January 8, 2016 01:29 IST

चौघांचे कृत्य : तपासासाठी पोलीस पथके रवाना; गुन्ह्याची नोंद नाही

गांधीनगर : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी गांधीनगर बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी श्यामलाल कन्हैयालालाल निरंकारी (रा. निरंकारी कॉलनी, वळिवडे, ता. करवीर) यांचे गुरुवारी पहाटे अज्ञातांनी अपहरण केले. तावडे हॉटेल परिसरात हा प्रकार घडला. अल्टो कारने आलेल्या चौघांनी अपहरण केल्याचे समजते. या घटनेची गांधीनगर पोलिसांत नोंद नसली तरी अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके निपाणी, बेळगाव, मिरज, म्हैशाळ येथे रवाना झाली आहेत.गांधीनगर बाजारपेठेत श्यामलाल यांचे होजिअरीचे दुकान आहे. निरंकारी ट्रस्टमध्ये योगदान दिलेले श्यामलाल सेवाव्रती आहेत. नेहमीप्रमाणे पहाटे तावडे हॉटेल परिसरात ते फिरायला गेले असता पाळत ठेवून असलेल्या चौघाजणांनी त्यांना मारुती आल्टो कारमध्ये जबरदस्तीने बसविले व पोबारा केला. याबाबतची माहिती घटना पाहणाऱ्यांनी (र समजताच निरंकारी यांच्या घरी वरिष्ठ पोलिस अधिकारी आले. त्यांनी सर्व माहिती घेताच निपाणी, बेळगाव म्हैशाळ, मिरज येथे पोलिसांची पथके रवाना केली. रात्री उशिरापर्यंत अपहरणकर्ते सापडले नव्हते. तावडे हॉटेल परिसरात असलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यामधील फुटेजवरून तपास सुरू आहे. दरम्यान, अपहरणकर्त्यांचा शोध बेळगाव पोलिसही घेत आहेत. याबबत रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलिसांत फिर्याद दाखल झाली नव्हती. तपासाबाबत कमालीची गोपनियता पोलिसांनी बाळगली आहे.गांधीनगरचे सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड अपहरणकर्त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)दोन कोटींच्या खंडणीची मागणीअपहरण झालेल्या श्यामलाल निरंकारी यांचे अपहरण झाल्याचे वृत्त पसरताच त्यांच्या घरासमोर जमाव जमला. याचवेळी निरंकारी कुटुंबीयांना अपहरणकर्त्यांचा फोन आला. अपहरणकर्त्यांनी श्यामलाल यांच्या सुटकेसाठी दोन कोटी रुपये द्या अन्यथा तुमच्या माणसाचे बरे-वाईट होईल, पोलिसांत गेला तर याद राखा, अशी धमकी दिल्याची चर्चा घरासमोरील जमावात होती.दोन वर्षांतील तिसरी घटना गेल्या दीड ते दोन वर्षांतील ही गांधीनगर बाजारपेठेतील अपहरणाची तिसरी घटना असल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या छायेखाली आहे. निरंकारी कुटुंबीयांना येणाऱ्या धमक्यांमुळे ते चिंताग्रस्त आहेत.