शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

‘आप’कडून शासनास प्रतीकात्मक फास

By admin | Updated: June 9, 2015 01:19 IST

थाळी व घंटानाद आंदोलन : सरसकट एकरी २५ हजार पीककर्ज देण्याची मागणी

कोल्हापूर : एकरी २५ हजार रुपये पीककर्ज सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यावे, या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सोमवारी आम आदमी पार्टीतर्फे थाळी व घंटानाद करण्यात आला. शासनाचा निषेध करणारा प्रतीकात्मक फास न स्वीकारल्यामुळे शासनासह निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचाही निषेध करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकाला तो अडकविण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी शासनाच्या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. एकरी २५ हजार रुपये पीक कर्ज सरसकट सर्वच शेतकऱ्यांना मिळावे; उसाला, कापसाला व सोयाबीनला स्वामिनाथन समिती अहवालानुसार उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा एवढा हमीभाव द्यावा, अशी मागणी केंद्र व राज्य शासनाकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी घंटा व थाळीनाद केला. शासनाचे प्रतिनिधी या नात्याने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रतीकात्मक फास स्वीकारावा, अशी मागणी केली. ती अमान्य केल्याने आंदोलकांनी शासनाबरोबरच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचाही निषेध नोंदवीत सोबत आणलेले चार फास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकाला अडकविले. यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.‘आप’ने १७ ते २४ मे २०१५ या काळात मराठवाडा व विदर्भातील १०० गावांत जाऊन शेतकरी व शेतमजुरांशी संवाद साधला. यावेळी ६४ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी दिल्या असून, त्याबाबतची गांभीर्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. तरीही देवेंद्र फडणवीस सरकार हातावर हात धरून बसले आहे. सरकारने सर्व शेतकऱ्यांना एकरी २५००० रुपये नव्याने कर्ज द्यावे. उसाला ‘एफआरपी’प्रमाणे भाव देण्यात यावा. दुधाला योग्य भाव मिळेल अशी व्यवस्था करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात जिल्हा संयोजक नारायण पोवार, नाथाजीराव पोवार, संदीप देसाई, मृणालिनी इंगवले, भिकाजी कांबळे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)