शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आजरा पाणीपुरवठा योजना ‘पांढरा’ हत्ती

By admin | Updated: June 2, 2017 00:44 IST

आजरा पाणीपुरवठा योजना ‘पांढरा’ हत्ती

लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : ३७ वर्षांपूर्वी आजऱ्याचे तत्कालीन सरपंच काशिनाथअण्णा चराटी यांच्या प्रयत्नातून हिरण्यकेशी नदीच्या पाण्यावर आधारित आजरा शहराकरिता नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. पुन्हा २००२ मध्ये नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. प्रत्यक्षात २००८ मध्ये योजना कार्यान्वित झाली. सद्य:स्थितीला वारंवार होणाऱ्या गळतीमुळे ग्रामपंचायतीचे लाखो रुपये गळतीच्या दुरुस्तीवर व वीजबिलापोटी खर्च होत असून हा ‘पांढरा’ हत्ती पोसताना ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोलमडत असून नवीन पाणीपुरवठा योजनेची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.३५ वर्षांपूर्वी आजरा शहर एका विशिष्ट मर्यादित भागात वसलेले होते. त्यावेळी चराटी यांनी हिरण्यकेशी नदीवर व्हिक्टोरिया पुलाच्या खालील बाजूस बंधारा बांधून शहराकरिता नळ पाणीपुरवठा योजना सुरू केली. कालांतराने शहराचा विस्तार व लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. सुरुवातीला सातशे कनेक्शन असणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेचे आज सुमारे सव्वा दोन हजार कनेक्शनधारक आहेत.मूळ शहरामध्ये विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने २००० सालापर्यंत पहिली योजना व्यवस्थित सुरू होती. त्यानंतर मात्र उपनगरांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने नवीन योजनेची गरज भासू लागली. स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून २००३ मध्ये सव्वादोन कोटी रुपयांच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली. या योजनेत अनेक त्रुटी राहिल्या. २००९ मध्ये आजरा शहराची लक्ष्मी यात्रा असल्याने घाईगडबडीने योजनेचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण न होताच योजनेतून शहराला पाणीपुरवठा सुरू झाला. चित्री नदीवर ज्या ठिकाणी योजनेचे जॅकवेल आहे मुळातच तो भाग उताराचा असल्याने चित्री प्रकल्पातून उन्हाळ्यात पाणी सोडल्यानंतर नदी प्रवाहातून वाहत असतानाच जॅकवेलमध्ये पाणी व इतर वेळी पात्र कोरडे अशी परिस्थिती बनते.जुन्याच टाक्या, जुनीच पाईपलाईन आजही असल्याने टाक्या व पाईपलाईनला होणाऱ्या गळतीतून लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसते. चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन टाकल्याने काही भागात प्रचंड दाबाने पाणी, तर काही वस्त्यांना अगदी दोन-चार घागरी पाणी मिळेल एवढ्याच दाबाने पाणी अशी विसंगती शहरात ठिकठिकाणी दिसते. ठिकठिकाणी मोठ्या गळत्या असल्याने पाणी योजनेच्या मोटर्स दिवस-रात्र चालू ठेवाव्या लागत आहेत. परिणामी भरमसाट येणारी वीज बिले, मोटर दुरुस्ती व गळत्या काढण्याकरिता येणारा खर्च ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाशी तुलना करता आवाक्याबाहेरचा आहे.आता चित्री प्रकल्पामधून सायफन पद्धतीने शहराला नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरज आहे. पुढील २५ वर्षांत शहरात होणाऱ्या संभाव्य नवीन वसाहती, औद्योगिकरणात होणारी वाढ याचाही याकरिता गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. सायफन पद्धतीने पाणीपुरवठा झाल्यास विद्युत खर्चातही निश्चित बचत होणार आहे.