शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
3
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
4
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
5
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
6
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
7
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
8
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
9
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
10
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
11
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
12
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
13
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
14
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
15
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
16
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
17
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
18
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
19
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
20
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं

नवे ९९८ रुग्ण तर २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात नव्या ९९८ ...

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात नव्या ९९८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इतर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.

कोल्हापूर शहरामध्ये २३६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, नगरपालिका क्षेत्रात १३६ रुग्ण आढळले आहेत. अन्य तालुक्यांचा विचार करता हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १२८ तर करवीर तालुक्यात १०६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १६५७ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २५७२ जणांचे स्राव तपासणीसाठी देण्यात आले आहेत. १५६९ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, सध्या ६२१७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

चौकट

कोल्हापुरातील सहा जणांचा मृत्यू

कोल्हापूर

संभाजीनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय पुरुष, टाकाळा येथील ३२ वर्षीय महिला, पंचशील कॉलनी पाचगाव येथील ८५ वर्षीय महिला, कसबा बावडा येथील उलपे मळा येथील ५८ वर्षीय पुरुष

इचलकरंजी

जुना चंदूर रोड येथील ६३ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष

हातकणंगले

तारदाळ येथील ४६ वर्षीय पुरुष, हेर्ले येथील ६६ वर्षीय महिला, पारगाव येथील ३१ वर्षीय महिला

आजरा

उत्तूर येथील ५५ वर्षीय पुरुष,मानेवाडी येथील ६४ वर्षीय महिला

शाहूवाडी

गोगवे येथील ४७ वर्षीय पुरुष

कागल

कागल येथील ६५ वर्षीय महिला.

गडहिंग्लज

महागाव येथील ५१ वर्षीय महिला

इतर जिल्हे

भालेवाडी, सातारा येथील ३८ वर्षीय पुरुष, कोयनानगर पाटण येथील ४७ वर्षीय पुरुष, कसूप सडा रत्नागिरी येथील ६७ वर्षीय पुरुष, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील ७४ वर्षीय महिला, सायन मुंबई येथील ६७ वर्षीय महिला,

चौकट

अन्य जिल्ह्यातील तब्बल १११ बाधित

कोल्हापूर हे वैद्यकीयदृष्ट्या एक चांगले शहर म्हणून विकसित होत आहे. त्यामुळेच बेळगाव जिल्ह्यातील निपाणीपासून ते सिंधुदुर्ग, सांगली, सातारा इथंपासून महाराष्ट्रासह बाहेरच्या शहरांमधूनही नागरिक येथे उपचारासाठी येतात. शुक्रवारी तब्बल १११ अशा इतर जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरमधील अनेक नोकरदार किंवा विवाहित मुली आपल्या आई वडिलांना उपचारासाठी कोल्हापुरात दाखल करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील बाधितांची आणि मृतांचीही संख्या जास्त आहे.