शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

नवे ९९८ रुग्ण तर २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात नव्या ९९८ ...

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात नव्या ९९८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इतर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.

कोल्हापूर शहरामध्ये २३६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, नगरपालिका क्षेत्रात १३६ रुग्ण आढळले आहेत. अन्य तालुक्यांचा विचार करता हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १२८ तर करवीर तालुक्यात १०६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १६५७ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २५७२ जणांचे स्राव तपासणीसाठी देण्यात आले आहेत. १५६९ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, सध्या ६२१७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

चौकट

कोल्हापुरातील सहा जणांचा मृत्यू

कोल्हापूर

संभाजीनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय पुरुष, टाकाळा येथील ३२ वर्षीय महिला, पंचशील कॉलनी पाचगाव येथील ८५ वर्षीय महिला, कसबा बावडा येथील उलपे मळा येथील ५८ वर्षीय पुरुष

इचलकरंजी

जुना चंदूर रोड येथील ६३ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष

हातकणंगले

तारदाळ येथील ४६ वर्षीय पुरुष, हेर्ले येथील ६६ वर्षीय महिला, पारगाव येथील ३१ वर्षीय महिला

आजरा

उत्तूर येथील ५५ वर्षीय पुरुष,मानेवाडी येथील ६४ वर्षीय महिला

शाहूवाडी

गोगवे येथील ४७ वर्षीय पुरुष

कागल

कागल येथील ६५ वर्षीय महिला.

गडहिंग्लज

महागाव येथील ५१ वर्षीय महिला

इतर जिल्हे

भालेवाडी, सातारा येथील ३८ वर्षीय पुरुष, कोयनानगर पाटण येथील ४७ वर्षीय पुरुष, कसूप सडा रत्नागिरी येथील ६७ वर्षीय पुरुष, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील ७४ वर्षीय महिला, सायन मुंबई येथील ६७ वर्षीय महिला,

चौकट

अन्य जिल्ह्यातील तब्बल १११ बाधित

कोल्हापूर हे वैद्यकीयदृष्ट्या एक चांगले शहर म्हणून विकसित होत आहे. त्यामुळेच बेळगाव जिल्ह्यातील निपाणीपासून ते सिंधुदुर्ग, सांगली, सातारा इथंपासून महाराष्ट्रासह बाहेरच्या शहरांमधूनही नागरिक येथे उपचारासाठी येतात. शुक्रवारी तब्बल १११ अशा इतर जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरमधील अनेक नोकरदार किंवा विवाहित मुली आपल्या आई वडिलांना उपचारासाठी कोल्हापुरात दाखल करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील बाधितांची आणि मृतांचीही संख्या जास्त आहे.