शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

नवे ९९८ रुग्ण तर २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात नव्या ९९८ ...

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात नव्या ९९८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इतर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.

कोल्हापूर शहरामध्ये २३६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, नगरपालिका क्षेत्रात १३६ रुग्ण आढळले आहेत. अन्य तालुक्यांचा विचार करता हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १२८ तर करवीर तालुक्यात १०६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १६५७ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २५७२ जणांचे स्राव तपासणीसाठी देण्यात आले आहेत. १५६९ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, सध्या ६२१७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

चौकट

कोल्हापुरातील सहा जणांचा मृत्यू

कोल्हापूर

संभाजीनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय पुरुष, टाकाळा येथील ३२ वर्षीय महिला, पंचशील कॉलनी पाचगाव येथील ८५ वर्षीय महिला, कसबा बावडा येथील उलपे मळा येथील ५८ वर्षीय पुरुष

इचलकरंजी

जुना चंदूर रोड येथील ६३ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष

हातकणंगले

तारदाळ येथील ४६ वर्षीय पुरुष, हेर्ले येथील ६६ वर्षीय महिला, पारगाव येथील ३१ वर्षीय महिला

आजरा

उत्तूर येथील ५५ वर्षीय पुरुष,मानेवाडी येथील ६४ वर्षीय महिला

शाहूवाडी

गोगवे येथील ४७ वर्षीय पुरुष

कागल

कागल येथील ६५ वर्षीय महिला.

गडहिंग्लज

महागाव येथील ५१ वर्षीय महिला

इतर जिल्हे

भालेवाडी, सातारा येथील ३८ वर्षीय पुरुष, कोयनानगर पाटण येथील ४७ वर्षीय पुरुष, कसूप सडा रत्नागिरी येथील ६७ वर्षीय पुरुष, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील ७४ वर्षीय महिला, सायन मुंबई येथील ६७ वर्षीय महिला,

चौकट

अन्य जिल्ह्यातील तब्बल १११ बाधित

कोल्हापूर हे वैद्यकीयदृष्ट्या एक चांगले शहर म्हणून विकसित होत आहे. त्यामुळेच बेळगाव जिल्ह्यातील निपाणीपासून ते सिंधुदुर्ग, सांगली, सातारा इथंपासून महाराष्ट्रासह बाहेरच्या शहरांमधूनही नागरिक येथे उपचारासाठी येतात. शुक्रवारी तब्बल १११ अशा इतर जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरमधील अनेक नोकरदार किंवा विवाहित मुली आपल्या आई वडिलांना उपचारासाठी कोल्हापुरात दाखल करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील बाधितांची आणि मृतांचीही संख्या जास्त आहे.