शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

९५ टक्के आमदार, खासदारांनी दिव्यांग निधी खर्च केला नाही : बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:08 IST

कोल्हापूर : खासदार-आमदार फंडातील १० टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक असताना, ९५ टक्के लोकप्रतिनिधींनी हा निधीच खर्च केला ...

कोल्हापूर : खासदार-आमदार फंडातील १० टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक असताना, ९५ टक्के लोकप्रतिनिधींनी हा निधीच खर्च केला नसल्याचे वास्तव आहे. या विरोधात ९ आॅगस्टला दिल्लीत मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी रविवारी येथे केली.प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे दिव्यांग महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दौलत देसाई होते. प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, डॉ. बी. सी. केम्पीपाटील, ‘प्रहार’चे अध्यक्ष बापूसाहेब काणे, आदींची होती.दिव्यांग पाच टक्के कल्याण निधीचा लाभ दिव्यांगांना दिल्याबद्दल कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषदेला ‘दिव्यांग शुभचिंतक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. आमदार कडू यांच्या हस्ते आयुक्त कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच रुग्णदूत बंटी सावंत, देवदत्त माने यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.बच्चू कडू म्हणाले, गावातील पशंूची नोंद होते, तर मग दिव्यांगांची का नाही? यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने शासन निर्णय काढावा, असा शेरा मारूनही तब्बल एक वर्ष त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यासाठी आंदोलन करावे लागले. त्यानंतर काही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी सहकार्य करून दिव्यांगांना मदत करण्याचा प्रयत्न केला. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी ९ आॅगस्टला दिल्लीत मोर्चा काढण्यात येईल. यामध्ये कोल्हापूरचे योगदान मोठे असेल.देशातील पाच खासदारांकडून निधी खर्चदेशातील ५०० खासदारांपैकी फक्त पाच खासदारांनीच दिव्यांगांसाठीचा १० टक्के निधी खर्च केला आहे, हे धक्कादायक असल्याचे कडू म्हणाले.आंदोलनातून ३२ निर्णय काढण्यास भाग पाडलेदिव्यांगांसाठी १९९५ नंतर कोणताही शासन निर्णय निघाला नाही; परंतु त्यानंतर आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला तब्बल ३२ शासन निर्णय करण्यास भाग पाडले. यासाठी प्रसंगी गुन्हेही दाखल झाले, असे कडू यांनी सांगितले.थेट मानधन द्यावेमहापालिकेने दिव्यांगांसाठी उपकरणांऐवजी थेट मानधन द्यावे. यासाठी दिव्यांग बांधव नगरसेवकांना भेटून पत्र देतील; त्यामुळे आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती कडू यांनी केली. कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या छत्रछायेखाली काम करण्यापेक्षा दिव्यांगांचा सेवक म्हणून काम करण्यात आनंद आहे, असे कडू यांनी सांगितले.