शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

कोरोना अटी पाळत ९ लाख ३३ हजार जणांना जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर- कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करत कोल्हापूर जिल्ह्यात ९ लाख ३३ ...

कोल्हापूर- कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करत कोल्हापूर जिल्ह्यात ९ लाख ३३ हजार ७०३ बालक आणि युवकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १ ते ८ मार्च २०२१ या कालावधीत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अजूनही ज्या गावांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तेेथे ती पूर्ण करण्यात येणार आहे.

जंत संसर्गाचा त्रास होऊ नये यासाठी दरवर्षी शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने जंतनाशक गोळ्यांचे मोफत वितरण करण्यात येते. शाळा, अंगणवाड्यांमध्येच दरवर्षी या गोळ्या दिल्या जातात. परंतु सध्या शाळा, अंगणवाड्या सुरू नसल्याने अखेर घरोघरी जाऊन या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे.

१ ते २ वर्ष वयाच्या बालकाला एल्बेंडेझॉल ही ४०० मिलिग्रॅमची अर्धी गोळी देण्यात येते. तर २ ते १९ वर्षे वयाच्या मुला, मुलींना पूर्ण गोळी देण्यात येते. संसर्ग झालेले किंवा न झालेले बालक तसेच प्रौढ व्यक्ती या दोघांसाठी एल्बेंडेझॉल हे सुरक्षित औषध असून मातीतून संक्रमित झालेल्या कृमीरोगावर उपाय म्हणून ते जगभरातील लोकांना दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशा वर्कर्स, आरोग्यसेवक, सेविका, अंगणवाडी कर्मचारी यांच्यावतीने हे गोळ्यांचे वाटप करण्यत येत आहे.

चौकट

अ.न. संस्था १ ते ६ वयोगटातील अपेक्षित ६ ते १९ वयोगटातील अपेक्षित एकूण लाभार्थी

१ कोल्हापूर महापालिका २५४५६ ९०५७४ १,१६,०३०

२ जिल्हा शल्य चिकित्सक

अंतर्गत कार्यक्षेत्र २९५५२ १,१९,२२८ १,४८,७८९

३ ग्रामीण कार्यक्षेत्र १,९८,०८३ ४,७०,८१० ६,६८,८९३

एकूण ९,३३,७०३

कोट

कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून सध्या घरोघरी या गोळ्यांचे वितरण केले जात आहे. केवळ गोळ्या घरात न देता त्या प्रत्यक्ष त्या मुलाने घेतल्याची खात्री केली जात आहे. त्यामुळे प्रक्रियेला थोडा वेळ लागत असला तरी ती पूर्ण केली जात आहे.

डॉ.योगेश साळे

जिल्हा आरोग्य अधिकारी