शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

कर्जमाफीतील ९१०० खातेदार अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:08 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारकडून आलेल्या कर्जमाफीच्या चौथ्या यादीतील २००९८ पैकी तब्बल ९१०० खातेदार अपात्र ठरले आहेत. पहिल्या तीन याद्यांत ज्यांना लाभ मिळाला अशी सुमारे पाच हजार खाती पुन्हा आल्याने हा गोंधळ उडाला आहे. त्याचबरोबर मूळ रकमेपेक्षा कमी रकमेसह इतर त्रुटींमुळे हे खात्यांचा जमा-खर्च होऊ शकलेला नाही. ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारकडून आलेल्या कर्जमाफीच्या चौथ्या यादीतील २००९८ पैकी तब्बल ९१०० खातेदार अपात्र ठरले आहेत. पहिल्या तीन याद्यांत ज्यांना लाभ मिळाला अशी सुमारे पाच हजार खाती पुन्हा आल्याने हा गोंधळ उडाला आहे. त्याचबरोबर मूळ रकमेपेक्षा कमी रकमेसह इतर त्रुटींमुळे हे खात्यांचा जमा-खर्च होऊ शकलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्णातील ९२ हजार खातेदारांना १७४ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.कर्जमाफीच्या याद्यातील घोळ शेतकºयांना नवीन नाही. पहिल्या यादीपासून काही ना काही गोंधळ सुरूच आहे. ज्यांनी कर्जमाफीचा अर्जच केलेला नाही, अशा खातेदार शेतकºयांची नावे यादीत होती. जिल्ह्यातून जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न २ लाख ५७ हजार थकबाकीदार व नियमित परतफेड करणाºया खातेदारांनी राज्य सरकारकडे कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. या अर्जाची कर्जमाफीच्या निकषांनुसार छाननी होऊन पात्र खातेदारांची नावे टप्प्या-टप्प्याने जाहीर करण्यात येत आहेत. पहिल्या तीन याद्यांच्या माध्यमातून कशीबशी ८१ हजार १२० खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.कर्जमाफीचा लाभ मिळण्यास होत असलेला विलंब, याद्यांतील गोंधळावरून विरोधी पक्षांनी सरकारविरोधात रान उठवले होते. हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीवरून सरकारची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांनी आखली होती. त्यामुळे सरकारने घाईगडबडीने कर्जमाफीच्या याद्या जिल्हास्तरावर पाठविण्याचा प्रयत्न केला.त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्णासाठी कर्जमाफीची तब्बल ७९ हजार खातेदारांची जम्बो चौथी यादी आली. या यादीने तर कमाल केली. आमदार, माजी खासदारांची नावे असल्याने सरकारवर ही यादी मागे घेण्याची नामुष्की ओढावली. चार-पाच दिवसाने सुधारित २० हजार ९८ खातेदारांची यादी जिल्हा बँकेला आली आणि त्याची तपासणी सुरू झाली. ज्या शेतकºयांना अगोदर लाभ झाला आहे, त्याच शेतकºयांची नावे पुन्हा चौथ्या यादीत आली आहेत. तब्बल ५ हजार अशा खात्यांचा समावेश असल्याने ही खाती तपासणीत अपात्र ठरविण्यात आली. एखाद्या शेतकºयाची दोन खाती आहेत, त्यातील एका खात्याचे पैसे आले आणि दुसºया नाही. अशा खात्यांचा जमा-खर्च करता येत नसल्याने तशी नावेही पुन्हा आयटी विभागाकडे पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे तब्बल ९१०० खातेदार अपात्र ठरले आहेत. जिल्हा बँकेने १० हजार ९०८ खात्यांचा जमा-खर्च पूर्ण केला असून एकरकमी परतफेड योजनेतील १२८ खात्यांचा अद्याप जमा-खर्च करायचा आहे.पावणेदोन लाख शेतकºयांना प्रतीक्षाराज्य सरकारने जून २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा करून पात्र शेतकºयांकडून प्रस्ताव मागविले. त्यानुसार जिल्ह्यातून अडीच लाखांहून अधिक शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले. गेल्या सहा महिन्यांत केवळ ९२ हजार २८ खातेदारांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. त्यामुळे अजून सुमारे पावणेदोन लाख खातेदारांना आपल्या नावाची प्रतीक्षा आहे.असा झाला चौथ्या यादीचा जमा-खर्चयादीतील खातेदारांची संख्या२००९८ (२८ कोटी)पात्र थकबाकीदार१५६३(५ कोटी २१ लाख)नियमित परतफेड करणारे ९३४५(१३ कोटी ४६ लाख)