शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कर्जमाफीतील ९१०० खातेदार अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:08 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारकडून आलेल्या कर्जमाफीच्या चौथ्या यादीतील २००९८ पैकी तब्बल ९१०० खातेदार अपात्र ठरले आहेत. पहिल्या तीन याद्यांत ज्यांना लाभ मिळाला अशी सुमारे पाच हजार खाती पुन्हा आल्याने हा गोंधळ उडाला आहे. त्याचबरोबर मूळ रकमेपेक्षा कमी रकमेसह इतर त्रुटींमुळे हे खात्यांचा जमा-खर्च होऊ शकलेला नाही. ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारकडून आलेल्या कर्जमाफीच्या चौथ्या यादीतील २००९८ पैकी तब्बल ९१०० खातेदार अपात्र ठरले आहेत. पहिल्या तीन याद्यांत ज्यांना लाभ मिळाला अशी सुमारे पाच हजार खाती पुन्हा आल्याने हा गोंधळ उडाला आहे. त्याचबरोबर मूळ रकमेपेक्षा कमी रकमेसह इतर त्रुटींमुळे हे खात्यांचा जमा-खर्च होऊ शकलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्णातील ९२ हजार खातेदारांना १७४ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.कर्जमाफीच्या याद्यातील घोळ शेतकºयांना नवीन नाही. पहिल्या यादीपासून काही ना काही गोंधळ सुरूच आहे. ज्यांनी कर्जमाफीचा अर्जच केलेला नाही, अशा खातेदार शेतकºयांची नावे यादीत होती. जिल्ह्यातून जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न २ लाख ५७ हजार थकबाकीदार व नियमित परतफेड करणाºया खातेदारांनी राज्य सरकारकडे कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. या अर्जाची कर्जमाफीच्या निकषांनुसार छाननी होऊन पात्र खातेदारांची नावे टप्प्या-टप्प्याने जाहीर करण्यात येत आहेत. पहिल्या तीन याद्यांच्या माध्यमातून कशीबशी ८१ हजार १२० खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.कर्जमाफीचा लाभ मिळण्यास होत असलेला विलंब, याद्यांतील गोंधळावरून विरोधी पक्षांनी सरकारविरोधात रान उठवले होते. हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीवरून सरकारची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांनी आखली होती. त्यामुळे सरकारने घाईगडबडीने कर्जमाफीच्या याद्या जिल्हास्तरावर पाठविण्याचा प्रयत्न केला.त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्णासाठी कर्जमाफीची तब्बल ७९ हजार खातेदारांची जम्बो चौथी यादी आली. या यादीने तर कमाल केली. आमदार, माजी खासदारांची नावे असल्याने सरकारवर ही यादी मागे घेण्याची नामुष्की ओढावली. चार-पाच दिवसाने सुधारित २० हजार ९८ खातेदारांची यादी जिल्हा बँकेला आली आणि त्याची तपासणी सुरू झाली. ज्या शेतकºयांना अगोदर लाभ झाला आहे, त्याच शेतकºयांची नावे पुन्हा चौथ्या यादीत आली आहेत. तब्बल ५ हजार अशा खात्यांचा समावेश असल्याने ही खाती तपासणीत अपात्र ठरविण्यात आली. एखाद्या शेतकºयाची दोन खाती आहेत, त्यातील एका खात्याचे पैसे आले आणि दुसºया नाही. अशा खात्यांचा जमा-खर्च करता येत नसल्याने तशी नावेही पुन्हा आयटी विभागाकडे पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे तब्बल ९१०० खातेदार अपात्र ठरले आहेत. जिल्हा बँकेने १० हजार ९०८ खात्यांचा जमा-खर्च पूर्ण केला असून एकरकमी परतफेड योजनेतील १२८ खात्यांचा अद्याप जमा-खर्च करायचा आहे.पावणेदोन लाख शेतकºयांना प्रतीक्षाराज्य सरकारने जून २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा करून पात्र शेतकºयांकडून प्रस्ताव मागविले. त्यानुसार जिल्ह्यातून अडीच लाखांहून अधिक शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले. गेल्या सहा महिन्यांत केवळ ९२ हजार २८ खातेदारांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. त्यामुळे अजून सुमारे पावणेदोन लाख खातेदारांना आपल्या नावाची प्रतीक्षा आहे.असा झाला चौथ्या यादीचा जमा-खर्चयादीतील खातेदारांची संख्या२००९८ (२८ कोटी)पात्र थकबाकीदार१५६३(५ कोटी २१ लाख)नियमित परतफेड करणारे ९३४५(१३ कोटी ४६ लाख)