शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

एजिवडेतील ८२ कुटुंबांना अजूनही भरपाई रक्कम नाही

By admin | Updated: September 15, 2014 23:47 IST

‘वन्यजीव’ची तोकडी तरतूद : ‘राधानगरी’तील स्वेच्छा पुनर्वसन

राधानगरी : राधानगरी अभयारण्यातील स्वेच्छा पुनर्वसनासाठी संमतीपत्र दिलेल्या एजिवडे येथील ११४ पैकी ८२ कुटुंबांना अद्याप भरपाईची रक्कम मिळालेली नाही. वन्यजीव विभागाने तोकडी आर्थिक तरतूद केल्याने ही रक्कम मिळालेली नाही. या योजनेअंतर्गत पुनर्वसन होणारे हे पहिले खेडे आहे.१९८५ मध्ये विस्तारीकरण झालेल्या राधानगरी अभयारण्यातील सुमारे तीस खेड्यांतील ११५६ कुटुंबे बाधित होतात. वन्यप्राण्यांचा होणारा त्रास व वन्यजीव विभागाचे जाचक नियम यामुळे या लोकांनी अभयारण्याबाहेर पुनर्वसनाची मागणी केली. पंधरा वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध करण्यात अडचणी असल्याने शासनस्तरावर केवळ चालढकल सुरू होती. दोन वर्षांपूर्वी शासनाने स्वेच्छा पुनर्वसन योजना जाहीर केली. मात्र, यासाठी असणाऱ्या जाचक अटी व केवळ दहा लाख भरपाई यामुळे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेत एजिवडे या खेड्याने सर्वप्रथम सहभाग घेण्याची तयारी दर्शविली. येथील ११४ कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. यातील ११२ कुटुंबांनी वन्यजीव विभागाला जानेवारी २०१४ मध्ये दानपत्र करून दिले आहे. त्यातील ३३ कुटुंबांनाच भरपाईची रक्कम मिळालेली आहे. सर्वांना ही रक्कम मिळण्यासाठी आणखी दहा कोटींची आवश्यकता आहे. या खेड्यातील लोकांना ही पॅकेजची रक्कम अजून न मिळाल्याने इतर गावांतील लोकांनी याबाबत उत्सुकता दाखवलेली नाही. सध्या निधी उपलब्धतेचा वेग व वेळखाऊ प्रक्रिया याचा विचार केला तर पुनर्वसनाची मागणी केलेल्या सर्व खेड्यांचे पुनर्वसन होण्यास आणखी बरीच वर्षे जाणार आहेत. त्यामुळे अभयारण्याच्या सुरक्षेसाठी पुनर्वसन योजनेचा मूळ उद्देश असफल होणार आहे. (प्रतिनिधी)