शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

‘केडीसीसी’च्या थकीत ७७ कोटींची वसुली

By admin | Updated: July 20, 2016 01:07 IST

माजी संचालकांची ‘जबाबदारी’ हलकी : ‘८८’च्या कारवाईचा फास ढिला

राजाराम लोंढे--कोल्हापूर --जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ४५ माजी संचालक व एका कार्यकारी संचालकांवर निश्चित केलेल्या जबाबदारीचा भार थोडा हलका झाला आहे. गेले वर्षभरात १४७ कोटींपैकी तब्बल ७७ कोटींची वसुली करण्यात संचालकांना यश आल्याने कलम ८८ नुसार संचालकांच्या गळ्याभोवती आवळलेला कारवाईचा फास काहीसा सुटण्यास मदत होणार आहे. माजी संचालकांनी बेकायदेशीर कामे केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बॅँकेने १३ नोव्हेंबर २००९ ला जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून २००२-०३ ते २००६-०७ या कालावधीत नियमबाह्य वाटप केलेले कर्ज व २००६-०७ या काळात सभासदांना बेकायदेशीर दिलेला लाभांश या मुद्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी चौकशी करून सचिन रावल यांनी जबाबदारी निश्चितीची कारवाई केली. ४५ माजी संचालक व एका कार्यकारी संचालकांवर तब्बल १४७ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चितीच्या कारवाईचा २३२ पानांचा अहवाल रावल यांनी २३ जानेवारी २०१५ रोजी विभागीय सहनिबंधकांकडे सादर केला. प्रत्येक संचालकांवर सरासरी सव्वापाच कोटी रुपये जबाबदारी निश्चिती झाली. ही रक्कम १ एप्रिल २००२ पासून १३ टक्के सरळव्याजाने वसूल करण्यात येणार आहे. संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई विभागीय सहनिबंधकांनी सुरू केली होती. पण संचालकांनी न्यायालयात धाव घेतल्याने गेले दीड वर्षे ‘८८’चे भिजत घोंगडे राहिले आहे. सहा वर्षांनंतर जिल्हा बॅँकेची निवडणूक २०१५ मध्ये झाली. यामध्ये पुन्हा तीच मंडळी सत्तेवर आली, पण बरखास्तीमुळे डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा चंग संचालकांनी बांधला. ज्यांच्यामुळे बॅँक अडचणीत आली त्या बड्या धेंडांकडे जाऊन वसुलीची कारवाई सुरू केली. ‘घंटानाद’ वसुली मोहीम राबवून थकबाकीदारांच्या दारात वसुलीसाठी जाणारे राज्यातील पहिले बॅँकेचे संचालक होते. त्याचा परिणामही चांगला झाला आणि वसुली बऱ्यापैकी करण्यात बॅँकेला यश आले. ज्या ६५ सहकारी संस्थांना बेकायदेशीर, विनातारण वाटप केलेल्या संस्थांमुळे १४७ कोटींचा फास संचालकाभोवती आवळला. त्या संस्थांकडील वसुली टार्गेट केले. भुदरगड नागरी पतसंस्था, कोल्हापूर जिल्हा बिजोत्पादक संघ, आदी ४९ लहान-मोठ्या संस्थांची वसुली करण्यात बॅँकेला यश आले. या संस्थांकडून तब्बल ७७ कोटी वसूल झाले असून, अद्याप १६ संस्थांकडे ७० कोटी येणे बाकी आहे. नवीन वटहुकुमामुळे जिल्हा बॅँकेचे संचालक अडचणीत आले आहेत. त्यात ‘८८’चा निर्णय न्यायालयात झाला तर वटहुकुमाची वाट न पाहताच घरी बसावे लागणार असल्याने संचालकांच्या दृष्टीने वसुली महत्त्वाची होती. हा वसुलीची आकडेवारी विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे यांच्या माध्यमातून न्यायालयात सादर केली जाणार आहे. न्यायालयात जमेची बाजू!सध्या उच्च न्यायालयात ‘८८’ची सुनावणी प्रलंबित आहे. जिल्हा बॅँकेच्या संचालकांनी ७७ कोटींची वसुली केल्याने ही बाब न्यायालयात जमेची ठरू शकते. संबंधित संस्थांकडून वसुलीची प्रक्रिया सुरू असताना जबाबदारी निश्चितीची कारवाई कशी? असा मुद्दा संचालकांच्या वतीने उपस्थित केला जाऊ शकतो. हे आहेत मोठे मासेउदयसिंगराव गायकवाड तोडणी वाहतूक संस्थाशेतकरी तंबाखूखरेदी विक्री संघ राधानगरी तालुकामका स्टार्च प्रक्रिया