शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

७५७ अभियंत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: May 22, 2015 00:08 IST

जिल्ह्यातील २० जणांचा समावेश : सेवा खंडित करण्याचा शासन निर्णय; नोकरीसाठी भटकंतीची वेळ येणार

कोल्हापूर : शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत नियुक्त केलेल्या संपूर्ण राज्यातील ७५७ पंचायत व गट अभियंत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. शासनाने मंगळवारी (दि. १९) अचानक त्यांची सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या अभियंत्यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. परिणामी, संबंधित अभियंते हवालदिल झाले आहेत. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी शासनाने कंत्राटी पद्धतीने तालुका पातळीवर गट अभियंता आणि पंचायत स्तरावर पंचायत अभियंता यांची नियुक्ती केली. ग्रामविकास निधी, तेरावा वित्त आयोग निधी, पर्यावरण संतुलित समृद्धी योजना, केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजना यातून गावागावांत होणाऱ्या कामांत तांत्रिक देखभाल करणे, कामे दर्जेदार करून घेणे अशी जबाबदारी या अभियंत्यांवर आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी राज्यात ७५७ कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्वच अभियंते सेवेत आहेत. पंचायत अभियंत्याला दरमहा १६ हजार, तर गट अभियंत्याला १८ हजार मानधनही दिले जाते. (प्रतिनिधी)कालावधी संपण्याआधीच सेवा संपुष्टातअनेक अभियंत्यांनी विविध खासगी कंपन्यांतील नोकरी सोडली आणि अभियंता म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र, कंत्राटी पद्धतीचा ११ महिन्यांचा कालावधी संपण्याआधीच म्हणजे मे २०१५ अखेर सेवा संपुष्टात आणावी, असा आदेश शासनाचे उपसचिव गिरीश भालेराव यांनी काढला आहे. परिणामी संबंधित अभियंत्यांना पुन्हा नोकरीसाठी भटकंती करावी लागणार आहे.शासनाने परीक्षा घेऊन आमची नेमणूक केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १६ पंचायत, तर चार गट अभियंते कार्यरत आहेत. शासनाने अचानक सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा. सेवेत कायम ठेवावे. - किरण परीट, पंचायत अभियंता, शिरोळ