शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

७५७ अभियंत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: May 22, 2015 00:08 IST

जिल्ह्यातील २० जणांचा समावेश : सेवा खंडित करण्याचा शासन निर्णय; नोकरीसाठी भटकंतीची वेळ येणार

कोल्हापूर : शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत नियुक्त केलेल्या संपूर्ण राज्यातील ७५७ पंचायत व गट अभियंत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. शासनाने मंगळवारी (दि. १९) अचानक त्यांची सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या अभियंत्यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. परिणामी, संबंधित अभियंते हवालदिल झाले आहेत. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी शासनाने कंत्राटी पद्धतीने तालुका पातळीवर गट अभियंता आणि पंचायत स्तरावर पंचायत अभियंता यांची नियुक्ती केली. ग्रामविकास निधी, तेरावा वित्त आयोग निधी, पर्यावरण संतुलित समृद्धी योजना, केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजना यातून गावागावांत होणाऱ्या कामांत तांत्रिक देखभाल करणे, कामे दर्जेदार करून घेणे अशी जबाबदारी या अभियंत्यांवर आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी राज्यात ७५७ कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्वच अभियंते सेवेत आहेत. पंचायत अभियंत्याला दरमहा १६ हजार, तर गट अभियंत्याला १८ हजार मानधनही दिले जाते. (प्रतिनिधी)कालावधी संपण्याआधीच सेवा संपुष्टातअनेक अभियंत्यांनी विविध खासगी कंपन्यांतील नोकरी सोडली आणि अभियंता म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र, कंत्राटी पद्धतीचा ११ महिन्यांचा कालावधी संपण्याआधीच म्हणजे मे २०१५ अखेर सेवा संपुष्टात आणावी, असा आदेश शासनाचे उपसचिव गिरीश भालेराव यांनी काढला आहे. परिणामी संबंधित अभियंत्यांना पुन्हा नोकरीसाठी भटकंती करावी लागणार आहे.शासनाने परीक्षा घेऊन आमची नेमणूक केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १६ पंचायत, तर चार गट अभियंते कार्यरत आहेत. शासनाने अचानक सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा. सेवेत कायम ठेवावे. - किरण परीट, पंचायत अभियंता, शिरोळ