शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

७ हजार ४०० शेतकऱ्यांचा ‘सन्मान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 1:09 AM

कोल्हापूर : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांची नोंदणी झाली आहे. यातील सात ...

कोल्हापूर : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांची नोंदणी झाली आहे. यातील सात हजार ४०० शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत ३१ हजार शेतकºयांच्या खात्यांवर पैसे जमा केले जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी येथे सांगितले.केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात झाला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी देसाई व आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते या योजनेंतर्गत दहा शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, यावेळी गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने’च्या मुख्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पहिला हप्ता येत्या गुरुवार (दि. २८) पर्यंत जमा करण्याचा निर्धार आहे. यातील ३१ हजार जणांच्या खात्यावर दोन दिवसांत पैसे जमा केले जातील. या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजारांचे आर्थिक साहाय्य तीन टप्प्यांत देण्यात येणार आहे.आमदार महाडिक म्हणाले, या योजनेत जिल्ह्यातील सर्वच पात्र शेतकरी कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे शेतकºयांच्या जीवनात निश्चितपणे स्थिरता येईल. तसेच प्रशासनाने ही योजना राबविताना येणाºया अडचणी व त्रुटींची तत्काळ पूर्तता करून ही योजना गतिमान करावी.यावेळी प्रमुख उपस्थिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, राधानगरीचे प्रांताधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक पिसाळ, आदींची होती.ज्ञानदेव वाकुरे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी करवीरचेतहसीलदार सचिन गिरी, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, आदींसह अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.योजनेत कोल्हापूरची राज्यात आघाडीया योजनेची जिल्ह्यात गतिमान वाटचाल सुरू असून आतापर्यंत या योजनेस पात्र असणाºया ३ लाख ७६ हजार ४३९ कुटुंबांपैकी तीन लाख एक हजार शेतकरी कुटुंबांची नोंदणी करून पुणे विभागासह किंबहुना राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. सात हजार ४०० शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा केला आहे. उर्वरित सर्व पात्र कुटुंबांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम प्राधान्यक्रमाने जमा केली जाईल. ही रक्कम पात्र शेतकरी कुटुंबांच्याच खात्यावर जमा होण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवला जात आहे, असे देसाई यांनी सांगितले.