शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यात ७० हजार हेक्टर उसावर ‘तांबेरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:56 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले महिनाभर सुरू असलेल्या एकसारख्या पावसाने ऊस पीक पूर्णपणे आकसले आहे. त्यात तांबेराने झडप घातल्याने उसाची वाढच खुंटली आहे. जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक हेक्टरवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी उत्पादन घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.ऊस पिकाची वाढ उन्हात झपाट्याने होते; त्यामुळे जूननंतर ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले महिनाभर सुरू असलेल्या एकसारख्या पावसाने ऊस पीक पूर्णपणे आकसले आहे. त्यात तांबेराने झडप घातल्याने उसाची वाढच खुंटली आहे. जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक हेक्टरवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी उत्पादन घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.ऊस पिकाची वाढ उन्हात झपाट्याने होते; त्यामुळे जूननंतर पावसाची उघडझाप राहिली, तर वाढ चांगली होऊन उसाचा उतारा चांगला मिळतो. जून ते सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस जास्त असला, तरी उघडझाप असायची; पण यंदा गेले सव्वा दोन महिने एकसारखा पाऊस आहे; त्यामुळे जमिनीला वापसा मिळत नाही, याचा परिणाम सर्वच खरीप पिकांवर झाला आहे. या हवामानाचा सर्वाधिक फटका उसाला बसला आहे. उसाच्या सऱ्यांतील पाणी कमी होत नसल्याने वाढ खुंटली आहे. त्यात उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाची तीव्रता इतकी प्रचंड आहे, की अखंड उसाचा प्लॉटच तांबडाभडक दिसत आहे. उसाच्या पानाखाली बघितले की तांबूस रंगाच्या पावडरीचा थर आपणास पाहावयास मिळतो. ‘तांबेरा’ पानातील अन्नद्रव्य शोषून घेत असल्याने खोडाची ताकद कमी होते. सध्या पानांतून खोडात साखर तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, यावेळीच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने वाढीबरोबरच उताराही घटणार आहे.हंगाम दोन महिन्यांवर आला आहे; त्यामुळे आता उसाची उंची फार वाढणार नाही. आता साखर तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.पावसाचा जोर आणि शेतकºयांना घोरसाधारणत: आपल्याकडे १ आॅगस्टपासून उसाच्या आडसाल लावणी सुरू होतात. आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होत असल्याने लावणीच्या उगवणीस मदत होते; पण सध्या पावसाचा जोर वाढल्याने शेतकºयांचा घोर वाढला आहे. लावण केलेल्या उसाचे बियाणे पाण्याखाली गेले, तर कुजण्याची भीती असते.हे करावे शेतकºयांनी :‘दायथेनिअम-४५’ पावडर ३० ग्रॅम त्यात १९ : १९ : १९ खत ७५ ग्रॅम मिसळून फवारणी करावी. उसात फवारणी करताना सगळे औषध अंगावरच पडते, यासाठी खांद्यावर झेंडा घेतल्यासारखा पंपाचा नोजल घेऊन फवारणी करीत सरीतून पुढे सरकत गेल्यास औषधाची फवारणी पानावर होते. अरुंद सरी आणि गच्च पाल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होतो, यासाठी उसाची लावण करतानाच मोठी सरी सोडावी व उसाला पाला सुटतो, त्यावेळी पाला काढून सरी मोकळी ठेवल्यास हवा खेळती राहते.