शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जिल्ह्यात ७० हजार हेक्टर उसावर ‘तांबेरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:56 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले महिनाभर सुरू असलेल्या एकसारख्या पावसाने ऊस पीक पूर्णपणे आकसले आहे. त्यात तांबेराने झडप घातल्याने उसाची वाढच खुंटली आहे. जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक हेक्टरवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी उत्पादन घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.ऊस पिकाची वाढ उन्हात झपाट्याने होते; त्यामुळे जूननंतर ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले महिनाभर सुरू असलेल्या एकसारख्या पावसाने ऊस पीक पूर्णपणे आकसले आहे. त्यात तांबेराने झडप घातल्याने उसाची वाढच खुंटली आहे. जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक हेक्टरवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी उत्पादन घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.ऊस पिकाची वाढ उन्हात झपाट्याने होते; त्यामुळे जूननंतर पावसाची उघडझाप राहिली, तर वाढ चांगली होऊन उसाचा उतारा चांगला मिळतो. जून ते सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस जास्त असला, तरी उघडझाप असायची; पण यंदा गेले सव्वा दोन महिने एकसारखा पाऊस आहे; त्यामुळे जमिनीला वापसा मिळत नाही, याचा परिणाम सर्वच खरीप पिकांवर झाला आहे. या हवामानाचा सर्वाधिक फटका उसाला बसला आहे. उसाच्या सऱ्यांतील पाणी कमी होत नसल्याने वाढ खुंटली आहे. त्यात उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाची तीव्रता इतकी प्रचंड आहे, की अखंड उसाचा प्लॉटच तांबडाभडक दिसत आहे. उसाच्या पानाखाली बघितले की तांबूस रंगाच्या पावडरीचा थर आपणास पाहावयास मिळतो. ‘तांबेरा’ पानातील अन्नद्रव्य शोषून घेत असल्याने खोडाची ताकद कमी होते. सध्या पानांतून खोडात साखर तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, यावेळीच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने वाढीबरोबरच उताराही घटणार आहे.हंगाम दोन महिन्यांवर आला आहे; त्यामुळे आता उसाची उंची फार वाढणार नाही. आता साखर तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.पावसाचा जोर आणि शेतकºयांना घोरसाधारणत: आपल्याकडे १ आॅगस्टपासून उसाच्या आडसाल लावणी सुरू होतात. आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होत असल्याने लावणीच्या उगवणीस मदत होते; पण सध्या पावसाचा जोर वाढल्याने शेतकºयांचा घोर वाढला आहे. लावण केलेल्या उसाचे बियाणे पाण्याखाली गेले, तर कुजण्याची भीती असते.हे करावे शेतकºयांनी :‘दायथेनिअम-४५’ पावडर ३० ग्रॅम त्यात १९ : १९ : १९ खत ७५ ग्रॅम मिसळून फवारणी करावी. उसात फवारणी करताना सगळे औषध अंगावरच पडते, यासाठी खांद्यावर झेंडा घेतल्यासारखा पंपाचा नोजल घेऊन फवारणी करीत सरीतून पुढे सरकत गेल्यास औषधाची फवारणी पानावर होते. अरुंद सरी आणि गच्च पाल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होतो, यासाठी उसाची लावण करतानाच मोठी सरी सोडावी व उसाला पाला सुटतो, त्यावेळी पाला काढून सरी मोकळी ठेवल्यास हवा खेळती राहते.