शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

६७३ शेतकरी कुटुंबाना विमा योजनेचा ‘हात’भार

By admin | Updated: August 24, 2014 22:36 IST

जिल्ह्यातील सहा वर्षातील चित्र : ६ कोटी ७३ लाखांचा निधी

दत्तात्रय पाटील -म्हाकवे --वाढत्या महागाईने रोजच्या मीठ-भाकरीची जुळवाजुळव करताना दमछाक होणाऱ्या आणि हाता-तोंडाशी गाठभेट होणे मुश्किल झालेल्या शेतकरी कुटुंबातील कर्त्याचा अपघाता मृत्यू झाल्यास अशा कुटुंबावर आकाशच कोसळते. मात्र, या आर्थिक संकटरुपी आकाशाला ढिगळ लावण्याच्या उद्देशाने गेल्या सहा वर्षांपासून शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरु केली.गेल्या सहा वर्षांत अपघाती मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ८७४ शेतकऱ्यांपैकी तब्बल ६७३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना शेतकरी कुटुंबियांसाठी वरदान ठरणारी असून यामुळे जिल्ह्याला ६ कोटी ७३ लाखांचा निधी मिळाला आहे.जगाचा पोशिंदा असणारा आणि ‘ओ’ रक्तगट प्रमाणे कार्य करणाऱ्या बळीराजाला कठीण प्रसंगाला स्वत:च तोंड द्यावे लागते. एखादं संकट वादळ बनून आलंच तर अशावेळी त्याला कोणीही मदतीचा हात देत नाही, किंबहूना शासकीय धोरणातही त्याच्या मदतीची फारशी तजबीज नव्हती. यामुळे कुटुंबाची वाहताहती होऊ शकते, भारनियमनामुळे रात्री अपरात्री शेतीला पाणी देताना साप-विंचवाच्या दंशाने मृत्यू झाल्यास किंवा शेतात वैरण काढताना, झाडांच्या फांद्या तोडताना किंवा शेतीची अन्य कामे करताना हात, पाय, डोळा अथवा अन्य अवयवाला इजा झाल्यास त्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर येते. किंबहूना यामुळे कुटुंबाची परवड होऊ नये यासाठी शेतकरी जनता अपघात विमा योजना अंमलात आणली.विमा कंपनीकडे आर्थिक मदतीसाठी मृत शेतकऱ्यांचा प्रस्ताव सादर केला जातो. त्याप्रमाणे गत वर्षांत विविध कारणाणी अपघाती मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ८७४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविले होते. मात्र, काही अपुऱ्या कागदपत्रामुळे जवळपास १७३ शेतकरी कुटुंबियांना विमा भरपाई मिळालेली नाही. तर ६७६ शेतऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखाचा धनादेश घरपोहच देण्यात आला आहे. यामुळे ६ कोटी ७३ लाखांचा निधी जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांना मिळाला असून ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदायी ठरली आहे.