शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

विभागात ६४ लाख टन उसाचे गाळप

By admin | Updated: December 22, 2016 00:07 IST

गाळपात वारणा पुढे : सरासरी उताऱ्यात ‘गुरुदत्त’ची आघाडी

प्रकाश पाटील-- कोपार्डे -कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर-सांगली) ३६ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला वेग आला असून, केवळ दीड महिन्यात ६३ लाख ५३ हजार १०३ मे. टन. उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ११.३१ च्या साखर उताऱ्याने ७१ लाख ८२ हजार ५८२ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गाळप विभागात वारणा साखर कारखान्याने आघाडी घेऊन ४ लाख ७४ हजार ८०० मे. टन उसाचे गाळप केले आहे. तर गुरुदत्त टाकळी कारखान्याने सरासरी साखर उतारा १२.१५ टक्के मिळवत आघाडी घेतली आहे.या हंगामात एफआरपी + १७५ या ऊसदराचा तोडगा निघाल्याने ५ नोव्हेंबरलाच कारखान्यांचे हंगाम सुरू झाले आहेत. मागील वर्षी दुष्काळाच्या झळा जाणवू लागताच शेतीसाठी पाणी उपसाबंदी कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आली. यामुळे पाण्याअभावी ऊस पिकांना मोठा फटका बसला. यावर्षी उसाच्या हेक्टरी उत्पादनात ३५ ते ४० टक्के घट दिसून येत आहे. ऊस तोडणी करत असताना उत्पादनातील घट स्पष्ट झाली असून, हेक्टरी ६० ते ७० टनापर्यंत उत्पादनात घट झाली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावर्षी साखर कारखान्यांना आपले गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असून, हंगाम सुरुवातीपासूनच सर्वच कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करून उसाची पळवापळवी सुरू केली आहे. उसाच्या उत्पादन घटीमुळे साखर कारखान्यांचे हंगाम ८० ते ९० दिवसच चालणार आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बहुतांश साखर कारखान्यांची धुराडी बंद होणार आहेत.यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात २३ पैकी २१ कारखान्यांचे गाळप हंगाम जोमात सुरू असून ४० ते ४५ दिवसांत ४४ लाख ३० हजार ३१५ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. यात वारणा साखर कारखान्याने ४ लाख ७४ हजार ८०० मे. टन उसाचे गाळप करून गाळपात आघाडी घेतली आहे. तर जवाहर साखर कारखान्याने ४ लाख २५ हजार ३०० मे. टन उसाचे गाळप करत द्वितीय, तर दालमिया शुगर्सने २ लाख ९९ हजार ६८० मे. टन उसाचे गाळप करत तिसऱ्या स्थानावर आहे. सरासरी साखर उताऱ्यातही कोल्हापूर जिल्ह्यातील गुरुदत्त १२.२५ टक्केच्या सरासरी साखर उताऱ्यासह प्रथमस्थानी असून, १२.२ टक्केच्या सरासरी उताऱ्यासह दुसऱ्या तर ११.७१ टक्के उतारा मिळवत बिद्री तिसऱ्या स्थानावर आहे.सांगली जिल्ह्यातील १८ पैकी १५ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम सुरु केले आहेत. सांगलीतील कारखान्यांनी १९ लाख २२ हजार ७८८ मे. टन उसाचे गाळप करत ११.१२ च्या सरासरी साखर उताऱ्याने ७१ लाख ८२ हजार ५८२ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. यात क्रांती कुंडल साखर कारखान्याने सर्वाधिक २ लाख ३६ हजार ९०० मे.टन ऊस गाळप केले आहे.यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात १ कोटी ४० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध राहील तर सांगली जिल्ह्यात ३५ लाख मे. टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.१९ डिसेंबर २०१६ पर्यंतचे गाळप कोल्हापूर जिल्हासांगली जिल्हाएकूण कारखाने२३१७चालू कारखाने२१ ०३ बंद कारखाने२१५