शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पाच वर्षांत निवडणुकीचे ६३ लाख थकीत

By admin | Updated: April 1, 2015 00:03 IST

ग्रामविकास विभागाचा कारभार : देणेकऱ्यांना प्रतीक्षा, उधारीचा व्यवहार

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -ग्रामपंचायतींच्या गेल्या निवडणुकीत झालेल्या खर्चापोटी जिल्ह्यातील ६३ लाख रुपये शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून थकीत आहेत. जिल्हा निवडणूक प्रशासन (महसूल) वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाच वर्षांपासून निधी मिळाला नसल्याने देणेकऱ्यांना पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न तालुका महसूल प्रशासनासमोर आहे. नुकत्याच जाहीर ग्रामपंचायतीसाठी लागणारी स्टेशनरी व अन्य साहित्य खरेदीसाठी संबंधितांकडे गेल्यानंतर ‘मागच्या निवडणुकीतील उधारी पहिल्यांदा द्या, मगच आमच्याकडे या’ असे उत्तर मिळत आहे. पाच वर्षांची मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया महसूल निवडणूक विभाग राबवत असते. प्रभाग रचनेपासून आरक्षण जाहीर करणे, निवडणूक घेऊन निकाल जाहीर करणे, विविध टप्प्यांत यंत्रणा काम करते. निवडणूक होईपर्यंत अधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत अमर्याद तास काम करतात. तालुका कार्यालय आणि मतदान केंद्र येथे लागणारी स्टेशनरी, निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानधन यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने यापूर्वी प्रती ग्रामपंचायत २० हजार रुपयांची तरतूद केली. त्यानुसार खर्च मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यासाठी अद्याप निधी आलेला नाही. पुन्हा ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेने गेल्या निवडणुकीतील देय रक्कम द्यावी, आगामी निवडणुकीसाठी प्रती मतदार ४० हजार किंवा प्रत्येक केंद्रासाठी १० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केली. याच मागणीसाठी असहकार आंदोलन केले. त्याची गांभीर्याने नोंद निवडणूक विभागाने घेतली. निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध न केलेल्या तहसीलदारांवर कारवाईचा आदेश आयोगाने दिला आहे. मात्र, देय रक्कम न दिलेल्या ग्रामविकास विभागावर कोण कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या प्रती ग्रामपंचायतींना ४ हजार १०० रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले आहे. यापुढील रक्कम किती आणि कधी मिळणार यासंबंधी स्पष्ट केलेले नाही. देय रक्कमही अदा केलेली नाही. त्यामुळे निवडणुकीचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. देणेबाकी न दिल्यामुळे महसूल यंत्रणेला या निवडणुकीत उधारी मिळणे बंद झाली आहे. पारदर्शकता येत असल्यामुळे खर्चाची रक्कम ‘अ‍ॅडजेस्ट’ कुठे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणूक खर्चाचा मुद्दा कळीचा झाला आहे.सन २०१० मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या खर्चापोटीच्या जिल्ह्यातील ६३ लाख निधीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे पण अजून निधी आलेला नाही. गेल्यावेळचा देय असल्याने यावेळी निवडणुकीसाठी स्टेशनरी व अन्य साहित्य उधारीवर कोणीही देत नसल्याच्या तक्रारी तालुका पातळीवरून येत आहेत.- किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)असहकारामुळे ग्रामपंचायत अधिसूचना प्रसिद्ध न केलेल्या तहसीलदारांवर कारवाईचा आदेश आयोगाने काढला आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी अधिसूचना वेळेत जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकाही तहसीलदारांवर कारवाई होणार नाही.