शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

अवकाळीने बेदाणा उत्पादकांना ६१ कोटींचा फटका

By admin | Updated: March 3, 2015 00:28 IST

शासनाकडून आधाराची अपेक्षा : ४१०० टन बेदाणा काळा पडला

सांगली : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ४१०० टन बेदाणा भिजला. तो काळा पडल्यामुळे शेतकऱ्यांचे ६१ कोटी ५० लाखांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. सलग दुसऱ्यावर्षी बेदाणा उत्पादकांचे नुकसान होऊनही याकडे प्रशासनाने गंभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे बेदाणा उत्पादक चिंतेत आहे. सध्या ढगाळ हवामान असून, आणखी पाऊस पडल्यास शेतकरी अस्मानी संकटात सापडणार आहे.जिल्ह्यात एक लाख एकरवर द्राक्षबागांचे क्षेत्र असून, त्यापैकी ६० टक्के द्राक्षाचा बेदाणा तयार होता. द्राक्षबागायतदारांनी सांगोला तालुक्यातील जुनोनी, कोळे या परिसरासह जत, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातही बेदाणा तयार केला आहे. या सर्वच परिसराला अवकाळी पावसाने सलग दोन दिवस झोडपून काढले. बेदाणा रॅकमध्ये पाणीच पाणी साचून राहिल्यामुळे तो पूर्ण काळा पडला आहे. दोन दिवस असेच ढगाळ हवामान राहिल्यास बेदाणा शेतकऱ्यांच्या हाती लागणार नसल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात सात ते आठ हजार टन बेदाणा काळा पडल्याचा बेदाणा उत्पादकांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रभारी जिल्हाधिकारी सतीश लोखंडे यांनी प्रशासनाने तातडीने कृषी विभाग आणि तहसीलदारांकडून बेदाण्याच्या नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली आहे. जत तालुक्यात १४०० टन, कवठेमहांकाळ तालुक्यात २५०० टन आणि तासगाव तालुक्यात २०० टन बेदाणा भिजल्यामुळे तो काळा पडल्याचे सांगितले. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ४१०० टन बेदाण्याचे ६१ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)