शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जिल्ह्यात ६० टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.६२ टक्के पाऊस झाला असला तरी राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले तालुके मात्र ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहेत. कागल तालुक्याने सरासरी ओलांडली असून, शाहूवाडी तालुका ९८ टक्क्यांवर आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. २0१५ साली पावसाने दगा दिल्याने शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.६२ टक्के पाऊस झाला असला तरी राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले तालुके मात्र ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहेत. कागल तालुक्याने सरासरी ओलांडली असून, शाहूवाडी तालुका ९८ टक्क्यांवर आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. २0१५ साली पावसाने दगा दिल्याने शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. जिल्ह्यातील उसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. उसाअभावी साखर कारखाने फेब्रुवारी महिन्यातच बंद झाले होते. मात्र गतवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा चांगला साठा झाला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्याच्या तयारीत असणाºया शेतकºयासमोर यंदा पुन्हा अपुºया पावसाने संकट उभे केले होते. काही अपवाद वगळता आॅगस्ट महिना कोरडाच गेला होता. त्यामुळे तर पिकांनी माना टाकल्या होत्या. तर ऊस लागणीसह रब्बीचा हंगाम वाया जाणार अशी भिती व्यक्त असताना सप्टेंबरच्या सुरुवातीपासून जिल्ह्णात पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली. त्यामुळे शेतकºयांना दिलास मिळाला. गेले आठ दिवस विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. पाऊस रोज हजेरी लावत असल्याने विहिरी, नद्यांची पातळी काहीप्रमाणात वाढली आहे. धरणेही भरली आहेत. हा पाऊस खरीप पिकांना पोषक असून ऊन-पावसामुळे उसााची वाढ जोमात सुरू आहे.जिल्ह्यात सरासरी १७७२.३९ मिलिमीटर पाऊस पडतो; पण आतापर्यंत १०७४.४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरीच्या ६०.६२ टक्केच पाऊस पडला असून, हातकणंगले तालुक्यात ४४.९७ टक्के, राधानगरी तालुक्यात ४२.३० टक्के, गगनबावडा तालुक्यात अद्याप ४७.३६ टक्केच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत गगनबावडा तालुका एकदमच मागे राहिला असून, तिथे केवळ २० टक्केच पाऊस झाला आहे. भुदरगड, गडहिंग्लज, कागल या तालुक्यांनी सप्टेंबर महिन्याची सरासरी आताच ओलांडली आहे.दरम्यान, रविवारी दुपारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्णात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पाऊस आहे. त्यात जिल्ह्णातील सगळीच धरणे शंभर टक्के भरल्याने नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परिणामी नद्यांची पातळी स्थिर राहिली आहे. पंचगंगा नदीवरील रुई व इचलकरंजी हे दोन बंधारे अद्यापही पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद आहे.तालुका सरासरी पाऊस आतापर्यंत झालेला पाऊसमिलिमीटर कंसात टक्केवारीहातकणंगले ८२०.४० ३६८.९१ (४४.९७ )शिरोळ ३८५.३० २६२.२१ (६८.०५)पन्हाळा १४१६.२० १०३९.३१ (७३.३९)शाहूवाडी १५४२.३० १५२१.०० (९८.६२)राधानगरी ३५०१.६० १४८१.२८ (४२.३०)गगनबावडा ५६२९.४० २६६६.०० (४७.३६)करवीर ७९६.९० ५५२.३२ (६९.३१)कागल ६४९.६० ७६२.९४ (११७.४५)गडहिंग्लज ७८४.६० ५१८.७९ (६६.१२)भुदरगड १३४३.७० १०७९.८० (८०.३६)आजरा १७८९.७० १२१२.०० (६७.७२)चंदगड २६०९.०० १४२९.०३ (५४.७७)