शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६० टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.६२ टक्के पाऊस झाला असला तरी राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले तालुके मात्र ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहेत. कागल तालुक्याने सरासरी ओलांडली असून, शाहूवाडी तालुका ९८ टक्क्यांवर आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. २0१५ साली पावसाने दगा दिल्याने शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.६२ टक्के पाऊस झाला असला तरी राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले तालुके मात्र ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहेत. कागल तालुक्याने सरासरी ओलांडली असून, शाहूवाडी तालुका ९८ टक्क्यांवर आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. २0१५ साली पावसाने दगा दिल्याने शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. जिल्ह्यातील उसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. उसाअभावी साखर कारखाने फेब्रुवारी महिन्यातच बंद झाले होते. मात्र गतवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा चांगला साठा झाला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्याच्या तयारीत असणाºया शेतकºयासमोर यंदा पुन्हा अपुºया पावसाने संकट उभे केले होते. काही अपवाद वगळता आॅगस्ट महिना कोरडाच गेला होता. त्यामुळे तर पिकांनी माना टाकल्या होत्या. तर ऊस लागणीसह रब्बीचा हंगाम वाया जाणार अशी भिती व्यक्त असताना सप्टेंबरच्या सुरुवातीपासून जिल्ह्णात पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली. त्यामुळे शेतकºयांना दिलास मिळाला. गेले आठ दिवस विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. पाऊस रोज हजेरी लावत असल्याने विहिरी, नद्यांची पातळी काहीप्रमाणात वाढली आहे. धरणेही भरली आहेत. हा पाऊस खरीप पिकांना पोषक असून ऊन-पावसामुळे उसााची वाढ जोमात सुरू आहे.जिल्ह्यात सरासरी १७७२.३९ मिलिमीटर पाऊस पडतो; पण आतापर्यंत १०७४.४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरीच्या ६०.६२ टक्केच पाऊस पडला असून, हातकणंगले तालुक्यात ४४.९७ टक्के, राधानगरी तालुक्यात ४२.३० टक्के, गगनबावडा तालुक्यात अद्याप ४७.३६ टक्केच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत गगनबावडा तालुका एकदमच मागे राहिला असून, तिथे केवळ २० टक्केच पाऊस झाला आहे. भुदरगड, गडहिंग्लज, कागल या तालुक्यांनी सप्टेंबर महिन्याची सरासरी आताच ओलांडली आहे.दरम्यान, रविवारी दुपारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्णात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पाऊस आहे. त्यात जिल्ह्णातील सगळीच धरणे शंभर टक्के भरल्याने नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परिणामी नद्यांची पातळी स्थिर राहिली आहे. पंचगंगा नदीवरील रुई व इचलकरंजी हे दोन बंधारे अद्यापही पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद आहे.तालुका सरासरी पाऊस आतापर्यंत झालेला पाऊसमिलिमीटर कंसात टक्केवारीहातकणंगले ८२०.४० ३६८.९१ (४४.९७ )शिरोळ ३८५.३० २६२.२१ (६८.०५)पन्हाळा १४१६.२० १०३९.३१ (७३.३९)शाहूवाडी १५४२.३० १५२१.०० (९८.६२)राधानगरी ३५०१.६० १४८१.२८ (४२.३०)गगनबावडा ५६२९.४० २६६६.०० (४७.३६)करवीर ७९६.९० ५५२.३२ (६९.३१)कागल ६४९.६० ७६२.९४ (११७.४५)गडहिंग्लज ७८४.६० ५१८.७९ (६६.१२)भुदरगड १३४३.७० १०७९.८० (८०.३६)आजरा १७८९.७० १२१२.०० (६७.७२)चंदगड २६०९.०० १४२९.०३ (५४.७७)