शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

जिल्ह्यात ६० टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.६२ टक्के पाऊस झाला असला तरी राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले तालुके मात्र ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहेत. कागल तालुक्याने सरासरी ओलांडली असून, शाहूवाडी तालुका ९८ टक्क्यांवर आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. २0१५ साली पावसाने दगा दिल्याने शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.६२ टक्के पाऊस झाला असला तरी राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले तालुके मात्र ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहेत. कागल तालुक्याने सरासरी ओलांडली असून, शाहूवाडी तालुका ९८ टक्क्यांवर आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. २0१५ साली पावसाने दगा दिल्याने शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. जिल्ह्यातील उसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. उसाअभावी साखर कारखाने फेब्रुवारी महिन्यातच बंद झाले होते. मात्र गतवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा चांगला साठा झाला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्याच्या तयारीत असणाºया शेतकºयासमोर यंदा पुन्हा अपुºया पावसाने संकट उभे केले होते. काही अपवाद वगळता आॅगस्ट महिना कोरडाच गेला होता. त्यामुळे तर पिकांनी माना टाकल्या होत्या. तर ऊस लागणीसह रब्बीचा हंगाम वाया जाणार अशी भिती व्यक्त असताना सप्टेंबरच्या सुरुवातीपासून जिल्ह्णात पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली. त्यामुळे शेतकºयांना दिलास मिळाला. गेले आठ दिवस विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. पाऊस रोज हजेरी लावत असल्याने विहिरी, नद्यांची पातळी काहीप्रमाणात वाढली आहे. धरणेही भरली आहेत. हा पाऊस खरीप पिकांना पोषक असून ऊन-पावसामुळे उसााची वाढ जोमात सुरू आहे.जिल्ह्यात सरासरी १७७२.३९ मिलिमीटर पाऊस पडतो; पण आतापर्यंत १०७४.४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरीच्या ६०.६२ टक्केच पाऊस पडला असून, हातकणंगले तालुक्यात ४४.९७ टक्के, राधानगरी तालुक्यात ४२.३० टक्के, गगनबावडा तालुक्यात अद्याप ४७.३६ टक्केच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत गगनबावडा तालुका एकदमच मागे राहिला असून, तिथे केवळ २० टक्केच पाऊस झाला आहे. भुदरगड, गडहिंग्लज, कागल या तालुक्यांनी सप्टेंबर महिन्याची सरासरी आताच ओलांडली आहे.दरम्यान, रविवारी दुपारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्णात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पाऊस आहे. त्यात जिल्ह्णातील सगळीच धरणे शंभर टक्के भरल्याने नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परिणामी नद्यांची पातळी स्थिर राहिली आहे. पंचगंगा नदीवरील रुई व इचलकरंजी हे दोन बंधारे अद्यापही पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद आहे.तालुका सरासरी पाऊस आतापर्यंत झालेला पाऊसमिलिमीटर कंसात टक्केवारीहातकणंगले ८२०.४० ३६८.९१ (४४.९७ )शिरोळ ३८५.३० २६२.२१ (६८.०५)पन्हाळा १४१६.२० १०३९.३१ (७३.३९)शाहूवाडी १५४२.३० १५२१.०० (९८.६२)राधानगरी ३५०१.६० १४८१.२८ (४२.३०)गगनबावडा ५६२९.४० २६६६.०० (४७.३६)करवीर ७९६.९० ५५२.३२ (६९.३१)कागल ६४९.६० ७६२.९४ (११७.४५)गडहिंग्लज ७८४.६० ५१८.७९ (६६.१२)भुदरगड १३४३.७० १०७९.८० (८०.३६)आजरा १७८९.७० १२१२.०० (६७.७२)चंदगड २६०९.०० १४२९.०३ (५४.७७)