शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

थेट पाईपलाईन योजनेत ६० कोटींचा दरोडा

By admin | Updated: May 5, 2017 22:54 IST

भाजप-ताराराणी आघाडीचा गंभीर आरोप दोन माजी मंत्र्यांसह चौघांची ‘नार्को टेस्ट’ घेण्याची मागणी

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेत दोन माजी मंत्री, ठेकेदार आणि कन्सल्टंट यांनी मिळून संगनमताने ६० कोटींचा दरोडा घातल्याचा आरोप करत या प्रकरणाचे सत्य बाहेर येण्याकरीता राज्य सरकारने चौघांचीही सर्वांची ‘नार्को टेस्ट’ करावी, अशी मागणी महानगरपालिकेतील भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी केली. शुक्रवारी दुपारी तीन वाजता माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील ताराराणी सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीचे निमंत्रण नसलेल्या विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, ‘ताराराणी’चे गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक सुनील कदम यांनी सायंकाळी साडेसात वाजता पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. आरोप करताना थेट नावे न घेता केवळ ‘दोन माजी मंत्री’ असाच त्यांनी उल्लेख केला. दोन माजी मंत्र्यांना आजच महानगरपालिकेत येऊन बैठक घेण्याची वेळ का आली? असा सवाल करत सत्यजित कदम म्हणाले की, आपले अपयश कन्सल्टंटच्या माथ्यावर फोडण्यासाठी ही आढावा बैठक घेतली. चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्रक झाले, चुकीच्या पद्धतीने त्याचे बिल अदा केले जात आहे, असे आम्ही सांगत होतो; तेच कन्सल्टंटने मान्य केले. मंत्री असताना त्यांनी योजनेचे अंदाजपत्रक का पाहिले नाही? ४२५ कोटींची योजना ४८८ कोटींवर गेलीच कशी? टेंडरमधील शर्ती का पाहिल्या नाहीत? गेल्या तीन वर्षांत एकदाही बैठक का घेतली नाही? योजनेतील त्रुटी आणि भ्रष्टाचार दाखविण्याचा आमच्याकडून प्रयत्न होताच आढावा बैठक घेणे म्हणजे एकूण भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रकार आहे. योजना मंजूर होतानाच थेट पाईपलाईनवर दरोडा घातला गेला, असा आरोप सुनील कदम यांनी केला. ते म्हणाले की, योजना अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण व्हावी अशीच आमची भावना आहे. भ्रष्टाचार झालेल्या योजनेचे आम्हाला श्रेय घ्यायचे नाही. मात्र, योजनेत लूट झाली असल्यामुळे भाजप, ताराराणी आघाडी गप्प बसणार नाही. आयआरबीला आणून कोल्हापूरला बदनाम केले गेले. आताही थेट पाईपलाईन योजना आणून बदनाम केले जात आहे. ठेकेदाराला चुकीच्या प्रकारे जादा बिल अदा केले आहे, ही फसवणूक आहे. आयुक्तांनी आधी ते वसूल करावे आणि याला जबाबदार असलेल्या कन्सल्टंट व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. योजनेत ज्यांनी पैसे खाल्ले तेच आजच्या आढावा बैठकीला आले. शहराला फसविण्याचे काम सुरू आहे. ज्यांनी लाल दिव्याच्या गाडीत बसून ‘आयआरबी’चा टोल दिला त्यांनी आम्हाला शिकवू नये. ज्यांनी चोर पकडून दिला त्यांनाच बैठकीला बोलाविले नाही, ही खेदाची बाब आहे. गेल्या महिन्याभरापासून आम्ही थेट पाईपलाईनवर चर्चा करण्याकरीता ‘विशेष सभा’ घ्या म्हणून विनंती करत आहोत; पण ती आयोजित केली जात नाही. विशेष सभा घेऊन कन्सल्टंट ठेकेदार यांना उपस्थित ठेवा त्यांना आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत, असे आवाहन कदम यांनी केले. (प्रतिनिधी)