शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी ५७ वेळा रक्तदान

By admin | Updated: October 4, 2015 23:59 IST

ध्येयवेडा : खाटांगळेच्या रघुनाथचा विक्रम करण्याचा संकल्प

कोल्हापूर : देशामध्ये ब्लड कॅन्सरने लाखो लोक पीडित आहेत. त्यांना दर १५ दिवसांनी रक्ताची गरज असते. त्यासाठी खाटांगळे (ता. करवीर) येथील रघुनाथ प्रभाकर पाटील या ध्येयवेड्या व्यक्तीने अशा कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी १६६ वेळा रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत त्यांनी ५७ वेळा रक्तदान केले आहे. रघुनाथ पाटील यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच व्यायाम व कुस्तीची आवड असल्यामुळे ते गावातील तालमीमध्ये सराव करायचे. सांगरूळ, कुडित्रे, इचलकरंजी येथे झालेल्या कुस्ती व बॉडी बिल्डर स्पर्धेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लग्न झाले. सध्या त्यांना दोन मुले आहेत. शेती व्यवसाय सांभाळत आपल्या बलशाली शरीराचा देशासाठी उपयोग करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. त्यासाठी त्यांनी रक्तदानाचा मार्ग स्वीकारला. वर्षातून चार वेळा रक्तदान करण्याचा संकल्प करून रघुनाथ यांनी त्याप्रमाणे रक्तदान केले आहे, त्यांचा हा संकल्प स्तुत्य आहे. (प्रतिनिधी) नेत्रदानाचाही संकल्प--फक्त रक्तदानावरच न थांबता सीपीआर रुग्णालयामार्फत नेत्रदान करण्याचाही संकल्प रघुनाथ पाटील यांनी केला आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या रघुनाथ यांचा हा संकल्प कौतुकास्पद आहे.वयाच्या ४० व्या वर्षांपर्यंत मी ५७ वेळा रक्तदान केले आहे. १६६ वेळा रक्तदान करून रेकॉर्ड करण्याचा माझा विचार आहे. - रघुनाथ पाटील, रक्तदाता