शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

इचलकरंजीतील ५५० डिजिटल फलक हटविले

By admin | Updated: July 4, 2016 00:32 IST

नगरपालिकेची कारवाई : सलग चार दिवस मोहीम

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गेले चार दिवस डिजिटल फलक निर्मूलन करण्याच्या मोहिमेमध्ये सुमारे २०० मोठे फलक व ३५० लहान फलक काढून टाकले. परिणामी शहरातील मुख्य रस्त्यांसह त्यावरील चौकांनी मोकळा श्वास घेतला. फलक हटविण्याची मोहीम पालिकेने तीन स्वतंत्र पथकांमार्फत दोन पाळ्यांमध्ये राबविली. अवघ्या चार दिवसांत मोठ्या प्रमाणावर फलक हटविण्याची कारवाई पालिकेकडून प्रथमच करण्यात आली. गुरुवार, ३० जूनपासून या मोहिमेला सुरुवात केली होती. जुन्या नगरपालिकेपासून जनता चौक, शिवाजी पुतळा चौक, शाहू पुतळा चौक ते करवीर नाका, तसेच संभाजी चौक ते आंबेडकर पुतळा मार्गे स्टेशन रोडवरील कमान अशी व्यापक मोहीम चालविण्यात आली. यामध्ये दोन डंपर, दोन क्रेन आणि तीन गॅसकटरसह पालिकेचे अधिकारी व ६० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मुख्य रस्त्यावरील लोखंडी खांब गॅसकटरच्या साहाय्याने कापून ते हटविले. त्याचबरोबर संभाजी चौक ते स्टेशन रोड आणि शाहू पुतळा ते करवीर नाका अशा रस्त्यांमधील दुभाजकांवरील ३५० लहान फलकसुद्धा कापून ते जप्त केले. धोकादायक कमान अखेर उतरविली करवीर नाका येथे नगरपालिकेची हद्द जेथून चालू होते, त्या ठिकाणी रस्त्यावर लोखंडी स्वागत कमान उभारण्यात आली होती. सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची ही कमान असल्यामुळे त्याचे लोखंडी पाईप, अ‍ॅँगल व पत्रे गंजल्यामुळे ते धोकादायक झाले होते. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही कमान हटविण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. त्याप्रमाणे शनिवारी मध्यरात्रीनंतर क्रेनच्या साहाय्याने ही कमान उतरविण्यात आली.