शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

वाहनधारकांकडून ५५ लाख ८९ हजार दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना संचारबंदीची तमा न बाळगता बिनखास्त फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांनी शस्त्र उगारले. गेल्या आठवड्याभरात ...

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना संचारबंदीची तमा न बाळगता बिनखास्त फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांनी शस्त्र उगारले. गेल्या आठवड्याभरात पोलिसांनी मोटर वाहन कायद्यांतर्गत सुमारे ३० हजार ४२० वाहनधारकांकडून सुमारे ५५ लाख ८९ हजार ९०० रुपये दंड वसूल केला, तर विनामास्कप्रकरणी २० लाख ६२ हजार रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना संक्रमण सुरू असताना प्रशासनाने संचारबंदी पुकारली. त्यामुळे संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस करवाई करत आहेत, तरीही नागरिकांची व वाहनांची रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही. दि. १४ ते २२ एप्रिलपर्यंत पोलिसांनी सुमारे ३० हजार ४२० वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टनुसार कारवाई करून तब्बल ५५ लाख ८९ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. तसेच त्या वाहनाचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणारी १९०८ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. ही वाहने लॉकडाऊन संपल्यानंतर दंडात्मक कारवाई करून परत देण्यात येणार आहेत. याशिवाय विनामास्कप्रकरणी ९८४३ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २० लाख ६२ हजार १०० रुपये दंड वसूल केला आहे.

गुरुवारी दिवसभरात चार लाख दंड वसूल

गुरुवारी एका दिवसात वाहन कारवाई व विनामास्कप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सुमारे चार लाख दोन हजार रुपये दंड वसूल केला. यामध्ये १६२० वाहनधारकांकडून दोन लाख ८९ हजार ९०० रुपये दंड वसूल केला, तर विनामास्कप्रकरणी ३४३ जणांकडून एक लाख १२ हजार १०० रुपये दंड वसूल केला. तसेच दिवसभरात १७३ जणांची वाहने जप्त केली.