शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

५४ हजार जणांनी कोरोनाला हरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ५४ हजार जणांनी कोराेनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ५४ हजार जणांनी कोराेनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून घाबरून जाण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला, सकारात्मक वृत्ती आणि पोषक आहाराच्या माध्यमातून कोरोनावर मात करता येते हे या सर्वांनी दाखवून दिले आहे.

गतवर्षी कोरोना संसर्गाची सुरुवात झाली आणि ज्या आजाराबाबत कोणालाच माहिती नाही त्याबद्दल मोठे भय निर्माण झाले. परंतु, नंतरच्या काळात हळूहळू माहिती मिळत गेली. कोणत्या औषधांमुळे रुग्ण बरा होऊ शकतो याची स्पष्टता आली. मार्च २०२० पासून २६ एप्रिल २०२१ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ६३९१७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी तब्बल ५४०५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २१११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर मंगळवार अखेर ७७४९ सक्रिय रुग्ण आहेत.

चौकट

जिल्ह्याची लोकसंख्या - ४१ लाख ४७ हजार ५०६

कोरोनाचा संशय आल्याने स्वॅब तपासणाऱ्यांची संख्या - ३ लाख ९० हजार

कोरोना निगेटिव्ह आलेली संख्या - ५४ हजार ०५७

वर्षभरात कोरोनाची लागण झालेली संख्या - ६३ हजार ९१७

कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या - ३ लाख ३५ हजार ९४३

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ७ हजार ७४९

२) कोरोनाला आम्ही दररोज हरवतोय

वार कोरोनामुक्त रुग्ण

सोमवार १९ एप्रिल २४३

मंगळवार २८९

बुधवार ३४५

गुरुवार २८२

शुक्रवार २७८

शनिवार ३५७

रविवार २९५

चौकट

घाबरू नका, आम्हीही हरविले !

कोट

गतवर्षी ऑगस्ट महिन्यात मी, मुलगा पॉझिटिव्ह आलो. गडहिंग्लज येथेच शेंद्री माळावरील कोविड सेंटरवर मला आणि मुलाला दाखल करण्यात आले. माझे वय ७४ असल्याने जरा ताण आला होता. अशातच पत्नीची तब्येत बिघडल्याने त्यांना कोल्हापूरला दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे उपचार, तेथील आहार आणि मुळात घरासाठी मला जगले पाहिजे असा निश्चय मी केला. परंतु, अशातच माझ्या पत्नीचे निधन झाले. परंतु, त्यातूनही मला सावरावेच लागले.

२७०४२०२१ कोल विनोद नाईकवाडी

विनोद नाईकवाडी

माजी उपसभापती, नूल, ता. गडहिंग्लज

कोट

याच महिन्यात मला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्यावेळचे कोरोनाचे वातावरण यामध्ये फरक होता. या आजाराबाबत माहिती मिळाली होती. माझे वय ७१ आाणि मधुमेहाचा त्रास, त्यामुळे थोडी काळजी होती. परंतु, मला यातून बरे व्हायचे आहे अशी भावना मी पहिल्यापासून ठेवली. नामस्मरण करत राहिलो. डॉक्टरांच्या सर्व उपचारांकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले आणि बरा झालो.

सुभाष कुलकर्णी, मंगळवार पेठ, कोल्हापूर

कोट

हिंमत ठेवा, आनंदी राहा

वर्षानुवर्षे निसर्गाचे चक्र सुरू आहे. त्यामध्ये अशा आपत्ती येतात. त्यामुळे नागरिकांनी कोरोना झाला म्हणून घाबरून उपयोग नाही. त्यामुळेे शरीर उपचारांना साथ देत नाही. ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण यातून बरे झाले आहेत. आपल्याला याला सामोरेच गेले पाहिजे अशी परिस्थिती आहे. मग त्याला सकारात्मक पद्धतीने सामोरे जायचे असा निश्चय करण्याची गरज आहे. नकारात्मक माहितीवर विश्वास न ठेवता डॉक्टरांच्या उपचारावर विश्वास ठेवला पाहिजे. यानिमित्ताने थोडे चिंतन करण्याची संधी मिळाली आहे असे समजून आनंद आणि समाधान याचे संतुलन राखण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

डॉ. शुभदा दिवाण, मानसोपचार तज्ज्ञ