शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

५४ हजार जणांनी कोरोनाला हरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ५४ हजार जणांनी कोराेनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ५४ हजार जणांनी कोराेनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून घाबरून जाण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला, सकारात्मक वृत्ती आणि पोषक आहाराच्या माध्यमातून कोरोनावर मात करता येते हे या सर्वांनी दाखवून दिले आहे.

गतवर्षी कोरोना संसर्गाची सुरुवात झाली आणि ज्या आजाराबाबत कोणालाच माहिती नाही त्याबद्दल मोठे भय निर्माण झाले. परंतु, नंतरच्या काळात हळूहळू माहिती मिळत गेली. कोणत्या औषधांमुळे रुग्ण बरा होऊ शकतो याची स्पष्टता आली. मार्च २०२० पासून २६ एप्रिल २०२१ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ६३९१७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी तब्बल ५४०५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २१११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर मंगळवार अखेर ७७४९ सक्रिय रुग्ण आहेत.

चौकट

जिल्ह्याची लोकसंख्या - ४१ लाख ४७ हजार ५०६

कोरोनाचा संशय आल्याने स्वॅब तपासणाऱ्यांची संख्या - ३ लाख ९० हजार

कोरोना निगेटिव्ह आलेली संख्या - ५४ हजार ०५७

वर्षभरात कोरोनाची लागण झालेली संख्या - ६३ हजार ९१७

कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या - ३ लाख ३५ हजार ९४३

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ७ हजार ७४९

२) कोरोनाला आम्ही दररोज हरवतोय

वार कोरोनामुक्त रुग्ण

सोमवार १९ एप्रिल २४३

मंगळवार २८९

बुधवार ३४५

गुरुवार २८२

शुक्रवार २७८

शनिवार ३५७

रविवार २९५

चौकट

घाबरू नका, आम्हीही हरविले !

कोट

गतवर्षी ऑगस्ट महिन्यात मी, मुलगा पॉझिटिव्ह आलो. गडहिंग्लज येथेच शेंद्री माळावरील कोविड सेंटरवर मला आणि मुलाला दाखल करण्यात आले. माझे वय ७४ असल्याने जरा ताण आला होता. अशातच पत्नीची तब्येत बिघडल्याने त्यांना कोल्हापूरला दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे उपचार, तेथील आहार आणि मुळात घरासाठी मला जगले पाहिजे असा निश्चय मी केला. परंतु, अशातच माझ्या पत्नीचे निधन झाले. परंतु, त्यातूनही मला सावरावेच लागले.

२७०४२०२१ कोल विनोद नाईकवाडी

विनोद नाईकवाडी

माजी उपसभापती, नूल, ता. गडहिंग्लज

कोट

याच महिन्यात मला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्यावेळचे कोरोनाचे वातावरण यामध्ये फरक होता. या आजाराबाबत माहिती मिळाली होती. माझे वय ७१ आाणि मधुमेहाचा त्रास, त्यामुळे थोडी काळजी होती. परंतु, मला यातून बरे व्हायचे आहे अशी भावना मी पहिल्यापासून ठेवली. नामस्मरण करत राहिलो. डॉक्टरांच्या सर्व उपचारांकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले आणि बरा झालो.

सुभाष कुलकर्णी, मंगळवार पेठ, कोल्हापूर

कोट

हिंमत ठेवा, आनंदी राहा

वर्षानुवर्षे निसर्गाचे चक्र सुरू आहे. त्यामध्ये अशा आपत्ती येतात. त्यामुळे नागरिकांनी कोरोना झाला म्हणून घाबरून उपयोग नाही. त्यामुळेे शरीर उपचारांना साथ देत नाही. ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण यातून बरे झाले आहेत. आपल्याला याला सामोरेच गेले पाहिजे अशी परिस्थिती आहे. मग त्याला सकारात्मक पद्धतीने सामोरे जायचे असा निश्चय करण्याची गरज आहे. नकारात्मक माहितीवर विश्वास न ठेवता डॉक्टरांच्या उपचारावर विश्वास ठेवला पाहिजे. यानिमित्ताने थोडे चिंतन करण्याची संधी मिळाली आहे असे समजून आनंद आणि समाधान याचे संतुलन राखण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

डॉ. शुभदा दिवाण, मानसोपचार तज्ज्ञ