शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

५४ जणांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी

By admin | Updated: July 15, 2017 16:47 IST

खर्च वेळेत सादर केला नाही : जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक

आॅनलाईन लोकमत/ प्रवीण देसाई ]

कोल्हापूर, दि. १५ : गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांनी मुदतीत खर्च न सादर केल्याबद्दल जिल्ह्यातील ५४ जणांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची कारवाई जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे संबंधितांना पुढील जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ग्रामपंचायत व इतर स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक लढविता येणार नाही. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगालाही कळविण्यात आले आहे.त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी झाली. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांसह आघाड्या व अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकला होता. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत सादर करणे क्रमप्राप्त असते; परंतु निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर उमेदवारांनी खर्चच सादर केला नाही. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील सहा वर्षांसाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह इतर स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक लढविण्यास बंदीची कारवाई केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ५४ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४० उमेदवार हे करवीर तालुक्यातील आहेत.

निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही खर्च सादर न करणे हे कितपत महागात पडते हे या कारवाईवरून दिसून येते. निवडणुकीत जिंकलो तरच खर्च सादर करायचा अन्यथा तिकडे फरकायचे नाही, ही भूमिका ज्या उमेदवारांनी घेतली आहे, त्या सर्व म्हणजे राजकीय पक्षांच्याही उमेदवारांना चांगलाच दणका या निमित्ताने बसला आहे. त्यांना पुढील पाच वर्षांत जिल्हा परिषद, पंचायत समितीसह इतर स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक लढविता येणार नाही.

विशेष म्हणजे येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील चारशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांनाही या उमेदवारांना मुकावे लागणार आहे. या कारवाईनंतर जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगालाही याबाबत कळविले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

निवडणूक लढविण्यास बंदी घातलेले उमेदवार असे तालुका उमेदवार संख्या

करवीर ४० कागल ०६ पन्हाळा ०५ भुदरगड ०२ हातकणंगले ०१