शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

५२९ संस्थांचा निवडणूक धडाका

By admin | Updated: August 4, 2015 23:58 IST

जिल्ह्यातील सहकारी संस्था : सहा महिन्यांत ७०० संस्थांच्या निवडणुका पूर्ण

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यातील ‘ब’ वर्गातील ५२९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धडाका डिसेंबर २०१५ अखेर सुरू राहणार आहे. मुदत संपेल तसा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्यामुळे सहकारातील राजकारण गतिमान झाले आहे. गत सहा महिन्यांत जिल्ह्यातील लहान-मोठ्या अशा तब्बल ७०० संस्थांची निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे. गावातील अर्थकारण सहकारी संस्थांच्या माध्यमातून चालते. जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे मोेठे आहे. त्यामुळे राजकारणात सहकारी संस्थांचे महत्त्व आहे म्हणूनच सहकारी संस्थेचे संचालक होण्यासाठी प्रचंड रस्सीखेच असते. गेल्या दोन वर्षांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागला होता. सेना-भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुदत संपलेल्या पण निवडणुका न झालेल्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया राबविली. अजूनही निवडणुकीचा बॅकलॉग भरून काढला जात आहे. दरम्यान, राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शासनाने ‘अ’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा सहकार उपनिबंधकांनी ‘अ’ वर्गातील निवडणूक कार्यक्रमांना ‘ब्रेक’ लावला आहे. याउलट ‘ब’ वर्गातील मुदत संपलेल्या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम लावला जात आहे. वीरशैव व श्रीपतरावदादा या बँकांसह चार संस्थांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. उर्वरित ५२९ संस्थांची निवडणूक प्रक्रिया डिसेंबर २०१५ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सहकार विभागाने ठेवले आहे. मुदत संपतील त्याप्रमाणे प्रक्रिया राबविली जात आहे. निवडणुकीचा धडाकाच सुरू असल्यामुळे संबंधित संस्थांच्या गावातील राजकारणात ढवळून निघत आहे. राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. इच्छुकांनी मोर्चेबांधणी करत सभासदांशी थेट संपर्क वाढविला आहे. सहकार कायद्यात काही दुरुस्ती केल्यामुळे कोणत्या संस्थेची कधी निवडणूक आहे, हे वृत्तपत्रांतून जाहीर होत आहे. त्यामुळे इच्छुकांना निवडणुकीची नेमकेपणाने माहिती मिळत आहे. अतिउत्साही इच्छुक सहकार निबंधकांच्या कार्यालयात येऊनही माहिती घेत आहेत. मुदत संपतील त्याप्रमाणे ‘ब’ वर्गातील सहकारी संस्था, नागरी बँका यांची निवडणूक प्रक्रिया घेतली जात आहे. डिसेंबर २०१५ अखेर मुदत संपणाऱ्या ५२९ संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. - सुनील शिरापूरकर,जिल्हा उपनिबंधकपन्नास टक्क्यांहून अधिक बिनविरोधनिवडणुकीचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडू नये, यासाठी निवडणुका बिनविरोध करण्याकडे कल वाढला आहे. यापूर्वी निवडणूक कार्यक्रम लागलेल्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था बिनविरोध झाल्या आहेत. एकाचवेळी मोठ्या संख्येने संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे सहकार विभागातील कर्मचारी निवडणूक कामातच व्यस्त राहत आहेत.