शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नवीन महाविद्यालयांसाठी ५० प्रस्ताव दाखल

By admin | Updated: May 23, 2017 01:00 IST

अभ्यासक्रम, वाढीव तुकडीचाही समावेश : ‘बृहत् आराखडा’च्या बैठकांना प्रारंभ : शिवाजी विद्यापीठाची कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम, वाढीव तुकडी आणि विद्याशाखेसाठीचे एकत्रितपणे सुमारे ५० प्रस्ताव सोमवारी शिवाजी विद्यापीठाच्या समितीकडे दाखल झाले आहेत.विद्यापीठातर्फे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील नवीन महाविद्यालये, विद्याशाखा आणि अभ्याक्रमांची निश्चिती केली जाणार आहे. याअंतर्गत सन २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षांच्या कालावधीत स्वीकारण्यात येणाऱ्या प्रस्तावांचा शैक्षणिक बृहत् आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत विद्यापीठाच्या विविध घटकांची मते व माहिती घेण्यासाठी जिल्हानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात सोमवारी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील बैठकीने झाली. कमला महाविद्यालयातील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे होते. समितीचे समन्वयक प्राचार्य जे. बी. पाटील यांनी बैठकीच्या प्रारंभी प्रस्ताव सादरीकरणाचे नियमांची माहिती दिली. डॉ. ए. एम. गुरव यांनी कौशल्य व उद्योजकता विकासाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. बदलत्या गरजांनुसार शैक्षणिक क्षेत्राला आवश्यक असणारे संवादकौशल्य, नवतंत्रज्ञान आदींचे अभ्यासक्रम महाविद्यालयांनी सुरू करावेत, असे शंकरराव कुलकर्णी यांनी सांगितले. बैठकीत विद्यापीठाच्या समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे, पी. वाय. माने यांच्यासह काही संस्थाचालक, प्राचार्यांनी काही सूचना, मते मांडली. यावेळी समिती सदस्य डॉ. पी. एस. पाटील, प्राचार्य डॉ. डी. व्ही. कडोले, प्राचार्य बी. ए. खोत, आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम, विद्याशाखा आणि वाढीव तुकडीसाठीचे सुमारे ५० प्रस्ताव विविध संस्थाचालक, महाविद्यालयांनी समितीकडे सादर केले. दरम्यान, बृहत् आराखडा समितीची आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता सांगलीतील विलिंग्डन कॉलेज येथे, तर उद्या, बुधवारी सातारा येथील लालबहादूूर शास्त्री कॉलेजमध्ये होणार आहे.जुलैअखेर शासनाला सादरीकरणजिल्हानिहाय होणाऱ्या बैठकांतून विद्यापीठाच्या समितीकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचे एकत्रीकरण करून त्यांची छाननी करण्यात येईल. त्यातून विद्यापीठाचा पाच वर्षांचा आराखडा तयार केला जाईल. हा आराखडा विद्यापीठाची व्यवस्थापन, विद्या परिषद आणि अधिसभेसमोर मांडण्यात येईल. त्यानंतर पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाला साधारणत: जुलैअखेरपर्यंत सादर करण्यात येईल, असे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले.