शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

नवीन महाविद्यालयांसाठी ५० प्रस्ताव दाखल

By admin | Updated: May 23, 2017 01:00 IST

अभ्यासक्रम, वाढीव तुकडीचाही समावेश : ‘बृहत् आराखडा’च्या बैठकांना प्रारंभ : शिवाजी विद्यापीठाची कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम, वाढीव तुकडी आणि विद्याशाखेसाठीचे एकत्रितपणे सुमारे ५० प्रस्ताव सोमवारी शिवाजी विद्यापीठाच्या समितीकडे दाखल झाले आहेत.विद्यापीठातर्फे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील नवीन महाविद्यालये, विद्याशाखा आणि अभ्याक्रमांची निश्चिती केली जाणार आहे. याअंतर्गत सन २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षांच्या कालावधीत स्वीकारण्यात येणाऱ्या प्रस्तावांचा शैक्षणिक बृहत् आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत विद्यापीठाच्या विविध घटकांची मते व माहिती घेण्यासाठी जिल्हानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात सोमवारी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील बैठकीने झाली. कमला महाविद्यालयातील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे होते. समितीचे समन्वयक प्राचार्य जे. बी. पाटील यांनी बैठकीच्या प्रारंभी प्रस्ताव सादरीकरणाचे नियमांची माहिती दिली. डॉ. ए. एम. गुरव यांनी कौशल्य व उद्योजकता विकासाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. बदलत्या गरजांनुसार शैक्षणिक क्षेत्राला आवश्यक असणारे संवादकौशल्य, नवतंत्रज्ञान आदींचे अभ्यासक्रम महाविद्यालयांनी सुरू करावेत, असे शंकरराव कुलकर्णी यांनी सांगितले. बैठकीत विद्यापीठाच्या समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे, पी. वाय. माने यांच्यासह काही संस्थाचालक, प्राचार्यांनी काही सूचना, मते मांडली. यावेळी समिती सदस्य डॉ. पी. एस. पाटील, प्राचार्य डॉ. डी. व्ही. कडोले, प्राचार्य बी. ए. खोत, आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम, विद्याशाखा आणि वाढीव तुकडीसाठीचे सुमारे ५० प्रस्ताव विविध संस्थाचालक, महाविद्यालयांनी समितीकडे सादर केले. दरम्यान, बृहत् आराखडा समितीची आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता सांगलीतील विलिंग्डन कॉलेज येथे, तर उद्या, बुधवारी सातारा येथील लालबहादूूर शास्त्री कॉलेजमध्ये होणार आहे.जुलैअखेर शासनाला सादरीकरणजिल्हानिहाय होणाऱ्या बैठकांतून विद्यापीठाच्या समितीकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचे एकत्रीकरण करून त्यांची छाननी करण्यात येईल. त्यातून विद्यापीठाचा पाच वर्षांचा आराखडा तयार केला जाईल. हा आराखडा विद्यापीठाची व्यवस्थापन, विद्या परिषद आणि अधिसभेसमोर मांडण्यात येईल. त्यानंतर पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाला साधारणत: जुलैअखेरपर्यंत सादर करण्यात येईल, असे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले.