शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

गतवर्षीचे रेमडेसिविरचे ५ कोटी बिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:23 IST

कोल्हापूर : गतवर्षी कोरोनाचा कहर वाढला असताना जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून ५ कोटी रुपयांची १२ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स मोफत वाटण्यात ...

कोल्हापूर : गतवर्षी कोरोनाचा कहर वाढला असताना जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून ५ कोटी रुपयांची १२ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स मोफत वाटण्यात आली, परंतु त्याच्या बिलापोटी एक रुपयाही जिल्हा परिषदेने दिला नसल्याने अनेक कंपन्या यंदा इंजेक्शन्स पुरवठा करण्यासाठी तयार नसल्याचा अनुभव येत आहे.

सध्या जिल्ह्यात सर्वत्र रेमडेसिविरची मोठी टंचाई भासत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या इंजेक्शन्सची गरज नोंदवण्यासाठी कक्षही उघडण्यात आला आहे. या ठिकाणी नातेवाइकांचा संतापही व्यक्त होत आहे. सध्या यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी सनियंत्रणासाठी नेमले आहेत.

ही टंचाई असताना गेल्यावर्षी कशी व्यवस्था केली होती हे लोकमतने जाणून घेतले. त्यावेळी ही धक्कादायक माहिती पुढे आली. त्यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालिन अधिकारी अमन मित्तल यांच्यावर जिल्ह्यासाठीच्या कोरोना खरेदीची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी जिल्ह्यातील रुग्णांची स्थिती पाहून आरोग्य विभागाने सुचवल्याप्रमाणे रेमडेसिविरची खरेदी केली होती. तब्बल ५ कोटी रुपयांची १२ हजार इंजेक्शन्स खरेदी करून ती जिल्ह्यातील सर्वसामान्यांसह गरजूंना वितरित केली. त्यासाठी जिल्हा परिषदेसमोर रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. मात्र या पाच कोटी रुपयांपैकी एक रुपयाही तीन कंपन्यांना देण्यात आलेला नाही. यासाठी राज्य आपत्ती सहाय्यता निधीकडे गेल्याचवर्षी मागणी करण्यात आली होती. मात्र अजूनही निधी न मिळाल्याने या कंपन्यांचे देणे थकले आहे. त्यामुळे नवा इंजेक्शन्सचा पुरवठा करण्यासाठी कंपन्या उत्सुक नसल्याचे सांगण्यात आले.

तहान लागल्यावर विहीर...

कोल्हापूर जिल्हा परिषदेने सर्वसामान्यांना रेमडेसिविर इंजेक्शन्स मोफत पुरवण्याचा अत्यंत चांगला उपक्रम गतवर्षी राबवला. त्यातून अनेकांचे प्राण वाचले. कोल्हापूरच्या या उपक्रमाचे नंतर राज्यभर कौतुकही झाले. त्याची अंमलबजावणीही अनेक जिल्ह्यात झाली. असे असतानाही यंदाही कोरोनाचा कहर वाढल्यावर जिल्हा परिषदेने ही सेवा पूर्ववत सुरू करायला हवी होती. परंतु मागच्या वर्षीचेच बिल थकीत असल्याने सगळेच ठप्प झाले आहे. मागच्या वर्षभरात ही रक्कम संबंधित कंपन्यांना मिळायला हवी यासाठी जिल्हा परिषदेच्या व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा व्हायला हवा होता. परंतु तसे घडलेले नाही. त्यातून तहान लागल्यावर विहीर खणायच्या प्रवृत्तीचे दर्शन होत आहे.

रेमडेसिविरचे संग्रहित छायाचित्र वापरावे

(चौकट जोड देत आहे)