शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

चार वर्षांत अत्याचाराचे ३६९ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 01:01 IST

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : परिस्थितीचा गैरफायदा, प्रेमाचे जाळे आणि लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांत ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : परिस्थितीचा गैरफायदा, प्रेमाचे जाळे आणि लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे ३६९, तर विनयभंगाचे ७९८ गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. त्यामध्ये लहान मुलांचा लैंगिक अत्याचार कायदा (पोक्सो) कलम २०१२ चे ३ (ए), ५ (एफ), ६ ते १२ (एल) प्रमाणे १२, तर बलात्कार (३७६) ८ अशा २० गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.राजेंद्रनगर येथील एका शाळेत हॉकी संघामध्ये सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून नववीमध्ये शिकणाऱ्या चार मुलींवर अत्याचार करणारा नराधम क्रीडाशिक्षक संशयित विजय विठ्ठल मनुगडे (रा. कपिलेश्वर, ता. राधानगरी, सध्या रा. देवकर पाणंद) याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अत्याचार व विनयभंग गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, धक्कादायक माहिती पुढे आली आहे.वीटभट्टी, ऊसतोड मजूर, सेंट्रिंग व्यवसाय, झोपडपट्टीसह मध्यम व उच्च राहणीमान असलेल्या वस्त्यांमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना जास्त आहेत. जवळच्या आणि विश्वासातीलच व्यक्तींकडूनच अशा घटना घडत आहेत. १ जानेवारी २०१६ ते ३० आॅगस्ट २०१९ अखेर ३ ते १७ वर्षांपर्यंतच्या ५० अल्पवयीन मुला-मुलींवर खाऊचे आमिष, लग्नाची फूस, घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत अतिप्रसंग करण्याच्या आणि अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. ही गुन्हेगारांची विकृती रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे, तर प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून महिलांवरील अत्याचाराचे ३१९ गुन्हे दाखल आहेत. विनयभंग (३५४ अ ५०६) नुसार ७९८ गुन्हे दाखल आहेत.पूर्वी अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी मुली, तरुणी, महिला अब्रुपोटी न्यायालयात जबाब देण्यास टाळाटाळ करायच्या, त्याचा फायदा आरोपींना होत असे; त्यामुळे गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष होण्याचे प्रमाण जास्त होते. त्याचा परिणाम असे गुन्हे वाढू लागले. शासनाने कायदा कठोर करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी न्यायालयीन व पोलीस स्तरावर भक्कम पुरावे, फिर्यादीचा जबाब न्यायालयात होऊ लागल्याने शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. १२ वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोक्सो कायद्यात बदल करण्याचा निर्णय झाल्याने आता नराधमांना जन्मठेप नाही, तर थेट आजन्म कारावास (मरेपर्यंत) अथवा फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे.