शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत अत्याचाराचे ३६९ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 01:01 IST

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : परिस्थितीचा गैरफायदा, प्रेमाचे जाळे आणि लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांत ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : परिस्थितीचा गैरफायदा, प्रेमाचे जाळे आणि लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे ३६९, तर विनयभंगाचे ७९८ गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. त्यामध्ये लहान मुलांचा लैंगिक अत्याचार कायदा (पोक्सो) कलम २०१२ चे ३ (ए), ५ (एफ), ६ ते १२ (एल) प्रमाणे १२, तर बलात्कार (३७६) ८ अशा २० गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.राजेंद्रनगर येथील एका शाळेत हॉकी संघामध्ये सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून नववीमध्ये शिकणाऱ्या चार मुलींवर अत्याचार करणारा नराधम क्रीडाशिक्षक संशयित विजय विठ्ठल मनुगडे (रा. कपिलेश्वर, ता. राधानगरी, सध्या रा. देवकर पाणंद) याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अत्याचार व विनयभंग गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, धक्कादायक माहिती पुढे आली आहे.वीटभट्टी, ऊसतोड मजूर, सेंट्रिंग व्यवसाय, झोपडपट्टीसह मध्यम व उच्च राहणीमान असलेल्या वस्त्यांमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना जास्त आहेत. जवळच्या आणि विश्वासातीलच व्यक्तींकडूनच अशा घटना घडत आहेत. १ जानेवारी २०१६ ते ३० आॅगस्ट २०१९ अखेर ३ ते १७ वर्षांपर्यंतच्या ५० अल्पवयीन मुला-मुलींवर खाऊचे आमिष, लग्नाची फूस, घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत अतिप्रसंग करण्याच्या आणि अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. ही गुन्हेगारांची विकृती रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे, तर प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून महिलांवरील अत्याचाराचे ३१९ गुन्हे दाखल आहेत. विनयभंग (३५४ अ ५०६) नुसार ७९८ गुन्हे दाखल आहेत.पूर्वी अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी मुली, तरुणी, महिला अब्रुपोटी न्यायालयात जबाब देण्यास टाळाटाळ करायच्या, त्याचा फायदा आरोपींना होत असे; त्यामुळे गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष होण्याचे प्रमाण जास्त होते. त्याचा परिणाम असे गुन्हे वाढू लागले. शासनाने कायदा कठोर करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी न्यायालयीन व पोलीस स्तरावर भक्कम पुरावे, फिर्यादीचा जबाब न्यायालयात होऊ लागल्याने शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. १२ वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोक्सो कायद्यात बदल करण्याचा निर्णय झाल्याने आता नराधमांना जन्मठेप नाही, तर थेट आजन्म कारावास (मरेपर्यंत) अथवा फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे.