शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

चार वर्षांत अत्याचाराचे ३६९ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 01:01 IST

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : परिस्थितीचा गैरफायदा, प्रेमाचे जाळे आणि लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांत ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : परिस्थितीचा गैरफायदा, प्रेमाचे जाळे आणि लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे ३६९, तर विनयभंगाचे ७९८ गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. त्यामध्ये लहान मुलांचा लैंगिक अत्याचार कायदा (पोक्सो) कलम २०१२ चे ३ (ए), ५ (एफ), ६ ते १२ (एल) प्रमाणे १२, तर बलात्कार (३७६) ८ अशा २० गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.राजेंद्रनगर येथील एका शाळेत हॉकी संघामध्ये सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून नववीमध्ये शिकणाऱ्या चार मुलींवर अत्याचार करणारा नराधम क्रीडाशिक्षक संशयित विजय विठ्ठल मनुगडे (रा. कपिलेश्वर, ता. राधानगरी, सध्या रा. देवकर पाणंद) याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अत्याचार व विनयभंग गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, धक्कादायक माहिती पुढे आली आहे.वीटभट्टी, ऊसतोड मजूर, सेंट्रिंग व्यवसाय, झोपडपट्टीसह मध्यम व उच्च राहणीमान असलेल्या वस्त्यांमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना जास्त आहेत. जवळच्या आणि विश्वासातीलच व्यक्तींकडूनच अशा घटना घडत आहेत. १ जानेवारी २०१६ ते ३० आॅगस्ट २०१९ अखेर ३ ते १७ वर्षांपर्यंतच्या ५० अल्पवयीन मुला-मुलींवर खाऊचे आमिष, लग्नाची फूस, घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत अतिप्रसंग करण्याच्या आणि अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. ही गुन्हेगारांची विकृती रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे, तर प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून महिलांवरील अत्याचाराचे ३१९ गुन्हे दाखल आहेत. विनयभंग (३५४ अ ५०६) नुसार ७९८ गुन्हे दाखल आहेत.पूर्वी अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी मुली, तरुणी, महिला अब्रुपोटी न्यायालयात जबाब देण्यास टाळाटाळ करायच्या, त्याचा फायदा आरोपींना होत असे; त्यामुळे गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष होण्याचे प्रमाण जास्त होते. त्याचा परिणाम असे गुन्हे वाढू लागले. शासनाने कायदा कठोर करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी न्यायालयीन व पोलीस स्तरावर भक्कम पुरावे, फिर्यादीचा जबाब न्यायालयात होऊ लागल्याने शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. १२ वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोक्सो कायद्यात बदल करण्याचा निर्णय झाल्याने आता नराधमांना जन्मठेप नाही, तर थेट आजन्म कारावास (मरेपर्यंत) अथवा फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे.