शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

कोल्हापूरचे ४८ पर्यटक सिक्कीम, दार्जिलिंगमध्ये

By admin | Updated: April 26, 2015 00:59 IST

सर्वजण सुखरुप : जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची माहिती

कोल्हापूर : उत्तर भारतात पर्यटनासाठी गेलेले कोल्हापूरचे ४८ पर्यटक सिक्कीम, दार्जिलिंग येथे सुखरूप असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, या विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेपाळ तसेच मुंबई मंत्रालय येथे संपर्क साधून कोल्हापूरहून नेपाळला कोणी गेले आहे का, याची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. नेपाळ येथे शक्तिशाली भूकंप होऊन पाचशेहून अधिक लोक मृत झाल्याचे वृत्त कोल्हापुरात पोहोचताच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने या अनुषंगाने कोल्हापुरातून कोणी पर्यटक नेपाळला गेले आहे का, याची माहिती घेण्याचे काम सुरूकेले. तथापि, भूकंप झाला त्यावेळी कोल्हापूरचे कोणीही पर्यटक नेपाळमध्ये नव्हते; परंतु काही पर्यटक सिक्कीम, दार्जिलिंग येथे असल्याची माहिती मिळताच त्यांच्याशी संपर्क साधून ते सर्व सुखरूप असल्याची खात्री करून घेतली. समर्थ हॉलिडेजतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा येथील सुमारे चाळीस जणांची एक सहल बुधवारी रात्री कोल्हापूरहून सिक्कीमला गेली आहे. हे सर्वजण एका खासगी कंपनीचे डिलर्स आहेत. या सहलीचे समन्वयक कृ ष्णात तोडकर यांनी आम्ही सर्वजण सुखरूप असल्याचे सांगितले. गंगटोक, कोलकाता करून ही सर्व मंडळी १ मे पर्यंत कोल्हापूरला पोहोचणार आहेत. कोल्हापुरातील डॉ. नंदकुमार जोशी, त्यांच्या पत्नी मृणाली जोशी, डॉ. मिलिंद जोशी यांच्यासह आठजण नेपाळला जाणार होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांना नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची माहिती समजली. त्यामुळे त्यांनी आपली नियोजित सहल रद्द केली आहे. सध्या ही मंडळी सिक्कीममध्ये पोहोचली असून, सर्व सुखरूप आहेत, असे आपत्ती व्यवस्थापनकडून सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाची तत्परता नेपाळ येथील भूकंपाची माहिती वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध होऊ लागताच कोल्हापूरहून कोणी पर्यटनासाठी गेले आहे का, याची चौकशी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शहरातील सर्व पर्यटन कंपन्यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई मंत्रालयाशी तसेच नेपाळ येथील हेल्पलाईनवरही संपर्क साधून कोल्हापूरचे कोणी पर्यटक आहेत का याची माहिती घेतली आहे. सायंकाळपर्यंत तरी कसलीच माहिती मिळाली नव्हती. जिल्ह्णातील सर्व प्रांत व तहसीलदारांना माहिती मिळवावी, अशा सूचना दिल्या आहेत. पर्यटनासाठी गेलेल्या व्यक्तींची माहिती कळवा : जिल्हाधिकारी कोल्हापूर : नेपाळ व उत्तर भारतात पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्णातील व्यक्तींची माहिती संबंधित तहसीलदार तसेच जिल्हा नियंत्रण कक्षात द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शनिवारी केले. जिल्ह्णातील पर्यटक व्यक्ती नेपाळ व उत्तर भारतात गेले असल्यास त्या व्यक्तीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्रमांक-०२३१-२६५९२३२) व ‘१०७७’ या टोल फ्री क्रमांकावर तसेच तहसील कार्यालय येथे द्यावी, असे आवाहन डॉ. सैनी यांनी पत्रकाद्वारे केले आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभाग येथील ‘०२२२-२२०२७९९०’ या क्रमांकावर पर्यटकांच्या नातेवाइकांनी संपर्क साधावा, असे आवाहन शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानेही केले आहे.