शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जिल्ह्यात ४७० बिनकामाच्या सहकारी संस्था

By admin | Updated: September 22, 2015 00:09 IST

सर्वेक्षण अंतिम टप्प्यात : आणखी चारशे संस्थांची होणार तपासणी, अनेक संस्था अवसायनात जाणार

सांगली : केवळ कागदोपत्री असलेल्या, बंद असलेल्या व कोणतेही काम न करणाऱ्या सहकारी संस्था अवसायनात काढून त्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू झाली असून, आजवर झालेल्या सर्वेक्षणातून तब्बल ४७0 बिनकामाच्या संस्था आढळल्या आहेत. या सर्व संस्था अवसायनात काढून त्यांची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक यांनी दिलेल्या आदेशानुसार १ जुलैपासून सर्वेक्षण मोहीम सुरू झाली. ३१ डिसेंबरपर्यंत सर्वेक्षणाची मुदत होती. तत्पूर्वीच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांगली जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आल्यामुळे मुदतीपूर्वीच सर्वेक्षण संपणार आहे. आजअखेर ८९ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित कामही येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत संपणार आहे. अजून ४०० संस्थांचे सर्वेक्षण बाकी आहे. बिनकामाच्या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करून उर्वरित संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याच्यादृष्टीने ही मोहीम सहकार विभागाने हाती घेतली आहे. मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबत खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार अशा संस्थांबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. पूर्णपणे बंद असलेल्या व कार्यस्थगित संस्था अवसायनात घेण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संख्या मोठी आहे. कृषी बँका, कृषी पतसंस्था, नागरी बँका, नागरी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, पणन संस्था, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, दूध संस्था, सूतगिरण्या, उपसा जलसिंचन संस्था, ग्राहक भांडारे, गृहनिर्माण संस्था, कामगार कंत्राटदार संस्था अशा अनेक प्रकारच्या सहकारी संस्था अस्तित्वात आहेत. अनेक सहकारी संस्थांची नावे शासकीय दफ्तरी नोंद असली तरी, प्रत्यक्षात त्या पत्त्यावर या संस्था अस्तित्वात नाहीत. काही संस्था केवळ कागदोपत्री जिवंत आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांची गर्दी कागदोपत्री मोठी दिसत आहे.नव्या मोहिमेनंतर आता सुस्थितीत असलेल्याच सहकारी संस्था कागदोपत्री व प्रत्यक्षात जिवंत राहतील. उर्वरित अनेक संस्था आता अवसायनात काढल्या जाणार असून, त्यांची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. (प्रतिनिधी)मिरज तालुक्यात सर्वाधिक बंद संस्थासंपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक बंद असलेल्या सहकारी संस्था मिरज तालुक्यात आढळल्या आहेत. जवळपास साडेतीनशे संस्था याठिकाणी आढळून आल्या आहेत. कवठेमहांकाळ तालुक्याचाही सर्व्हे पूर्ण झाला आहे. येत्या महिनाअखेर मोहीम पूर्ण होणार असून, त्यानंतर तालुकानिहाय बिनकामाच्या सहकारी संस्थांची यादी तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित ४00 सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाचे काम राहिले आहे. तेसुद्धा येत्या काही दिवसात संपणार आहे. यातील बहुतांश सहकारी संस्था बंद असण्याची शक्यता आहे. मिरज तालुक्यात सर्वात जास्त संस्था आहेत. सर्वेक्षणाच्या मोहिमेचा विचार केला, तर संपूर्ण राज्यात सर्वात गतीने व शिस्तबद्ध पद्धतीने सांगली जिल्ह्यातील काम पूर्ण झाले आहे.