शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

४७ गावांत ‘कौन बनेगा सरपंच’

By admin | Updated: July 8, 2017 21:49 IST

कऱ्हाड तालुक्यात धुमशान सुरू : ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी आत्तापासूनच फिल्डिंग

लोकमत न्यूज नेटवर्क-- कऱ्हाड : तालुक्यातील ४७ गावांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, इच्छुकांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकांमध्ये सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे बहुमताबरोबरच सरपंचपदही आपल्याच पारड्यात पडावे, यासाठी नेत्यांनी चाचपणीही सुरू केली आहे. थेट सरपंचमुळे अनेक नेत्यांची गोची झाल्याचे दिसून येत आहे.कऱ्हाड तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजला जातो. प्रत्येक निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष या तालुक्याकडे लागून राहते. इतर निवडणुकांबरोबरच येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही रंगतदार होतात. सध्या आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या कऱ्हाड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, प्रभाग रचना व आरक्षण ३ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. सरपंचपद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार आहे. दि. ३ आॅगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. सप्टेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असेही सांगण्यात येत आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर ११ जुलैअखेर हरकती दाखल करण्याकरिता तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामध्ये गणेशवाडी, घराळवाडी, हनुमंतवाडी, हवेलवाडी, येळगाव, अंधारवाडी, हनुमानवाडी, हिंंगनोळे, कळंत्रेवाडी, साबळेवाडी, तळबीड, चरेगाव, आटके, किवळ, अंतवडी, शामगाव, दुशेरे, गोंदी, जुळेवाडी, वडगाव हवेली, धावरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, भांबे, करंजोशी-हरपळवाडी, सावरघर, आरेवाडी, डेळेवाडी, सुपने, पश्चिम सुपने, कोरेगाव, बाबरमाची (पुनर्वसित डिचोली) वनवासमाची (खोडशी) विजयनगर, चिंंचणी, घोलपवाडी, जुने कवठे, कालगाव, पाडळी, हेळगाव, मनू, रेठरे खुर्द, कासारशिरंबे, ओंडोशी, आणे, कुसूर, तारुख, वानरवाडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. संबंधित ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकतींची सुनावणी दि. १५ जुलै रोजी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पारण्यासाठी नेटके नियोजन केले आहे. प्रभाग रचनेत येणाऱ्या हरकतींचा निपटारा करून अंतिम प्रभाग यादी जाहीर होईल. सरपंचाची अनेकांना स्वप्नेयावर्षी ४७ ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडणूक येणार असल्याने या गावांतील काही मंडळींना आपणच भावी सरपंच म्हणून निवडून येणार असल्याची जणू स्वप्नेच पडू लागल्याची चर्चा अनेक गावांमध्ये सुरू आहे. सर्व सामाजिक कार्यात सहभाग घेणारा, सुख-दु:खात सहभागी होणारा व अडीअडचणींना मदत करणारा, गावचे प्रश्न सोडवणारा असा भावी सरपंच गावात कोण होईल, अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.तीन गावांमध्ये पहिल्यांदाच निवडणूकसावरघर, बाबरमाची (डिचोली) व करंजोशी (हरपळवाडी) या पुनर्वसित ग्रामपंचायतींची पहिल्यांदा निवडणूक होत आहे. तीन वॉर्ड, सात सदस्य संख्या असणाऱ्या या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींची लोकसंख्या दीड हजारापेक्षा कमी आहे. यंदा पहिल्यांदाच या ग्रामपंचायती निवडणूक होत आहे. यंदा सरपंच कोणाचा ?‘यंदा सरपंच आमचाच’ या इर्षेला पेटून गावोगावचे नेते, कार्यकर्ते झाडून कामाला लागले आहेत. गावागावांतील राजकारण चांगलेच पेटून उठले आहे. अनेक राजकीय पक्षांतील नेते मंडळींनी सरपंच उमेदवारासाठी मोर्चेबांधणी केली आहे. थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने स्वच्छ व निर्मळ चारित्र्याचा सरपंच कोण याची शोधाशोध सुरू झाली आहे.