शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

४७ गावांत ‘कौन बनेगा सरपंच’

By admin | Updated: July 8, 2017 21:49 IST

कऱ्हाड तालुक्यात धुमशान सुरू : ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी आत्तापासूनच फिल्डिंग

लोकमत न्यूज नेटवर्क-- कऱ्हाड : तालुक्यातील ४७ गावांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, इच्छुकांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकांमध्ये सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे बहुमताबरोबरच सरपंचपदही आपल्याच पारड्यात पडावे, यासाठी नेत्यांनी चाचपणीही सुरू केली आहे. थेट सरपंचमुळे अनेक नेत्यांची गोची झाल्याचे दिसून येत आहे.कऱ्हाड तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजला जातो. प्रत्येक निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष या तालुक्याकडे लागून राहते. इतर निवडणुकांबरोबरच येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही रंगतदार होतात. सध्या आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या कऱ्हाड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, प्रभाग रचना व आरक्षण ३ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. सरपंचपद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार आहे. दि. ३ आॅगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. सप्टेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असेही सांगण्यात येत आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर ११ जुलैअखेर हरकती दाखल करण्याकरिता तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामध्ये गणेशवाडी, घराळवाडी, हनुमंतवाडी, हवेलवाडी, येळगाव, अंधारवाडी, हनुमानवाडी, हिंंगनोळे, कळंत्रेवाडी, साबळेवाडी, तळबीड, चरेगाव, आटके, किवळ, अंतवडी, शामगाव, दुशेरे, गोंदी, जुळेवाडी, वडगाव हवेली, धावरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, भांबे, करंजोशी-हरपळवाडी, सावरघर, आरेवाडी, डेळेवाडी, सुपने, पश्चिम सुपने, कोरेगाव, बाबरमाची (पुनर्वसित डिचोली) वनवासमाची (खोडशी) विजयनगर, चिंंचणी, घोलपवाडी, जुने कवठे, कालगाव, पाडळी, हेळगाव, मनू, रेठरे खुर्द, कासारशिरंबे, ओंडोशी, आणे, कुसूर, तारुख, वानरवाडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. संबंधित ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकतींची सुनावणी दि. १५ जुलै रोजी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पारण्यासाठी नेटके नियोजन केले आहे. प्रभाग रचनेत येणाऱ्या हरकतींचा निपटारा करून अंतिम प्रभाग यादी जाहीर होईल. सरपंचाची अनेकांना स्वप्नेयावर्षी ४७ ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडणूक येणार असल्याने या गावांतील काही मंडळींना आपणच भावी सरपंच म्हणून निवडून येणार असल्याची जणू स्वप्नेच पडू लागल्याची चर्चा अनेक गावांमध्ये सुरू आहे. सर्व सामाजिक कार्यात सहभाग घेणारा, सुख-दु:खात सहभागी होणारा व अडीअडचणींना मदत करणारा, गावचे प्रश्न सोडवणारा असा भावी सरपंच गावात कोण होईल, अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.तीन गावांमध्ये पहिल्यांदाच निवडणूकसावरघर, बाबरमाची (डिचोली) व करंजोशी (हरपळवाडी) या पुनर्वसित ग्रामपंचायतींची पहिल्यांदा निवडणूक होत आहे. तीन वॉर्ड, सात सदस्य संख्या असणाऱ्या या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींची लोकसंख्या दीड हजारापेक्षा कमी आहे. यंदा पहिल्यांदाच या ग्रामपंचायती निवडणूक होत आहे. यंदा सरपंच कोणाचा ?‘यंदा सरपंच आमचाच’ या इर्षेला पेटून गावोगावचे नेते, कार्यकर्ते झाडून कामाला लागले आहेत. गावागावांतील राजकारण चांगलेच पेटून उठले आहे. अनेक राजकीय पक्षांतील नेते मंडळींनी सरपंच उमेदवारासाठी मोर्चेबांधणी केली आहे. थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने स्वच्छ व निर्मळ चारित्र्याचा सरपंच कोण याची शोधाशोध सुरू झाली आहे.