शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

जिल्ह्यात ४५३ गावांत कर्जमाफी रेंगाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे या गावांमधील कर्जमाफीअंतर्गत होणारे चावडी वाचन पुढील टप्प्यात घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे तेथील कर्जमाफी आता निवडणुका होईपर्यंत रेंगाळण्याची चिन्हे आहेत.कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत जिल्ह्यातून वैयक्तिक ३ लाख ४७ हजार अर्जांची नोंदणी झाली आहे, तर १ लाख ८८ कुटुंबांनी अर्ज दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे या गावांमधील कर्जमाफीअंतर्गत होणारे चावडी वाचन पुढील टप्प्यात घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे तेथील कर्जमाफी आता निवडणुका होईपर्यंत रेंगाळण्याची चिन्हे आहेत.कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत जिल्ह्यातून वैयक्तिक ३ लाख ४७ हजार अर्जांची नोंदणी झाली आहे, तर १ लाख ८८ कुटुंबांनी अर्ज दाखल केले आहेत. आता सहकार विभागाकडून सोसायटीकडील कर्जखात्यांची लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी सुरु आहे. ज्या शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत, त्या अर्जदारांची माहिती २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन करून जनतेसमोर आणली जाणार आहे. मात्र आता यातील ४५३ गावांसमोर आचारसंहितेची अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुका सुरू असलेल्या या गावांमध्ये चावडी वाचन तूर्त करू नये, अशा सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. आचारसंहिता नसलेल्या गावांमध्ये २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन सुरू होईल. उर्वरित ४५३ गावांमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ते होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमधील चावडी वाचनाचे नियोजन जिल्हा उपनिबंधकांमार्फत करण्यात आले होते. आता आचारसंहितेमुळे दोन टप्प्यात चावडी वाचन प्रक्रिया राबवावी लागेल. त्यामुळे दिवाळीपर्यंत या गावांमधील शेतकºयांना कर्जमाफी मिळणे मुश्किल होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडूनही शासनाने याबाबत मार्गदर्शन मागविल्याचे समजते. तोपर्यंत सहकार विभागाने खबरदारी म्हणून तूर्त ग्रामपंचायत निवडणुका नसलेल्या गावांमध्येच चावडी वाचन करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यात कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदानासाठी सुमारे २ लाख ५७ हजार जण पात्र आहेत. जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार वैयक्तिक शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये १ लाख ८८ हजार कुटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत. सहकार विभागाकडून सोसायटीतील कर्जखात्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकूण ७६३ सोसायट्या आहेत. लेखापरीक्षकांमार्फत ११८ सोसायट्यांमधील कर्जखात्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित सोसायटीतील कर्जखात्यांची पडताळणी दहा दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाने तीन समित्यांची नेमणूक केली आहे. २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन सुरु होणार आहे. प्रत्येक तालुक्याला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या समितीवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांची माहिती पडताळण्याचे, चौकशी करण्याचे काम या समितीतील सदस्य करणार आहेत. तसेच एखादा अर्जदार कर्जमाफीस पात्र आहे की अपात्र आहे, याचा निर्णय ही समिती घेणार आहे.