शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४५३ गावांत कर्जमाफी रेंगाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे या गावांमधील कर्जमाफीअंतर्गत होणारे चावडी वाचन पुढील टप्प्यात घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे तेथील कर्जमाफी आता निवडणुका होईपर्यंत रेंगाळण्याची चिन्हे आहेत.कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत जिल्ह्यातून वैयक्तिक ३ लाख ४७ हजार अर्जांची नोंदणी झाली आहे, तर १ लाख ८८ कुटुंबांनी अर्ज दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे या गावांमधील कर्जमाफीअंतर्गत होणारे चावडी वाचन पुढील टप्प्यात घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे तेथील कर्जमाफी आता निवडणुका होईपर्यंत रेंगाळण्याची चिन्हे आहेत.कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत जिल्ह्यातून वैयक्तिक ३ लाख ४७ हजार अर्जांची नोंदणी झाली आहे, तर १ लाख ८८ कुटुंबांनी अर्ज दाखल केले आहेत. आता सहकार विभागाकडून सोसायटीकडील कर्जखात्यांची लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी सुरु आहे. ज्या शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत, त्या अर्जदारांची माहिती २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन करून जनतेसमोर आणली जाणार आहे. मात्र आता यातील ४५३ गावांसमोर आचारसंहितेची अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुका सुरू असलेल्या या गावांमध्ये चावडी वाचन तूर्त करू नये, अशा सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. आचारसंहिता नसलेल्या गावांमध्ये २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन सुरू होईल. उर्वरित ४५३ गावांमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ते होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमधील चावडी वाचनाचे नियोजन जिल्हा उपनिबंधकांमार्फत करण्यात आले होते. आता आचारसंहितेमुळे दोन टप्प्यात चावडी वाचन प्रक्रिया राबवावी लागेल. त्यामुळे दिवाळीपर्यंत या गावांमधील शेतकºयांना कर्जमाफी मिळणे मुश्किल होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडूनही शासनाने याबाबत मार्गदर्शन मागविल्याचे समजते. तोपर्यंत सहकार विभागाने खबरदारी म्हणून तूर्त ग्रामपंचायत निवडणुका नसलेल्या गावांमध्येच चावडी वाचन करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यात कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदानासाठी सुमारे २ लाख ५७ हजार जण पात्र आहेत. जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार वैयक्तिक शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये १ लाख ८८ हजार कुटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत. सहकार विभागाकडून सोसायटीतील कर्जखात्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकूण ७६३ सोसायट्या आहेत. लेखापरीक्षकांमार्फत ११८ सोसायट्यांमधील कर्जखात्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित सोसायटीतील कर्जखात्यांची पडताळणी दहा दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाने तीन समित्यांची नेमणूक केली आहे. २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन सुरु होणार आहे. प्रत्येक तालुक्याला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या समितीवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांची माहिती पडताळण्याचे, चौकशी करण्याचे काम या समितीतील सदस्य करणार आहेत. तसेच एखादा अर्जदार कर्जमाफीस पात्र आहे की अपात्र आहे, याचा निर्णय ही समिती घेणार आहे.