शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

राजस्थानमध्ये अडकलेल्या ४५०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 14:18 IST

गुजरात सरकारने आता त्यांना नेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी येथे अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होत आहेच; मात्र या परिसरात ह्यकोरोनाह्ण पाय पसरू लागल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

ठळक मुद्दे: गावी सोडण्यासाठी राज्याच्या आदेशाची प्रतीक्षा

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : जेईई’, ‘नीट’सह,  अन्य प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोटा (राजस्थान) येथे गेलेले महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी सध्या तिथेच अडकून पडले आहेत. तिथे ह्यकोरोनाह्णचा संसर्ग वाढू लागल्याने केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्याचे आदेश दिल्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, गुजरात राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांतील विद्यार्थ्यांना तेथून नेले आहे. मात्र महाराष्टÑ सरकारने अद्याप आदेश न दिल्याने या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, आदींकडे जाण्यासाठी पूर्वतयारी परीक्षा द्यावी लागते. पूर्वतयारी परीक्षेच्या अभ्यासाची देशात अनेक केंद्रे आहेत. त्यांपैकी देशातील आजच्या घडीला सर्वांत नावाजलेले केंद्र हे राजस्थानमधील ह्यकोटाह्ण हे आहे. येथे मोठे खासगी क्लासेस आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थी तेथे अभ्यासासाठी येतात. विद्यार्थी आपल्या मूळ गावी अकरावी व बारावीचे प्रवेश घेतात आणि पूर्वतयारीच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी ह्यकोटाह्ण येथील विविध क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. विद्यार्थी दोन वर्षे तिथे राहून अभ्यास करतात. गेले महिनाभर ह्यकोरोनाह्णचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुलांसह पालक हवालदिल झाले आहेत. या मुलांना आपापल्या गावी पाठवावे, असे आदेश केंद्र सरकारने काढल्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल यांनी आपापली मुले नेली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने तर स्वतंत्र रेल्वे पाठवून या मुलांना नेले. गुजरात सरकारने आता त्यांना नेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी येथे अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होत आहेच; मात्र या परिसरात ह्यकोरोनाह्ण पाय पसरू लागल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ३० विद्यार्थीकोल्हापुरातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तिथे गेले आहेत. शिरोळ, इचलकरंजी, राजारामपुरी, कोल्हापूर शहर, हरपवडे, खुपिरे, गोठे येथील विद्यार्थ्यांसह काहीजणांचे पालकही अडकले आहेत.पी. एन. पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चाया विद्यार्थ्यांना गावी पाठविण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार पी. एन. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

‘कोटा’ परिसरात ‘कोरोना’चा संसर्ग वाढू लागल्याने इतर राज्यांनी आपापले विद्यार्थी नेले आहेत. महाराष्ट सरकारनेही तातडीने राज्यातील मुले हलविण्याबाबत निर्णय घ्यावा.- शिवाजी पाटील (पालक, खुपिरे)-

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा