शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये अडकलेल्या ४५०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 14:18 IST

गुजरात सरकारने आता त्यांना नेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी येथे अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होत आहेच; मात्र या परिसरात ह्यकोरोनाह्ण पाय पसरू लागल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

ठळक मुद्दे: गावी सोडण्यासाठी राज्याच्या आदेशाची प्रतीक्षा

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : जेईई’, ‘नीट’सह,  अन्य प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोटा (राजस्थान) येथे गेलेले महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी सध्या तिथेच अडकून पडले आहेत. तिथे ह्यकोरोनाह्णचा संसर्ग वाढू लागल्याने केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्याचे आदेश दिल्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, गुजरात राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांतील विद्यार्थ्यांना तेथून नेले आहे. मात्र महाराष्टÑ सरकारने अद्याप आदेश न दिल्याने या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, आदींकडे जाण्यासाठी पूर्वतयारी परीक्षा द्यावी लागते. पूर्वतयारी परीक्षेच्या अभ्यासाची देशात अनेक केंद्रे आहेत. त्यांपैकी देशातील आजच्या घडीला सर्वांत नावाजलेले केंद्र हे राजस्थानमधील ह्यकोटाह्ण हे आहे. येथे मोठे खासगी क्लासेस आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थी तेथे अभ्यासासाठी येतात. विद्यार्थी आपल्या मूळ गावी अकरावी व बारावीचे प्रवेश घेतात आणि पूर्वतयारीच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी ह्यकोटाह्ण येथील विविध क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. विद्यार्थी दोन वर्षे तिथे राहून अभ्यास करतात. गेले महिनाभर ह्यकोरोनाह्णचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुलांसह पालक हवालदिल झाले आहेत. या मुलांना आपापल्या गावी पाठवावे, असे आदेश केंद्र सरकारने काढल्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल यांनी आपापली मुले नेली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने तर स्वतंत्र रेल्वे पाठवून या मुलांना नेले. गुजरात सरकारने आता त्यांना नेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी येथे अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होत आहेच; मात्र या परिसरात ह्यकोरोनाह्ण पाय पसरू लागल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ३० विद्यार्थीकोल्हापुरातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तिथे गेले आहेत. शिरोळ, इचलकरंजी, राजारामपुरी, कोल्हापूर शहर, हरपवडे, खुपिरे, गोठे येथील विद्यार्थ्यांसह काहीजणांचे पालकही अडकले आहेत.पी. एन. पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चाया विद्यार्थ्यांना गावी पाठविण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार पी. एन. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

‘कोटा’ परिसरात ‘कोरोना’चा संसर्ग वाढू लागल्याने इतर राज्यांनी आपापले विद्यार्थी नेले आहेत. महाराष्ट सरकारनेही तातडीने राज्यातील मुले हलविण्याबाबत निर्णय घ्यावा.- शिवाजी पाटील (पालक, खुपिरे)-

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा