शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

राजस्थानमध्ये अडकलेल्या ४५०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 14:18 IST

गुजरात सरकारने आता त्यांना नेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी येथे अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होत आहेच; मात्र या परिसरात ह्यकोरोनाह्ण पाय पसरू लागल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

ठळक मुद्दे: गावी सोडण्यासाठी राज्याच्या आदेशाची प्रतीक्षा

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : जेईई’, ‘नीट’सह,  अन्य प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोटा (राजस्थान) येथे गेलेले महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी सध्या तिथेच अडकून पडले आहेत. तिथे ह्यकोरोनाह्णचा संसर्ग वाढू लागल्याने केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्याचे आदेश दिल्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, गुजरात राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांतील विद्यार्थ्यांना तेथून नेले आहे. मात्र महाराष्टÑ सरकारने अद्याप आदेश न दिल्याने या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, आदींकडे जाण्यासाठी पूर्वतयारी परीक्षा द्यावी लागते. पूर्वतयारी परीक्षेच्या अभ्यासाची देशात अनेक केंद्रे आहेत. त्यांपैकी देशातील आजच्या घडीला सर्वांत नावाजलेले केंद्र हे राजस्थानमधील ह्यकोटाह्ण हे आहे. येथे मोठे खासगी क्लासेस आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थी तेथे अभ्यासासाठी येतात. विद्यार्थी आपल्या मूळ गावी अकरावी व बारावीचे प्रवेश घेतात आणि पूर्वतयारीच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी ह्यकोटाह्ण येथील विविध क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. विद्यार्थी दोन वर्षे तिथे राहून अभ्यास करतात. गेले महिनाभर ह्यकोरोनाह्णचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुलांसह पालक हवालदिल झाले आहेत. या मुलांना आपापल्या गावी पाठवावे, असे आदेश केंद्र सरकारने काढल्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल यांनी आपापली मुले नेली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने तर स्वतंत्र रेल्वे पाठवून या मुलांना नेले. गुजरात सरकारने आता त्यांना नेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी येथे अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होत आहेच; मात्र या परिसरात ह्यकोरोनाह्ण पाय पसरू लागल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ३० विद्यार्थीकोल्हापुरातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तिथे गेले आहेत. शिरोळ, इचलकरंजी, राजारामपुरी, कोल्हापूर शहर, हरपवडे, खुपिरे, गोठे येथील विद्यार्थ्यांसह काहीजणांचे पालकही अडकले आहेत.पी. एन. पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चाया विद्यार्थ्यांना गावी पाठविण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार पी. एन. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

‘कोटा’ परिसरात ‘कोरोना’चा संसर्ग वाढू लागल्याने इतर राज्यांनी आपापले विद्यार्थी नेले आहेत. महाराष्ट सरकारनेही तातडीने राज्यातील मुले हलविण्याबाबत निर्णय घ्यावा.- शिवाजी पाटील (पालक, खुपिरे)-

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा