शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

४५ हजार शेतकरी व्याज सवलतीला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:51 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेशी संलग्न सुमारे ४५ हजार शेतकरी यावर्षी सरकारच्या ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेशी संलग्न सुमारे ४५ हजार शेतकरी यावर्षी सरकारच्या व्याज सवलतीला मुकले आहेत. जूनअखेर जिल्हा बॅँकेची १४३३ कोटी वसुली झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण कमी आहे. सरकारच्या कर्जमाफीचा परिणाम वसुलीवर झाल्याने बॅँकेपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.जिल्हा बॅँक विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. बॅँकेच्या धोरणानुसार एकरी पीक कर्ज दिले जाते. त्याचबरोबर पाईपलाईन, शेती अवजारे खरेदीसाठी मध्यम मुदत, तर इतर गरजांसाठी शेतकऱ्यांना ‘खावटी’ कर्जपुरवठा केला जातो. बॅँकेने २०१८-१९ या वर्षात तिन्ही कर्जप्रकारांत दोन लाख ९८ हजार शेतकºयांना १६९२ कोटींचे कर्जवाटप केले आहे. जिल्ह्णात ऊस उत्पादक शेतकरी अधिक असल्याने जून ते जून असे परतफेडीचे वर्ष धरले आहे. या कालावधीत कर्जाची परत करणाºया एक लाखापर्यंतच्या शेतकºयांना संपूर्ण व्याज परतावा मिळतो. एक ते तीन लाखांपर्यंतच्या शेतकºयांकडून केवळ एक टक्का व्याज वसूल केले जाते. तीन लाखांपेक्षा अधिक व मध्यम मुदत, खावटी कर्जाला विकास संस्थांचा प्रचलित व्याजदर आकारला जातो.गेल्या वर्षी जिल्हा बॅँकेने १५७० कोटींचे कर्जवाटप केले होते. त्यांपैकी १३८८ कोटी (८८ टक्के) जूनअखेर वसूल झाले होते. यंदा वाटप केलेल्या १६९२ कोटींपैकी १४३३ कोटी (८४ टक्के) वसूल झाले आहेत. राज्य सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) गेली दोन वर्षे सुरू आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने थकीत कर्जाची माहिती विकास संस्थांकडून घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच मंत्र्यांकडून होत असल्याने शेतकºयांमध्ये कर्ज परतफेडीबाबत संभ्रम आहे.