शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४५ टक्के विद्यार्थ्यांचा ‘स्वाध्याय’वर अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यासाठी स्वाध्याय (स्टुंडटस व्हॉटस्ॲप बेसड डिजिटल होम ...

कोल्हापूर : राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यासाठी स्वाध्याय (स्टुंडटस व्हॉटस्ॲप बेसड डिजिटल होम असेसमेंट) उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची सुरूवात गेल्या वर्षी कोरोनाच्या कालावधीत झाली. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ टक्के विद्यार्थ्यांचा ‘स्वाध्याय’वर अभ्यास सुरू आहे.

गेल्या वर्षी दि. १४ नोव्हेंबर रोजी सुरू झालेला ‘स्वाध्याय’ हा उपक्रम मराठी, गणित, विज्ञान विषयाच्या आणि मराठी, सेमी इंग्रजी, उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना दर शनिवारी व्हॉटस्ॲपद्वारे स्वाध्याय उपलब्ध होतो. तो पूर्ण करण्यासाठी त्यांना एक आठवड्याचा कालावधी दिला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीची एकूण विद्यार्थी संख्या ५,७९,४५१ आहे. त्यापैकी आतापर्यंत २,४६,२३६ जणांनी स्वाध्यायासाठी नोंदणी केली आहे. त्यातील २,३५,७३९ जण स्वाध्याय सोडवत आहेत. या उपक्रमात राज्यामध्ये कोल्हापूर हे विद्यार्थी संख्येमध्ये चौथ्या आणि पटसंख्येच्या टक्केवारीमध्ये नवव्या क्रमाकांवर आहे. या उपक्रमामुळे अभ्यासाचा सराव, उजळणीला मदत होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.

पॉंईटर्स

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी :५,७९,४५१

स्वाध्यायासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : २,४६,२३६

स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी :२,३५,७३९

प्रतिक्रिया

स्वाध्याय उपक्रम सुरू झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा राज्यात १९ व्या क्रमाकांवर होता. आता विद्यार्थी संख्येनुसार चौथ्या, तर पटसंख्येनुसार नवव्या क्रमाकांवर आहे. टॉप-थ्रीमध्ये पोहोचण्यासाठी आमचे सातत्याने काम सुरू आहे.

-संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

स्वाध्याय हा विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची शिक्षकांनी नोंदणी करावी.

-किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय संपादवणूक सर्व्हेक्षणाच्या तयारीसाठी ‘स्वाध्याय’ महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची या उपक्रमात नोंदणी करण्यासह त्यांच्याकडून स्वाध्याय सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

-डॉ. आय. सी. शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.

विद्यार्थी म्हणतात

स्वाध्याय सोडविल्याने शिकविलेल्या धडा, कविता बाबतची अधिक माहिती मिळते. त्याचा अभ्यासासाठी चांगली मदत होते.

-शिवम बोबडे, दहावी, अयोध्या पार्क

गेल्या आठवड्यात मी पहिल्यांदा स्वाध्याय सोडविला. खूप छान वाटले. त्यामुळे अभ्यासाची उजळणी, सराव होतो.

-प्रगती हंजे, नववी, शाहपुरी

चौकट

ऊर्दूचे ४,५०२ विद्यार्थी

जिल्ह्यात या उपक्रमातील मराठी माध्यमातील विद्यार्थी संख्या २,४२,२६७ आहे. त्यात ऊर्दू माध्यमाचे ४,५०२ विद्यार्थी आहेत.