शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

४१६ ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर

By admin | Updated: March 29, 2015 00:14 IST

राज्य आयोगाचे आदेश : जुलैपर्यंत निवडणुका होणार; नेत्यांत खळबळ

 कोल्हापूर : आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी पुढे ढकलल्या. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. मे, जून व जुलैमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी मात्र ठरल्याप्रमाणे २२ एप्रिलला मतदान होणार आहे. उन्हाळी सुट्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा, नाशिक येथील कुंभमेळ्यामुळे पुरेसे पोलीस बळ उपलब्ध नाही, आदी कारणांस्तव निवडणुका पुढे ढकलत असल्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाच्या सहायक आयुक्त पूनम शिरसोळकर यांनी दिले. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. २४) जून ते सप्टेंबर महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींचा व ४२ पोटनिवडणुकांचा समावेश होता; परंतु शनिवारी अचानक राज्य निवडणूक आयोगाने आदेशामध्ये बदल करीत फक्त जून व जुलै महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाच होतील असे जाहीर केले. जिल्ह्यात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांत मुदत संपणाऱ्या ४१६ ग्रामपंचायती आहेत. त्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अचानक निर्णय झाल्याने खळबळ उडाली. निवडणुका का पुढे ढकलल्या, याबाबत दिवसभर चर्चेला ऊत आला. उन्हाळी सुट्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा, नाशिक येथील कुंभमेळ्यामुळे पुरेसे पोलीस बळ उपलब्ध होण्यात अडचणी असे कारण आयोगाने दिले आहे. (प्रतिनिधी)