शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

४१६ ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर

By admin | Updated: March 29, 2015 00:14 IST

राज्य आयोगाचे आदेश : जुलैपर्यंत निवडणुका होणार; नेत्यांत खळबळ

 कोल्हापूर : आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी पुढे ढकलल्या. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. मे, जून व जुलैमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी मात्र ठरल्याप्रमाणे २२ एप्रिलला मतदान होणार आहे. उन्हाळी सुट्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा, नाशिक येथील कुंभमेळ्यामुळे पुरेसे पोलीस बळ उपलब्ध नाही, आदी कारणांस्तव निवडणुका पुढे ढकलत असल्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाच्या सहायक आयुक्त पूनम शिरसोळकर यांनी दिले. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. २४) जून ते सप्टेंबर महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींचा व ४२ पोटनिवडणुकांचा समावेश होता; परंतु शनिवारी अचानक राज्य निवडणूक आयोगाने आदेशामध्ये बदल करीत फक्त जून व जुलै महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाच होतील असे जाहीर केले. जिल्ह्यात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांत मुदत संपणाऱ्या ४१६ ग्रामपंचायती आहेत. त्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अचानक निर्णय झाल्याने खळबळ उडाली. निवडणुका का पुढे ढकलल्या, याबाबत दिवसभर चर्चेला ऊत आला. उन्हाळी सुट्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा, नाशिक येथील कुंभमेळ्यामुळे पुरेसे पोलीस बळ उपलब्ध होण्यात अडचणी असे कारण आयोगाने दिले आहे. (प्रतिनिधी)