शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
4
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
5
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
6
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
7
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
8
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
9
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
10
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
11
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
12
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
13
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
14
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
15
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
16
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
17
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
18
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
19
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
20
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय

तीन मुलींच्या विवाहासाठी ४०० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 22:34 IST

कोल्हापुरातील बालकल्याण संकुल : मुलांचे लग्न जमविणे झाले कठीणइंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुलींची कमी संख्या आणि वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाह जमविणे ही सध्या मोठी समस्या झाली आहे. येथील बालकल्याण संकुलातील मुलींशी विवाह करण्यासाठी ४०० मुलांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, सध्या केवळ तीनच मुली बोहल्यावर चढण्यास तयार असून, ...

ठळक मुद्दे मुलगी एक-दोन स्थळांची निवड करते. विवाहाला मान्यता मिळून संस्थेत थाटात लग्न लावून दिले जातेसध्या येथे अठरा ते बावीस वयोगटातील २२ मुली आहेत.केवळ तीनच मुली बोहल्यावर चढण्यास तयार

कोल्हापुरातील बालकल्याण संकुल : मुलांचे लग्न जमविणे झाले कठीणइंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुलींची कमी संख्या आणि वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाह जमविणे ही सध्या मोठी समस्या झाली आहे. येथील बालकल्याण संकुलातील मुलींशी विवाह करण्यासाठी ४०० मुलांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, सध्या केवळ तीनच मुली बोहल्यावर चढण्यास तयार असून, त्यांना ४०० उपवरांमधून भावी पतीदेवांची निवड करावी लागणार आहे.मंगळवार पेठेतील ‘बालकल्याण संकुला’मधील संस्थेत नवजात बाळापासून ते अठरा वर्षांपर्यंतची २०० मुले-मुली राहतात. अठरा वयापुढील मुलींसाठी आधारगृह चालविले जाते. सध्या येथे अठरा ते बावीस वयोगटातील २२ मुली आहेत. त्यांपैकी १९ मुली वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत; तर तीन मुलींचे शिक्षण पूर्ण झाले असून, त्यांनी विवाहासाठी तयारी दर्शविली आहे. या तीन मुलींना ४०० अर्जांतून आपल्यासाठी सुयोग्य वराची निवड करावी लागणार आहे.साधारणत: १९८५ साली संस्थेतील पहिल्या मुलीचे लग्न झाले. त्यानंतर आजपर्यंत ७० मुलींचे विवाह झाले असून, त्या सुखाने संसार करीत आहेत. संस्थेतील किमान तीन-चार मुलींचे वर्षाला विवाह होतात. त्यांचा सगळा खर्च संस्था आणि देणगीदारांतर्फे केला जातो.अशी होते वराची निवड...मुलाने निर्व्यसनी असले पाहिजे, कुटुंब सुशिक्षित व अनाथ मुलीचा मनापासून स्वीकार करणारे असले पाहिजे, स्वत:चे चांगले घर हवे, नोकरी सरकारी किंवा खासगी असली तरी चांगला पगार हवा, शेती असेल तर उत्तमच; किंवा आणखी काही संपत्ती असणे अपेक्षित आहे. या अपेक्षेनुसार आलेल्या अर्जांमधून मुलीसाठी योग्य ठरू शकतील अशा पाच-सहा मुलांचे अर्ज मुलीला दिले जातात. त्यातून मुलगी एक-दोन स्थळांची निवड करते. त्यानंतर संबंधित कुटुंबाला हे कळवून मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो. दोघांकडून होकार आला की मुलीसोबत संस्थेचे पदाधिकारी जाऊन मुलाचे घर, परिसर, गाव बघून येतात. त्याला मुलीकडून होकार आला तरच पुढची बोलणी होतात. मुलगा-मुलगीची आरोग्य तपासणी करून तिचा अहवाल, मुलाच्या संपत्तीची कागदपत्रे, मुलाचे व आई-वडिलांचे संमतीपत्र व विवाहाचा प्रस्ताव महिला व बालकल्याण विभागाला पाठविला जातो. त्यांच्या शंकांचे निरसन झाले की विवाहाला मान्यता मिळून संस्थेत थाटात लग्न लावून दिले जाते. 

ही संस्था म्हणजे मुलींचे माहेरच आहे. तिला स्वयंपाकापासून ते आर्थिक व्यवहार, संसार चालविण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी शिकविल्या जातात.- पद्मजा तिवले, मानद कार्यवाह, बालकल्याण संकुल