शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुलींच्या विवाहासाठी ४०० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 22:34 IST

कोल्हापुरातील बालकल्याण संकुल : मुलांचे लग्न जमविणे झाले कठीणइंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुलींची कमी संख्या आणि वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाह जमविणे ही सध्या मोठी समस्या झाली आहे. येथील बालकल्याण संकुलातील मुलींशी विवाह करण्यासाठी ४०० मुलांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, सध्या केवळ तीनच मुली बोहल्यावर चढण्यास तयार असून, ...

ठळक मुद्दे मुलगी एक-दोन स्थळांची निवड करते. विवाहाला मान्यता मिळून संस्थेत थाटात लग्न लावून दिले जातेसध्या येथे अठरा ते बावीस वयोगटातील २२ मुली आहेत.केवळ तीनच मुली बोहल्यावर चढण्यास तयार

कोल्हापुरातील बालकल्याण संकुल : मुलांचे लग्न जमविणे झाले कठीणइंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुलींची कमी संख्या आणि वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाह जमविणे ही सध्या मोठी समस्या झाली आहे. येथील बालकल्याण संकुलातील मुलींशी विवाह करण्यासाठी ४०० मुलांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, सध्या केवळ तीनच मुली बोहल्यावर चढण्यास तयार असून, त्यांना ४०० उपवरांमधून भावी पतीदेवांची निवड करावी लागणार आहे.मंगळवार पेठेतील ‘बालकल्याण संकुला’मधील संस्थेत नवजात बाळापासून ते अठरा वर्षांपर्यंतची २०० मुले-मुली राहतात. अठरा वयापुढील मुलींसाठी आधारगृह चालविले जाते. सध्या येथे अठरा ते बावीस वयोगटातील २२ मुली आहेत. त्यांपैकी १९ मुली वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत; तर तीन मुलींचे शिक्षण पूर्ण झाले असून, त्यांनी विवाहासाठी तयारी दर्शविली आहे. या तीन मुलींना ४०० अर्जांतून आपल्यासाठी सुयोग्य वराची निवड करावी लागणार आहे.साधारणत: १९८५ साली संस्थेतील पहिल्या मुलीचे लग्न झाले. त्यानंतर आजपर्यंत ७० मुलींचे विवाह झाले असून, त्या सुखाने संसार करीत आहेत. संस्थेतील किमान तीन-चार मुलींचे वर्षाला विवाह होतात. त्यांचा सगळा खर्च संस्था आणि देणगीदारांतर्फे केला जातो.अशी होते वराची निवड...मुलाने निर्व्यसनी असले पाहिजे, कुटुंब सुशिक्षित व अनाथ मुलीचा मनापासून स्वीकार करणारे असले पाहिजे, स्वत:चे चांगले घर हवे, नोकरी सरकारी किंवा खासगी असली तरी चांगला पगार हवा, शेती असेल तर उत्तमच; किंवा आणखी काही संपत्ती असणे अपेक्षित आहे. या अपेक्षेनुसार आलेल्या अर्जांमधून मुलीसाठी योग्य ठरू शकतील अशा पाच-सहा मुलांचे अर्ज मुलीला दिले जातात. त्यातून मुलगी एक-दोन स्थळांची निवड करते. त्यानंतर संबंधित कुटुंबाला हे कळवून मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो. दोघांकडून होकार आला की मुलीसोबत संस्थेचे पदाधिकारी जाऊन मुलाचे घर, परिसर, गाव बघून येतात. त्याला मुलीकडून होकार आला तरच पुढची बोलणी होतात. मुलगा-मुलगीची आरोग्य तपासणी करून तिचा अहवाल, मुलाच्या संपत्तीची कागदपत्रे, मुलाचे व आई-वडिलांचे संमतीपत्र व विवाहाचा प्रस्ताव महिला व बालकल्याण विभागाला पाठविला जातो. त्यांच्या शंकांचे निरसन झाले की विवाहाला मान्यता मिळून संस्थेत थाटात लग्न लावून दिले जाते. 

ही संस्था म्हणजे मुलींचे माहेरच आहे. तिला स्वयंपाकापासून ते आर्थिक व्यवहार, संसार चालविण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी शिकविल्या जातात.- पद्मजा तिवले, मानद कार्यवाह, बालकल्याण संकुल