शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार वार्षिक उत्पन्न तरच्े२ा मिळेल कर्ज

By admin | Updated: October 27, 2016 19:23 IST

जाचक नियमांची बेडी : दाखला मिळणे अशक्य, अशी अट

विश्वास पाटील --कोल्हापूर -अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे स्थापनेपासून एकच बीज भांडवल कर्ज योजना सुरूअसून, त्याचे कर्ज मिळविण्यासाठी केलेले पात्रतेचे निकष म्हणजे ते कर्ज कसे मिळणार नाही याचाच बंदोबस्त केल्याचा अनुभव राज्यभरातील तरुणांचा आहे. ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ४० हजार (शहरांत ५५ हजार) रुपये आहे, त्यांनाच हे कर्ज मिळू शकते. ग्रामीण भागात शेतमजुरालाही सरासरी १५० रुपये हजेरी मिळते. त्यामुळे एवढ्या कमी उत्पन्नाचा दाखलाच मिळत नसल्याने लाभार्थी हा पहिल्याच अटीमध्ये बसत नाही. त्यामुळे महामंडळाच्या लाभाचा दरवाजा तिथेच बंद होतो.कोल्हापूरसारख्या एका जिल्ह्याच्या ठिकाणी रोज सरासरी तीन तरुण या महामंडळाच्या योजनेबद्दल माहिती विचारण्यासाठी कौशल्य विकास कार्यालयात येतात. याचा अर्थ महामंडळाच्या कर्ज योजनेची लोकांना गरज आहे; परंतु त्याच्या कर्ज पात्रतेचे निकषच एवढे कालबाह्य आहेत की त्याचा तरुणांना लाभच मिळत नाही. मागच्या दहा वर्षांत ग्रामीण भागातील जीवनमान सुधारले आहे. सुशिक्षित तरुण नोकरी नसली तरी काहीतरी छोटा-मोठा उद्योग करून आयुष्य घडवीत आहेत. त्यांना राष्ट्रीयीकृत बँका सहजासहजी दारात उभ्या करून घेत नाहीत. त्यामुळे अशा तरुणांसाठी हे महामंडळ खरे तर आधारवड बनायला हवे होते; परंतु तेच महामंडळ निराधार बनले आहे. महामंडळाचे एकच मुंबईत मुख्य कार्यालय आहे. त्यांचे स्वत:चे राज्यात कुठेच कार्यालय नाही, अधिकारीही नाही. सध्या या महामंडळाचे काम जिल्हा कौैशल्य विकास कार्यालयातून चालते. त्यामुळे महामंडळाचा कुठेही फलक नाही. या कार्यालयातील वर्ग-३ चा ज्याला इतर काही काम जमत नाही असा एखादा कर्मचारीच या महामंडळाचा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतो. त्यामुळे त्याच्याकडे काही माहिती जाणून घेण्यासाठी तरुण जातात तेव्हा तो काम करण्यापेक्षा मुंबईकडे बोट दाखवून रिकामा होतो. या महामंडळासह राज्य शासनातर्फे इतर दुर्बल व मागास घटकांतील समाजासाठी पंधरा महामंडळे आहेत; परंतु त्यांची त्रिस्तरीय रचना आहे. मुंबईत मुख्यालय, विभागीय आणि जिल्हा स्तरावर सक्षम दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांना प्रतिवर्षी उद्दिष्ट निश्चित करून दिले जाते.जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरील समन्वय समितीच्या बैठकीत आढावा घेतला जातो. या महामंडळासही प्रतिवर्षी एका जिल्ह्यास शंभरपासून ते तीनशेपर्यंत कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट दिले जाते; परंतु त्यातील दोनच प्रकरणे कशीबशी मंजूर होतात. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कधी विचारणा केल्यास धोरणात्मक बाबींमुळे कर्जप्रकरणे मंजूर करता येत नसल्याचे उत्तर दिले जाते. परंतु, ही धोरणात्मक अडचण बदलण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला नाही. त्यामुळे ४० हजारांची उत्पन्नाची अट २००३ पासून आहे ती आजही तशीच आहे. एवढे वार्षिक उत्पन्न असलेला तलाठ्याचा दाखला मिळत नाही त्यामुळे पहिल्याच पायरीवर तुम्ही कर्ज प्रकरणातून हद्दपार होता असाच अनुभव अनेक वर्षे तरुण घेत आले आहेत.आण्णासाहेब पाटील महामंडळ