शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

जिल्हा परिषदेच्या ४० शाळा गळक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:29 IST

रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी ...

रमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या गळक्या व मोडतोड झालेल्या शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव करवीर पंचायत समितीकडे पाठविले आहेत. १७ जूनला शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी या शाळांची दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा मुख्याध्यापकांकडून व्यक्त होत आहे. या सर्व शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.तालुक्यात एकूण १७९ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये शिक्षकांची संख्या ११२७ इतकी आहे. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या २८ हजार ९५७ इतकी आहे. दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येकवर्षी वाढत असताना काही वेळा या गळक्या शाळेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थित राहण्यावर होतो. त्यामुळे शाळा दुरुस्तीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.याबाबत शिंगणापूर येथे नुकतीच करवीर तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांची विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीतील चर्चेदरम्यान पावसाळा तोंडावर आल्याने शाळांची दुरुस्ती व त्यासाठी लागणारा निधी यावर चर्चा झाली. त्यात ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेची सद्य:परिस्थिती कथन करून या शाळा दुरुस्त करून मिळाव्यात, अशी मागणी लेखी स्वरूपात गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली.या शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद स्वनिधी व जिल्हा नियोजन समिती या तीन विभागांकडून निधी प्राप्त होतो. सध्या पंचायतीकडे शाळा दुरुस्तीसाठी ४० प्रस्ताव आले आहेत. त्यातील सर्व शिक्षा अभियान, मुंबई यांच्याकडे १८ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर या शाळांची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच काही शाळांची दुरुस्ती १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहेत. काही ग्रामपंचायतींनी सध्या शाळा दुरुस्तीची कामे हाती घेतलेलीआहेत.तालुक्यात सध्या मोडकळीस आलेल्या व २५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या, तसेच शिवाजी विद्यापीठाकडून केलेल्या स्ट्रक्चर आॅडिटमध्ये नवीन शाळा उभारण्यासाठी प्रमाणपत्र दिलेल्या ११ शाळांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यात कोथळी पासार्डे, मांढरे , शिंगणापूर, गांधीनगर या शाळांना मंजुरी मिळाली आहे. तर कन्या उचगाव, कुमार वाशी, माळुंगे, धोंडेवाडी या शाळांच्या मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरूआहे.