शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

जिल्हा परिषदेच्या ४० शाळा गळक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:29 IST

रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी ...

रमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या गळक्या व मोडतोड झालेल्या शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव करवीर पंचायत समितीकडे पाठविले आहेत. १७ जूनला शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी या शाळांची दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा मुख्याध्यापकांकडून व्यक्त होत आहे. या सर्व शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.तालुक्यात एकूण १७९ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये शिक्षकांची संख्या ११२७ इतकी आहे. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या २८ हजार ९५७ इतकी आहे. दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येकवर्षी वाढत असताना काही वेळा या गळक्या शाळेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थित राहण्यावर होतो. त्यामुळे शाळा दुरुस्तीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.याबाबत शिंगणापूर येथे नुकतीच करवीर तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांची विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीतील चर्चेदरम्यान पावसाळा तोंडावर आल्याने शाळांची दुरुस्ती व त्यासाठी लागणारा निधी यावर चर्चा झाली. त्यात ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेची सद्य:परिस्थिती कथन करून या शाळा दुरुस्त करून मिळाव्यात, अशी मागणी लेखी स्वरूपात गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली.या शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद स्वनिधी व जिल्हा नियोजन समिती या तीन विभागांकडून निधी प्राप्त होतो. सध्या पंचायतीकडे शाळा दुरुस्तीसाठी ४० प्रस्ताव आले आहेत. त्यातील सर्व शिक्षा अभियान, मुंबई यांच्याकडे १८ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर या शाळांची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच काही शाळांची दुरुस्ती १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहेत. काही ग्रामपंचायतींनी सध्या शाळा दुरुस्तीची कामे हाती घेतलेलीआहेत.तालुक्यात सध्या मोडकळीस आलेल्या व २५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या, तसेच शिवाजी विद्यापीठाकडून केलेल्या स्ट्रक्चर आॅडिटमध्ये नवीन शाळा उभारण्यासाठी प्रमाणपत्र दिलेल्या ११ शाळांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यात कोथळी पासार्डे, मांढरे , शिंगणापूर, गांधीनगर या शाळांना मंजुरी मिळाली आहे. तर कन्या उचगाव, कुमार वाशी, माळुंगे, धोंडेवाडी या शाळांच्या मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरूआहे.