शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

जिल्हा परिषदेच्या ४० शाळा गळक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:29 IST

रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी ...

रमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या गळक्या व मोडतोड झालेल्या शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव करवीर पंचायत समितीकडे पाठविले आहेत. १७ जूनला शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी या शाळांची दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा मुख्याध्यापकांकडून व्यक्त होत आहे. या सर्व शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.तालुक्यात एकूण १७९ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये शिक्षकांची संख्या ११२७ इतकी आहे. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या २८ हजार ९५७ इतकी आहे. दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येकवर्षी वाढत असताना काही वेळा या गळक्या शाळेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थित राहण्यावर होतो. त्यामुळे शाळा दुरुस्तीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.याबाबत शिंगणापूर येथे नुकतीच करवीर तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांची विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीतील चर्चेदरम्यान पावसाळा तोंडावर आल्याने शाळांची दुरुस्ती व त्यासाठी लागणारा निधी यावर चर्चा झाली. त्यात ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेची सद्य:परिस्थिती कथन करून या शाळा दुरुस्त करून मिळाव्यात, अशी मागणी लेखी स्वरूपात गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली.या शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद स्वनिधी व जिल्हा नियोजन समिती या तीन विभागांकडून निधी प्राप्त होतो. सध्या पंचायतीकडे शाळा दुरुस्तीसाठी ४० प्रस्ताव आले आहेत. त्यातील सर्व शिक्षा अभियान, मुंबई यांच्याकडे १८ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर या शाळांची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच काही शाळांची दुरुस्ती १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहेत. काही ग्रामपंचायतींनी सध्या शाळा दुरुस्तीची कामे हाती घेतलेलीआहेत.तालुक्यात सध्या मोडकळीस आलेल्या व २५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या, तसेच शिवाजी विद्यापीठाकडून केलेल्या स्ट्रक्चर आॅडिटमध्ये नवीन शाळा उभारण्यासाठी प्रमाणपत्र दिलेल्या ११ शाळांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यात कोथळी पासार्डे, मांढरे , शिंगणापूर, गांधीनगर या शाळांना मंजुरी मिळाली आहे. तर कन्या उचगाव, कुमार वाशी, माळुंगे, धोंडेवाडी या शाळांच्या मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरूआहे.