शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

ऊस खरेदीकर माफीमुळे ३७२ कोटींचा फायदा

By admin | Updated: March 19, 2017 00:34 IST

अर्थसंकल्पातील तरतूद : कारखानदारांना दिलासा

कोल्हापूर : राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन वर्षांचा ऊस खरेदीकर माफ करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील साखर कारखान्यांना ३७२ कोटींचा फायदा होणार आहे.सरकारच्या या निर्णयामुळे अपुऱ्या ऊस उत्पादनाने अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा उसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. मागील दोन वर्षांतील उसाच्या उत्पादनाची तुलना केली, तर केवळ ३७२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर, सांगलीचा अपवाद वगळता उर्वरित जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम जेमतेम दोन महिनेच चालला. उसाच्या तुटवड्यामुळे हंगाम अडखळत चालला. परिणामी, कारखान्यांच्या उत्पादन खर्चात प्रतिटन २५० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक फटका बसला. अशा परिस्थितीतून कारखान्यांना सावरण्यासाठी ऊस खरेदीकर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हंगाम २०१५-१६ व २०१६-१७ असा दोन वर्षांचा खरेदीकर माफ केला आहे. मागील हंगामाचा विचार करायचा झाल्यास राज्यात ३७२ लाख टन उसाचे गाळप झाले. साधारणत: प्रतिटन १०० रुपये खरेदीकर माफ झाला, तर कारखान्यांना ३७२ कोटींची मदत होणार आहे. यंदाचे साखर उत्पादन व शिल्लक साखरेचा ताळमेळ घातला तर पुरेशी साखर आहे. आगामी काळात साखर आयातीबाबत राज्य सरकारने निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा साखर कारखानदारांकडून व्यक्त होत आहे.निर्यातीची अट शिथिलसाखर निर्यात करणाऱ्या कारखान्यांचा खरेदीकर माफ करण्याची अट होती; पण अर्थसंकल्पात निर्यातीची अट शिथिल केली असून, त्याचा फायदाही कारखान्यांना होणार आहे.ऊस खरेदीकर माफ करून सरकारने कारखान्यांना दिलासा दिला आहे. सध्या बाजारात साखरेचे दर चांगले आहेत; पण साखर आयातीबाबत सरकारचे धोरण असेच कायम पाहिजे. आयात शुल्क कमी केले तर पुन्हा दरावर परिणाम होईल. - पी. जी. मेढे (साखर तज्ज्ञ) विभागाला दीडशे कोटींचा फायदाकोल्हापूर विभागात यावर्षी एक कोटी ५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ऊस खरेदीकर माफीचा फायदा विभागाला साधारणत: दीडशे कोटी रुपये होऊ शकतो. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे शंभर कोटी रुपये करमाफीतून मिळू शकतात. सांगली जिल्ह्यात ५० लाख ३४ हजार ४५९ टन गाळप झाला असल्याने सुमारे ५० कोटी रुपयांचा लाभ या जिल्ह्यातील कारखान्यांना होणार आहे.