शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

ऊस खरेदीकर माफीमुळे ३७२ कोटींचा फायदा

By admin | Updated: March 19, 2017 00:34 IST

अर्थसंकल्पातील तरतूद : कारखानदारांना दिलासा

कोल्हापूर : राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन वर्षांचा ऊस खरेदीकर माफ करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील साखर कारखान्यांना ३७२ कोटींचा फायदा होणार आहे.सरकारच्या या निर्णयामुळे अपुऱ्या ऊस उत्पादनाने अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा उसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. मागील दोन वर्षांतील उसाच्या उत्पादनाची तुलना केली, तर केवळ ३७२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर, सांगलीचा अपवाद वगळता उर्वरित जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम जेमतेम दोन महिनेच चालला. उसाच्या तुटवड्यामुळे हंगाम अडखळत चालला. परिणामी, कारखान्यांच्या उत्पादन खर्चात प्रतिटन २५० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक फटका बसला. अशा परिस्थितीतून कारखान्यांना सावरण्यासाठी ऊस खरेदीकर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हंगाम २०१५-१६ व २०१६-१७ असा दोन वर्षांचा खरेदीकर माफ केला आहे. मागील हंगामाचा विचार करायचा झाल्यास राज्यात ३७२ लाख टन उसाचे गाळप झाले. साधारणत: प्रतिटन १०० रुपये खरेदीकर माफ झाला, तर कारखान्यांना ३७२ कोटींची मदत होणार आहे. यंदाचे साखर उत्पादन व शिल्लक साखरेचा ताळमेळ घातला तर पुरेशी साखर आहे. आगामी काळात साखर आयातीबाबत राज्य सरकारने निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा साखर कारखानदारांकडून व्यक्त होत आहे.निर्यातीची अट शिथिलसाखर निर्यात करणाऱ्या कारखान्यांचा खरेदीकर माफ करण्याची अट होती; पण अर्थसंकल्पात निर्यातीची अट शिथिल केली असून, त्याचा फायदाही कारखान्यांना होणार आहे.ऊस खरेदीकर माफ करून सरकारने कारखान्यांना दिलासा दिला आहे. सध्या बाजारात साखरेचे दर चांगले आहेत; पण साखर आयातीबाबत सरकारचे धोरण असेच कायम पाहिजे. आयात शुल्क कमी केले तर पुन्हा दरावर परिणाम होईल. - पी. जी. मेढे (साखर तज्ज्ञ) विभागाला दीडशे कोटींचा फायदाकोल्हापूर विभागात यावर्षी एक कोटी ५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ऊस खरेदीकर माफीचा फायदा विभागाला साधारणत: दीडशे कोटी रुपये होऊ शकतो. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे शंभर कोटी रुपये करमाफीतून मिळू शकतात. सांगली जिल्ह्यात ५० लाख ३४ हजार ४५९ टन गाळप झाला असल्याने सुमारे ५० कोटी रुपयांचा लाभ या जिल्ह्यातील कारखान्यांना होणार आहे.