शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

३७ हजार रेशनकार्ड बोगस

By admin | Updated: July 17, 2017 00:33 IST

३७ हजार रेशनकार्ड बोगस

दत्ता बिडकर । लोकमत न्यूज नेटवर्कहातकणंगले : तालुक्यामध्ये १ लाख ४ हजार रेशनकार्ड कुटुंबापैकी फक्त ६३ हजार कुटुंबांना धान्यपुरवठा सुरू असून जवळपास ३७ हजार रेशनकार्ड बोगस असण्याची शक्यता आहे. पुरवठा विभाग, धान्य दुकानदार आणि बोगस रेशनकार्ड काढून देणारे एजंट यांची साखळी या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रेशनच्या धान्य मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे तालुक्यामध्ये ३७ हजार रेशनकार्डधारकांना धान्याचा पुरवठाच होत नाही. यामुळे रेशन धान्यसाठी शासनाने सुरू केलेली बायोमेट्रीक यंत्रणा कुचकामी ठरत आहे.तालुका अडीच ब्लॉकचा असून, दोन विधानसभा या तालुक्यामध्ये येत आहेत. निलेवाडी - पारगावपासून रांगोळी - रेंदाळपर्यंत हा तालुका विस्तारला असून, सुशिक्षित कुटुंबाची संख्याही मोठी आहे. तालुक्यामध्ये एकूण १ लाख ४ हजार ५१ इतकी रेशन धान्य कुटुंब संख्या आहे. यापैकी अंत्योदय १४९९ बी.पी.एल. (दारिद्र्यरेषा) १७५१६ तर केशरी ४४६८५ अशी ६३ हजार ६०० इतकी संख्या तालुका पुरवठा विभागाकडे नोंद आहे. तर ३६ हजार ४०० इतकी रेशनकार्ड वितरीत झाली आहेत, मात्र त्यांचे धान्य कुटुंबांना मिळत नाही.रेशनकार्ड विभक्त केले किंवा या तालुक्यामधून दुसऱ्या तालुक्यामध्ये स्थलांतर झालेल्या कुटुंबांना रेशनधान्य दिलेच जात नाही. लग्न होऊन मुलगी सासरी गेल्यानंतर तिचे नाव एखाद्या कुटुंबाने वाढवून घेतले किंवा लहान मुलाची नावे रेशनकार्ड मध्ये वाढवून घेतली तरी रेशनधान्य दुकानदार या वाढीव युनिटचे धान्य देत नाही. पुरवठा विभागाकडून धान्य आले नाही, मी कोठून देणार, अशी भाषा वापरून कार्डधारकाला गप्प करतो. पुरवठा विभागाने नाव वाढवून दिलेले असते. विभक्त कार्ड किंवा स्थलांतर कार्डचा कोटा दुकानदाराला वाढवून दिलेला असताना दुकानदार यामध्ये ढपला पाडून कार्डधारकाला मग्रुरीची आणि टोकाची भाषा वापरत असल्यामुळे रेशन धान्यासाठी दररोज वादावादीचे प्रसंग घडत आहेत.शासनाने धान्य पुरवठ्यामधील गैरकारभार रोखण्यासाठी बायोमेट्रीक मिशनवर थम्पची सुविधा सुरु केली असली तरी ती कुचकामी ठरत आहे. रेशन धान्य दुकानदार कार्डधारकांना फसविण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, यावर निर्बंध घालण्याची गरज आहे . (पूर्वार्ध)तालुका पुरवठा विभाग प्रत्येक महिन्याला रेशन धान्य दुकानदार यांच्याकडून धान्य वाटपासाठी दुकानदारांना दिलेल्या कार्डकोट्याप्रमाणे शासकीय चलने रक्कम भरून घेऊन धान्य दुकानदाराला दुकानापर्यंत पोहोच करत असते, मात्र दुकानदार शासनाकडून धान्य मिळूनही रेशनकार्डधारकांना धान्य पुरवठा करत नाही. ग्रामीण भागामध्ये दोन, चार दिवस हेलपाटे मारल्यानंतर धान्य दिले जाते.