शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

३७ हजार रेशनकार्ड बोगस

By admin | Updated: July 17, 2017 00:33 IST

३७ हजार रेशनकार्ड बोगस

दत्ता बिडकर । लोकमत न्यूज नेटवर्कहातकणंगले : तालुक्यामध्ये १ लाख ४ हजार रेशनकार्ड कुटुंबापैकी फक्त ६३ हजार कुटुंबांना धान्यपुरवठा सुरू असून जवळपास ३७ हजार रेशनकार्ड बोगस असण्याची शक्यता आहे. पुरवठा विभाग, धान्य दुकानदार आणि बोगस रेशनकार्ड काढून देणारे एजंट यांची साखळी या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रेशनच्या धान्य मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे तालुक्यामध्ये ३७ हजार रेशनकार्डधारकांना धान्याचा पुरवठाच होत नाही. यामुळे रेशन धान्यसाठी शासनाने सुरू केलेली बायोमेट्रीक यंत्रणा कुचकामी ठरत आहे.तालुका अडीच ब्लॉकचा असून, दोन विधानसभा या तालुक्यामध्ये येत आहेत. निलेवाडी - पारगावपासून रांगोळी - रेंदाळपर्यंत हा तालुका विस्तारला असून, सुशिक्षित कुटुंबाची संख्याही मोठी आहे. तालुक्यामध्ये एकूण १ लाख ४ हजार ५१ इतकी रेशन धान्य कुटुंब संख्या आहे. यापैकी अंत्योदय १४९९ बी.पी.एल. (दारिद्र्यरेषा) १७५१६ तर केशरी ४४६८५ अशी ६३ हजार ६०० इतकी संख्या तालुका पुरवठा विभागाकडे नोंद आहे. तर ३६ हजार ४०० इतकी रेशनकार्ड वितरीत झाली आहेत, मात्र त्यांचे धान्य कुटुंबांना मिळत नाही.रेशनकार्ड विभक्त केले किंवा या तालुक्यामधून दुसऱ्या तालुक्यामध्ये स्थलांतर झालेल्या कुटुंबांना रेशनधान्य दिलेच जात नाही. लग्न होऊन मुलगी सासरी गेल्यानंतर तिचे नाव एखाद्या कुटुंबाने वाढवून घेतले किंवा लहान मुलाची नावे रेशनकार्ड मध्ये वाढवून घेतली तरी रेशनधान्य दुकानदार या वाढीव युनिटचे धान्य देत नाही. पुरवठा विभागाकडून धान्य आले नाही, मी कोठून देणार, अशी भाषा वापरून कार्डधारकाला गप्प करतो. पुरवठा विभागाने नाव वाढवून दिलेले असते. विभक्त कार्ड किंवा स्थलांतर कार्डचा कोटा दुकानदाराला वाढवून दिलेला असताना दुकानदार यामध्ये ढपला पाडून कार्डधारकाला मग्रुरीची आणि टोकाची भाषा वापरत असल्यामुळे रेशन धान्यासाठी दररोज वादावादीचे प्रसंग घडत आहेत.शासनाने धान्य पुरवठ्यामधील गैरकारभार रोखण्यासाठी बायोमेट्रीक मिशनवर थम्पची सुविधा सुरु केली असली तरी ती कुचकामी ठरत आहे. रेशन धान्य दुकानदार कार्डधारकांना फसविण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, यावर निर्बंध घालण्याची गरज आहे . (पूर्वार्ध)तालुका पुरवठा विभाग प्रत्येक महिन्याला रेशन धान्य दुकानदार यांच्याकडून धान्य वाटपासाठी दुकानदारांना दिलेल्या कार्डकोट्याप्रमाणे शासकीय चलने रक्कम भरून घेऊन धान्य दुकानदाराला दुकानापर्यंत पोहोच करत असते, मात्र दुकानदार शासनाकडून धान्य मिळूनही रेशनकार्डधारकांना धान्य पुरवठा करत नाही. ग्रामीण भागामध्ये दोन, चार दिवस हेलपाटे मारल्यानंतर धान्य दिले जाते.