शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

गैरसोयींमुळे ३७ शिक्षकांची जिल्ह्याबाहेर जाण्यास पसंती

By admin | Updated: December 12, 2014 23:37 IST

समायोजन सुरळीत : सन २०१३ नुसारच प्रक्रिया पूर्ण; शिक्षक संघटनांचा मात्र विरोध

कोल्हापूर : उच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने येथील मेन राजाराम हायस्कूल येथे आज, शुक्रवारी शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केली. २०१४ च्या पटसंख्येनुसार समायोजन करावे, ही संघटनेची मागणी झुगारून प्रशासनाने ३० सप्टेंबर २०१३ च्या पटसंख्येनुसार ६७ रिक्त जागांसाठी समायोजन प्रक्रिया राबवली. यावेळी जिल्ह्याबाहेर जाण्यास तयार असल्याचे ३७ शिक्षकांनी लेखी दिले. परिणामी, सर्व रिक्त जागा न भरल्याने पुन्हा समायोजनाची प्रक्रिया राबवावी लागेल.हक्काचे शिक्षण कायद्यानुसार ३० सप्टेंबर २०१३च्या पटसंख्येवर आधारित २४ जून २०१४ पासून अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू केली. ती १९ आॅगस्ट २०१४ पर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केली. नंतर अतिरिक्त अध्यापकांची समायोजन प्रक्रिया सुरू झाली. यावेळी शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांना ‘अतिरिक्त’च्या प्रक्रियेतून वगळले. मात्र, उपाध्यक्षांना न वगळल्याने एका शिक्षक संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात दावा दाखला केला. यामुळे न्यायालयाने दिलेली समायोजनाची स्थगिती मुंंबई उच्च न्यायालयाने उठविल्यामुळे आज समायोजनाची प्रक्रिया राबविली. आज अतिरिक्त असलेल्या २४२ अध्यापकांना समायोजनासाठी निमंत्रित केले होते.दरम्यान, सहा डोंगराळ तालुक्यांत ८७ रिक्त पदे आहेत. यामधील २०१३ च्या पटसंख्येवर आधारित ६७ रिक्त जागांवर समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केली. सन २०१३च्या पटसंख्येनुसार रिक्त असलेल्या पूर्ण ६७ रिक्त जागांवरील समायोजन पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांसाठी २०१४ च्या पटसंख्येवर आधारित समायोजन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.स्थगिती उठवल्यामुळे समायोजनाची प्रक्रिया २०१३ च्या पटसंख्येनुसार पूर्ण केली. समायोजनावेळी ३७ जणांनी पसंतीप्रमाणे शाळा न मिळाल्यामुळे जिल्ह्याबाहेर जाण्यास तयार असल्याचे लेखी दिले आहे. यामुळे रिक्त जागांवर पुढील टप्प्यात समायोजनाची प्रक्रिया राबवण्यात येईल. २०१३ च्या पटसंख्येनुसार समायोजन पूर्ण झाल्यानंतरच २०१४ च्या पटसंख्येनुसार समायोजन होईल.- स्मिता गौड, प्राथमिक शिक्षणाधिकारी.२०१४ नुसार समायोजनासाठी बेमुदत उपोषणाचा इशाराकोल्हापूर : अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सन २०१४-१५ च्या संच मान्यतेनुसार करावे, या मागणीसाठी गुरुवार (दि. १८) पासून येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे एका निवेदनाद्वारे प्राथमिक शिक्षण प्रशासनाला दिला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे सन २०१३-१४ चे प्रतीकात्मक समायोजन करून २०१४-१५ नुसार प्रत्यक्षात समायोजन करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. असे असताना प्राथमिक शिक्षण प्रशासनाने आज, शुक्रवारी २०१३-१४ सालातील समायोजन प्रक्रिया प्रत्यक्षात राबविली. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०० शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

गैरसोयींमुळे ३७ शिक्षकांची जिल्ह्याबाहेर जाण्यास पसंती