शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वर्षभरात ३६ संस्थांचे परवाने निलंबित

By admin | Updated: May 25, 2017 01:21 IST

अन्न व औषध विभागाची कारवाई : पाच लाखांच्या तडजोड शुल्काची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अन्न व औषध प्रशासनाच्या कोल्हापूर विभागातर्फे गेल्या वर्षभरात विविध आस्थापनांकडून अन्नाचे ३१९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यांपैकी प्रयोगशाळेने चाचणी केल्याअंती ३० नमुने मानवी सेवनास असुरक्षित असल्याचे अहवाल दिले आहेत, अशा प्रकरणी न्यायालयांत फौजदारी खटले दाखल करण्यात येत आहेत. एकूण ७६४ अन्न आस्थापनांची तपासणी करून त्यांपैकी ११९ संस्थांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आली. दोषांची पूर्तता न केल्याने ३६ संस्थांचे परवाने निलंबित करण्यात आले. तपासणीवेळी आढळलेल्या दोषांच्या अनुषंगाने नोंदणीधारक संस्थांकडून ५ लाख २७ हजार इतके तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. दुय्यम दर्जाच्या नमुन्याप्रकरणी नोंदणीधारक संस्थांकडून ४० हजार तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण ६० नमुने मिथ्याछाप व दुय्यम दर्जाचे घोषित झाल्याने याप्रकरणी कारवाईसाठी न्याय निर्णय अधिकारी पुणे यांच्याकडे सुनावणीसाठी खटले दाखल करण्यात आले. याप्रकरणी न्याय निर्णय अधिकारी यांनी भेसळ केलेल्या अन्न व्यावसायिकांना ६ लाख ४४ हजार इतका दंड भरण्याचा आदेश दिले. शासनाने प्रतिबंध केलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधी, तंबाखू, सुगंधी सुपारी व तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांचा शोध घेऊन ३५ ठिकाणी धाडी टाकल्या. यात ४२४९. ५१५ किलो प्रतिबंधित पदार्थांचा ४४ लाख ३ हजार ५७७ रुपये इतक्या किमतीचा साठा जप्त केला. हा साठा जाळून नष्ट करण्यात आला. प्रतिबंधित पदार्थ विक्री प्रकरणी न्यायालयात १४ फौजदारी खटले दाखल केले असून अन्य प्रकरणी कारवाई चालू आहे, अशी माहिती अन्न व औैषध प्रशासनाचे कोल्हापूर ग्रामीणचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले, कोल्हापूर शहरचे मोहन केंबळकर यांनी दिली.नागरिकांनीतक्रार करावीप्रतिबंधित व भेसळीचे अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध यापुढे अन्न व औषध प्रशासन कठोर कारवाई आहे. असे गैरप्रकार आढळून आल्यास या प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन सहायक आयुक्त चौगुले व केंबळकर यांनी केले.