शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांना ३५८ कोटींच्या खंडणीचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST

शरद यादव लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इंधन दरवाढीने वाढलेले मशागतीचे दर, रासायनिक खतांच्या दरातील जबरी वाढ, पुराच्या तडाख्याने ...

शरद यादव

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : इंधन दरवाढीने वाढलेले मशागतीचे दर, रासायनिक खतांच्या दरातील जबरी वाढ, पुराच्या तडाख्याने बुडालेली शेती, महागाई वाढल्याने मजुरीचे वाढलेल दर, यामुळे मेटाकुटीला आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात तोडणीसाठी खुशालीच्या नावाखाली तब्बल ३५८ कोटी ८७ लाख रुपयांचा चुना लागल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, १ कोटी ४३ लाख ५५ हजार टनाचे गाळप झाले आहे. कोयता लावायचा असेल तर किती देणार बोला, अशी अनिष्ट पद्धत जिल्हाभर फोपावली असून, याला वेळीच ब्रेक लागला नाही, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘बडा घर, पोकळ वासा’ अशी होण्यास वेळ लागणार नाही.

यंदा मजुरांची कमतरता आहे त्यामुळे ऊस वेळेत ताेडणे अवघड होईल, अशी हाकाटी हंगामाच्या सुरुवातीलाच ठोकण्यात आल्याने व कारखानदारांनी याकडे कानाडोळा केल्याने तोडणीवाल्यांचे चांगलेच फावल्याचे चित्र होते. त्यातच कारखान्यांची क्रमपाळी पत्रकाला ट्रॅक्टर मालक व चिटबॉय यांनी संगनमताने कात्रजचा घाट दाखविल्याने खुशालीची खंडणी केव्हा झाली, हे शेतकऱ्यांनाच कळले नाही. सुरुवातीला एकरी ३ हजार, नंतर ५ हजार व शेवटी तर १० हजारांपर्यंत हा खंडणीचा दर गेल्याने व आपली तक्रार कोणी ऐकूनच घेत नसल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांचा नाइलाज झाला. रोज तोडकऱ्यांना चहाबरेाबर बिस्कीट, तोडणीचे पैसे अगोदरच, तोडणी संपल्यावर एखादे जेवण, असा सारा खुशी खुशी खंडणीचा मामला जिल्हाभर सुरू झाला. यातून शेतकऱ्यांचा ३५८ कोटी रुपयांचा खिसा मारल्याचे पुढे आले आहे.

कोठूनही व कसाही आणा, पण ऊस आणा, असा विश्वामित्री पवित्रा बहुतेक सर्वच कारखानदारांनी घेतल्याने लुटणाऱ्यांचे आयतेच फावल्याचे दिसून येते. या लुटीच्या गँगमध्ये यापूर्वी गावातील ऊसतोड करणाऱ्या मजुरांचा सहभाग कमी असायचा. मात्र, यंदा त्यांनीही यात मागे न राहता वाहत्या गंगेत हात धुऊन घेतल्याचे पाहायला मिळाले.

खंडणीचा हा कर्करोग वेळीच थांबवला नाही, तर ऊस शेती परवडणार नाहीच, तसेच ऊस उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

...........

मशीनवालेही लागले लुटायला..

यंदा मजूर कमी आहेत म्हणून शेतकऱ्यांनी मशीनने ऊस तोडणीला प्राधान्य दिले; परंतु तेथेही काही संत असल्याचे चित्र नव्हते. रोज ५ ते ६ माणसांचे जेवण द्याच, त्याबराेबर एकरी दोन हजारही मोजा, असा हेका अनेक ठिकाणी मशीनवरील कर्मचाऱ्यांनी धरल्याने शेतकऱ्यांना ‘बुक्क्याचा मार मुक्याने’ खाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

............

कोट....

उसाला तोड आल्यावर फडकऱ्यांनी गाडीला चारशे रुपये दिल्याशिवाय फडाला हात लावणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे नाइलाजास्तव पैसे देऊन ऊस तोडून घेतला. कारखान्याकडून टनाला मिळणारा दर व त्यातून प्रत्येक गाडीमागे दिलेले फडकऱ्यांना पैसे वजा केले, तर टनाला दर किती पडला, याचा विचार करण्याची गरज आहे.

मिलिंद बाळकृष्ण पाटील, शेतकरी, कसबा बावडा.

...............

आतापर्यंत जिल्ह्यात झालेले गाळप

१ कोटी ४३ लाख ५५ हजार टन

प्रतिटनाला तोडणीसाठी बसलेली खंडणी

सुमारे २५० रुपये

यामुळे शेतकऱ्यांना बसलेला भुर्दंड

३५८ कोटी ८७ लाख