शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

३५ गळक्या शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 10, 2017 01:08 IST

करवीर तालुका : जिल्हा परिषदेस पाठविला प्रस्ताव; १५ जूनपर्यंत शाळा दुरुस्तीचे टार्गेट

रमेश पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क --कसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जि. प.च्या ३५ गळक्या शाळा सध्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत करवीर पंचायतीकडून जि. प.ला शाळा दुरुस्त करून मिळाव्यात म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अजून शाळा दुरुस्तीच्या हालचाली सुरू नाहीत.करवीरमध्ये जि. प.च्या सर्वांत जास्त १८३ शाळा आहेत. या शाळेत सुमारे २९ हजारांच्यावर विद्यार्थ्यांची संख्या आहे. बहुतेक शाळेचे वर्ग विद्यार्थ्यांच्या संख्येने खचाखच भरलेले असतात; परंतु पावसाळ्यात शाळांचे छत गळू लागले की, या विद्यार्थ्यांचे हाल सुरू होतात. काही वेळा शाळेतील दलदलीमुळे मुले आजारी पडतात. हे प्रत्येक वर्षीचे चित्र आहे. यंदाही अशी स्थिती उद्भवू नये म्हणून करवीर पंचायत समितीने शाळांची दुरुस्ती करून मिळावी म्हणून प्रस्ताव सादर केला आहे.शाळांच्या छताची कौले खराब होणे, काही वेळेला वादळी वाऱ्यांमुळे कौले उडून जाणे, शाळांच्या भिंती कोसळणे, फरशा उखडून पडणे, दरवाजे मोडलेल्या अवस्थेत असणे, अशा प्रकारे शाळांची दुरवस्था होेते. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती दिलेली असते; परंतु त्यातून पुढे काहीही निर्णय होत नसल्याचा शाळांना अनुभव आहे.सध्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा व सर्व शिक्षा अभियानामधून या शाळांची दुरुस्ती व्हावी म्हणून प्रस्ताव केला आहे. त्यासाठी सुमारे ३५ ते ४० लाख रुपये निधीची गरज भासणार असल्याचे समजते. साधारणत: जानेवारी व फेब्रुवारीमध्ये असे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.दरम्यान, शाळा दुरुस्त करून मिळाव्यात म्हणून पंचायत समितीकडून पाठविलेले जि. प.कडील प्रस्ताव जिल्हा परिषद जिल्हा नियामक मंडळाकडे पाठवून त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे याची माहिती देते. त्यानुसार निधी उपलब्ध झाल्यावर शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात; परंतु प्रत्येक वर्षी मागणीनुसार निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होत नसल्याचा अनुभव आहे. प्रस्ताव जास्त, अनुदान कमी शाळा दुरुस्तीसाठी जि. प.कडे तालुक्यातून अनेक प्रस्ताव येतात; परंतु त्या पटीत संबंधित विभागाकडून अनुदान प्राप्त होत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी अनेक शाळांची कामे अर्धवट अवस्थेत राहतात.करवीर पंचायतने जि. प.कडे शाळा दुरुस्तीसाठी पाठविलेला प्रस्ताव व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे. यंदा कसल्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासणार नाही.- प्रदीप झांबरे, सभापती, करवीर पंचायत समिती.येत्या १५ जूनपर्यंत शाळा दुरुस्ती करून घ्या, असा आदेश शाळांना दिला आहे. त्यानुसार शाळांची वेळेत दुरुस्ती होईल. निधीची कमतरता भासणार नाही.- राजेंद्र भालेराव, गटविकास अधिकारी, करवीर पंचायत समिती.