शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

‘कोटितीर्थ’वर ३५, ‘राजाराम’वर २५ मूर्तिदान

By admin | Updated: September 17, 2016 00:27 IST

उपनगरांतील मंडळांचा प्रतिसाद : गणेशमूर्तीचे दान करणाऱ्या मंडळांना मनपाकडून प्रमाणपत्र

कोल्हापूर : उपनगरांतील मंडळांनी मूर्तिदान उपक्रमास प्रतिसाद दिल्याने गुरुवारी कोटितीर्थ येथे ३५, तर राजाराम तलाव येथे २५ गणेशमूर्तींचे दान करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे निर्माल्य दान करून पर्यावरण चळवळीला बळ दिले. गणेशमूर्ती दान करणाऱ्या मंडळांना महापालिकेच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येत होते. दोन्ही ठिकाणी मंगलमय व शांततेमध्ये सार्वजनिक गणेशमूर्र्तींचे विसर्जन करण्यात आले. राजाराम तलाव येथे उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गडमुडशिंगी, मोरेवाडी, आर. के. नगर, दौलतनगर, सम्राटनगर, राजारामपुरी, टेंबलाईवाडी, विक्रमनगर परिसरातील मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यांपासून लगबग सुरू होती. राजाराम तलाव येथे मनपा प्रशासनाच्यावतीने मूर्तिदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. या ठिकाणी दान केलेल्या गणेशमूर्ती ठेवण्यासाठी विशेष मंडप उभारण्यात आले होते. दुपारी एकनंतर विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली. रात्री बारापर्यंत या ठिकाणी २५ तरुण मंडळांनी, तर ३४ घरगुती गणेशमूर्र्तींचे दान केले. या ठिकाणी पोलिस प्रशासनातर्फे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच अग्निशामक दलाचे फायरमन गणेश लकडे, नीतेश शिनगारे, दौलत रावराणे तैनात होते. रात्रीपर्यंत लहान-मोठ्या अशा ८५ गणेशमूर्र्तींचे विसर्जन करण्यात आले. कोटितीर्थ तलाव येथे राजारामपुरी परिसर, शाहूपुरी, जवाहरनगर, सम्राटनगर, यादवनगर, लक्ष्मीपुरी, सोमवार पेठ येथील बहुतांशी मंडळांनी या ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी मनपाच्यावतीने मूर्तिदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. रात्री एक वाजेपर्यंत या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते येत होते. या ठिकाणी ३५ मंडळांनी, तर १०० घरगुती गणेशमूर्तींचे दान करण्यात आले, तर ६७ मोठ्या मूर्तींचे विसर्जन कोटितीर्थ येथे करण्यात आले. (प्रतिनिधी)निर्माल्य दान १०० टक्के....‘पुरोगामी विचारांचे शहर’ म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात गेल्या काही वर्षांत गणेशमूर्ती दान व निर्माल्य दान या उपक्रमाला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणप्रेमी, महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या आवाहनाला आणि सातत्याने राबवित असलेल्या पर्यावरण प्रबोधनाच्या उपक्रमामुळे यंदा अनेक मंडळांनी निर्माल्य दान उपक्रमास १०० टक्के प्रतिसाद दिला. मंडळांकडून समाधान....कोटितीर्थ व राजाराम तलाव येथे गणेशमूर्ती दान करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने मंडप उभारले होते. गणेशमूर्ती दान करणाऱ्या मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येत होते. यासह या ठिकाणी प्रशासनांच्यावतीने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या या व्यवस्थेबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत होते.