शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

३१ कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:40 IST

विभागातील साखर हंगाम बंद : ‘कुंभी’, ‘शाहू’ दोन दिवसांत; तर ‘जवाहर’, ‘गुरुदत्त’ आठवड्यात संपणार

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील ३७ पैकी तब्बल ३१ सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम बंद झाला आहे. ‘कुंभी’, ‘शाहू’चा हंगाम येत्या दोन दिवसांत, तर ‘जवाहर’, ‘गुरुदत्त’ व ‘हुतात्मा’ या कारखान्यांची येत्या आठ दिवसांत धुराडी थंडावणार आहेत. पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन कमी मिळणार, असे आडाखे बांधत साखर कारखान्यांनी हंगामाची सुरुवात केली; पण उसाचे उत्पादन वाढत जाईल, तशी कारखान्यांची तारांबळ उडाली. उन्हामुळे शेवटच्या टप्प्यात उसाची उपलब्धता करताना सर्वच कारखान्यांच्या तोडणी यंत्रणेची दमछाक उडाली. गतवर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बहुतांश कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दि. २५ मार्चपर्यंत हंगाम संपला होता; पण यावर्षी दि. १ नोव्हेंबरला हंगाम सुरू होऊन दि. २० मार्चपर्यंत १५, मार्चअखेर १०, तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ७ कारखाने बंद झाले. गतवर्षीपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात साधारणत: दहा लाख टन, तर सांगली जिल्ह्यात सव्वादोन लाख असे सव्वा बारा लाख टन उसाचे उत्पादन जादा झाले असून, विभागातून २ कोटी ७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. उताऱ्यात ‘गुरुदत्त’चा दबदबा कायमसाखर उताऱ्यात ‘बिद्री’, ‘दालमिया’, ‘कुंभी’, ‘गुरुदत्त’ यांचाच वरचष्मा असतो; पण गेल्यावर्षी १३.३६ टक्के उतारा राखत ‘गुरुदत्त’ने आघाडी घेतली होती. यंदाही ‘गुरुदत्त’ने गळीत हंगामात १३.५३ टक्के उतारा ठेवून दबदबा कायम राखला आहे. सरासरी उतारा घटणारकोल्हापूर विभागाचा गतवर्षीचा सरासरी उतारा १२.५८ टक्के होता. त्यामध्ये कोल्हापूरचा १२.७७, तर सांगलीचा १२.२४ टक्के होता. यावर्षी कोल्हापूरचा १२.६०, तर सांगलीचा १२.०५ टक्के व विभागाचा सरासरी १२.४१ टक्के आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा उतारा घटण्याची शक्यता आहे.