शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

३१ कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:40 IST

विभागातील साखर हंगाम बंद : ‘कुंभी’, ‘शाहू’ दोन दिवसांत; तर ‘जवाहर’, ‘गुरुदत्त’ आठवड्यात संपणार

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील ३७ पैकी तब्बल ३१ सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम बंद झाला आहे. ‘कुंभी’, ‘शाहू’चा हंगाम येत्या दोन दिवसांत, तर ‘जवाहर’, ‘गुरुदत्त’ व ‘हुतात्मा’ या कारखान्यांची येत्या आठ दिवसांत धुराडी थंडावणार आहेत. पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन कमी मिळणार, असे आडाखे बांधत साखर कारखान्यांनी हंगामाची सुरुवात केली; पण उसाचे उत्पादन वाढत जाईल, तशी कारखान्यांची तारांबळ उडाली. उन्हामुळे शेवटच्या टप्प्यात उसाची उपलब्धता करताना सर्वच कारखान्यांच्या तोडणी यंत्रणेची दमछाक उडाली. गतवर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बहुतांश कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दि. २५ मार्चपर्यंत हंगाम संपला होता; पण यावर्षी दि. १ नोव्हेंबरला हंगाम सुरू होऊन दि. २० मार्चपर्यंत १५, मार्चअखेर १०, तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ७ कारखाने बंद झाले. गतवर्षीपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात साधारणत: दहा लाख टन, तर सांगली जिल्ह्यात सव्वादोन लाख असे सव्वा बारा लाख टन उसाचे उत्पादन जादा झाले असून, विभागातून २ कोटी ७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. उताऱ्यात ‘गुरुदत्त’चा दबदबा कायमसाखर उताऱ्यात ‘बिद्री’, ‘दालमिया’, ‘कुंभी’, ‘गुरुदत्त’ यांचाच वरचष्मा असतो; पण गेल्यावर्षी १३.३६ टक्के उतारा राखत ‘गुरुदत्त’ने आघाडी घेतली होती. यंदाही ‘गुरुदत्त’ने गळीत हंगामात १३.५३ टक्के उतारा ठेवून दबदबा कायम राखला आहे. सरासरी उतारा घटणारकोल्हापूर विभागाचा गतवर्षीचा सरासरी उतारा १२.५८ टक्के होता. त्यामध्ये कोल्हापूरचा १२.७७, तर सांगलीचा १२.२४ टक्के होता. यावर्षी कोल्हापूरचा १२.६०, तर सांगलीचा १२.०५ टक्के व विभागाचा सरासरी १२.४१ टक्के आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा उतारा घटण्याची शक्यता आहे.