कोल्हापूर : कोल्हापूरची करवीरनिवासीनी श्री आई अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्राणप्रतिष्ठापनेला रविवारी ३०६ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त यशराज घोरपडे (गजेंद्र गडकर सरकार वंशज), निखिल प्रधान (सावगावकर प्रधान वंशज) आणि श्री पूजक प्रतिनिधी म्हणून माधव मुनीश्वर या करवीरनिवासीनीच्या सेवेतील प्रमुख घराण्यांचा सत्कार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
अंबाबाई देवीच्या मुर्ती पुनर्प्राणप्रतिष्ठापनेचा इतिहास असा, मुघल काळात देवीची मूर्ती कपिल तीर्थाजवळ पुजाऱ्यांच्या घरी लपवून ठेवण्यात आली होती. ती करवीर छत्रपती संभाजी दुसरे यांच्या आज्ञेवरून व नरहरभट सावगावकर यांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे सिधोजी घोरपडे यांनी पुन्हा
२६ सप्टेंबर १७१५ ला करवीरनिवासीनी आई अंबाबाईच्या मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या घटनेला तब्बल ३०६ वर्षे पूर्ण झाली. ज्यांनी मूर्ती जपली ते जगदंबेचे पुजारी अशा सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण म्हणून गरुड मंडपात आई अंबाबाई देवीच्या सेवेतील प्रमुख घराण्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. दरम्यान, विद्यापीठ हायस्कूल प्रवेशद्वारलगत देवीच्या मूर्तीच्या पुनर्प्राणप्रतिष्ठेचा उल्लेख असणाऱ्या मोडी पत्र व मराठी लिप्यंतर यांच्या फलकाचे अनावरण झाले.
यावेळी चंद्रसेन जयसिंगराव खर्डेकर (सरकार), मंदिर अभ्यासक उमाकांत रानिंगा, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सहसचिव शीतल इंगवले,
मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, सुयश पाटील, मिलिंद घेवारी, धैर्यशील तिवले, आदी उपस्थित होते.
फोटो : २६०९२०२१ कोल अंबाबाई
ओळी : कोल्हापूरची करवीरनिवासिनी आई अंबाबाई देवीच्या मूर्ती पुनर्प्राणप्रतिष्ठापनेला रविवारी ३०६ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने विद्यापीठ हायस्कूल दक्षिण प्रवेशद्वारलगत देवीच्या मूर्तीच्या पुनर्प्राणप्रतिष्ठेचा उल्लेख असणाऱ्या मोडी पत्र व मराठी लिप्यंतर यांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.