शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

करवीरमधील ३० शाळा गळक्या

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

करवीर पंचायत मासिक सभा : सदस्यांचा आरोप; बांधकाम विभाग धारेवर

कसबा बावडा : करवीर तालुक्यातील ३० शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गळक्या शाळेमुळे मुले भिजायला लागली आहेत. बांधकाम विभागाने शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव न केल्यामुळे अशी परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत अनेक सदस्यांनी केला. अध्यक्षस्थानी सभापती दिलीप टिपुगडे होते. गळक्या, मोडकळीस आलेल्या व काही ठिकाणी पडझड झालेल्या तालुक्यातील ३० शाळांची सद्य:स्थिती दर्शवणारे फोटो काढून व ठराव करून मुख्याध्यापकांच्या सहीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले आहेत. हे प्रस्ताव एप्रिल महिन्यात पाठविले असूनही पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने त्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविले नाहीत. त्यामुळे शाळांची दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यामुळे याचे पडसाद आज, शुक्रवारच्या सभेत उमटले. सभापती टिपुगडे यांनी या प्रकरणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी येत्या चार दिवसांत शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करून पाठवावेत, अशी सक्त ताकीदच अधिकाऱ्यांना दिली.तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न अर्जुन पाटील यांनी उपस्थित केला. अतिरिक्त शिक्षकांना तालुक्यातच ठेवा. कारण येत्या काही महिन्यांत अनेक शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. त्यावेळी जिल्हा परिषदेकडे शिक्षक मागायची वेळ यायला नको. गटशिक्षण अधिकारी आर. जी. चौगले यांनी तालुक्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावेत. सभागृह त्यांच्या पाठीशी असेल, असे तानाजी आंग्रे म्हणाले. योग्य निर्णय घेऊन शिक्षण विभागाचे काम चांगल्या प्रकारे केले जाईल, असे आश्वासन यावेळी गटशिक्षण अधिकारी आर. जी. चौगले यांनी दिले. तालुक्यातील ८० टक्के अंगणवाड्यामधील इमारतीचा स्लॅब गळत असून, त्याची दुरुस्ती करावी. तसेच पाचगावमधील काही कॉलनीतील पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी स्मिता गवळी यांनी केली. या प्रश्नावर प्रत्येक सदस्याला शाळा, अंगणवाडी व दवाखाना दुरुस्ती यांसाठी ऐच्छिक निधी म्हणून २५ हजार रुपये दिले जातील, असे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.मजुरांची उपलब्धता केल्यास मनरेगाची कामे त्वरित सुरू केली जातील, असे जिल्हा तक्रार निवारणचे अधिकारी डी. एस. पाटील यांनी स्पष्ट केले.