शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

३० गावांना हवेत ‘पोलीसपाटील’

By admin | Updated: December 26, 2014 00:52 IST

आजरा तालुका : प्रतिष्ठेची ‘पाटीलकी’ रिक्तच

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा तालुक्यातील तब्बल ३० गावांतील पोलीसपाटलांची पदे रिक्त असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, एखादी अपघाती घटना घडल्यास पोलीसपाटलांऐवजी स्थानिक मंडळीच पोलीसपाटलांची भूमिका बजावताना दिसतात. ग्रामीण भागातील ‘पाटील’की सांभाळण्यासाठी रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी होत आहे.आजरा तालुक्याकरिता एकूच ९४ पोलीसपाटलांची पदे मंजूर आहेत. पैकी ६४ जागांवर रितसर नेमणुका करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही ३० पदे रिक्तच आहेत. यातील काही पदे आरक्षणामुळे संबंधित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्याने पोलीसपाटील सेवानिवृत्त झाल्याने तर काहींची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने ते निलंबित झाल्याने रिक्त आहेत.दर्डेवाडी, वाटगी, लाकूडवाडी, किटवडे, सरोळी, बेलेवाडी, देवर्डे, मलिग्रे, झुलपेवाडी, चव्हाणवाडी, जेऊर, सरोळी, कागिनवाडी, साळगाव, मडिलगे, हाजगोळी, हरपवडे, पेरणोली, लाटगाव, उत्तूर, विटे, मुमेवाडी, आवंढी, एरंडोळ, भादवण, हारूर, दाभिल, मोरेवाडी, खेडे, सुळेरान या गावांमध्ये पोलीसपाटीलच नाहीत.पोलीसपाटील गावात नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारी एखादी घटना संबंधित गावात घडल्यास पोलिसांपर्यंत सदर घटनेची माहिती समजण्यास बराच वेळ जातो आणि यामुळे पोलिसी तपास, कारवाई, खबरदारीचे उपाय याबाबत आवश्यक त्या हालचाली करण्यामध्ये अनेक अडचणी येतात.गावपातळीवर अनेक दाखले हे पोलीसपाटलांकडून दिले जातात. गावात पोलीसपाटीलच नसल्याने ग्रामस्थांनाही स्थानिक पातळीवर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. देवर्डे, मडिलगे, सुळेरान या गावांना पोलीसपाटीलही नाही आणि ग्रामसेवकही नाही, अशी विचित्र परिस्थिती आहे.मूळ ‘देसाई’ जगले ‘पाटील’ म्हणूनचआजऱ्याचे ज्येष्ठ नेते कै. बळिरामजी देसाई यांनी अनेक वर्षे आजऱ्याची पोलीसपाटीलकी सांभाळली. यामुळे संपूर्ण तालुका त्यांना बळिराम पाटील या नावाने ओळखत असे. त्यांना स्वत:लाही या ‘पाटीलकी’चा अभिमान होता. याची जाहीररित्या ते कबुलीही देत.त्यांची ओळख ‘पाटील’ म्हणूनचग्रामीण भागामध्ये पोलीसपाटील हे पद प्रतिष्ठेचे समजले जाते. पोलीस आणि पाटील हे दोन्हीही वजनदार शब्द पोलीसपाटील या पदात असल्याने आडनाव काहीही असले तरी नकळतपणे अनेक पोलीसपाटलांना ‘पाटील’ या नावाने संबोधले जाते.