शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

जिल्ह्यात ३० लाख लोकांना मिळाले मोफत धान्य, पुढे काय - कोल्हापूर जिल्हा : योजना बनली गरिबांसाठी आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST

कोरोना संकटाने नागरिकांना सहा महिने घरी बसून राहायला लावले. गेले दोन महिने अनलॉक झाले असले तरी आर्थिक अडचणींचा फटका ...

कोरोना संकटाने नागरिकांना सहा महिने घरी बसून राहायला लावले. गेले दोन महिने अनलॉक झाले असले तरी आर्थिक अडचणींचा फटका इतका मोठा आहे की, अजूनही काही व्यवसाय बंद आहेत. काहींनी गती घेतलेली नाही. अनेकजण बेरोजगार झाले. या कठीण काळात केंद्र शासनाने सुरू केलेल्या मोफत धान्य योजनेने गरीब, गरजू कुटुंबांना उपाशी राहू दिले नाही. नागरिकांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होऊ नये यासाठी रेशनवर मोफत धान्य वितरणास सुुरुवात केली. पहिले दोन-तीन महिने केवळ तांदूळ आणि त्यानंतर गहू व शेवटच्या टप्प्यात डाळही मोफत देण्यास सुरुवात केली. याशिवाय कार्डावर तांदूळ तीन रुपये आणि गहू दोन रुपये किलोने मिळतच होते. अशारीतीने माणसी दहा किलो धान्य एप्रिल ते नोव्हेेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत मिळत होते. त्यामुळे हातावरचे पोट असलेल्या कुटुंबांना फार मोठा दिलासा मिळाला.

---

तालुकानिहाय मिळालेले धान्य (मेट्रिक टनमध्ये)

तालुका कार्डांची संख्या तांदूळ गहू डाळ

आजरा : १ लाख ६५ हजार २२० : १ हजार ९९२ : २२ हजार ३४ : २० हजार ८३३

भुदरगड : २ लाख १ हजार ७५९ : २ हजार ४८५ : २६ हजार ८४६ : २५ हजार ५०९

चंदगड : २ लाख ३१ हजार १७७ : २ हजार ८४७ : ३० हजार ८३७ : २९ हजार १४१

गडहिंग्लज : २ लाख ७१ हजार १८० : ३ हाजर १६३ : ३६ हजार ४२ : ३४ हजार १६२

गगनबावडा : ३८ हजार १०७ : ४८० : ५ हजार ९० : ४ हजार ८०१

हातकणंगले : ५ लाख ३१ हजार ८९५ : ७ हजार १८३ : ७१ हजार २९० : ६७ हजार २९०

इचलकरंजी शहर : २ लाख ७२ हजार १७० : ३ हजार ४६० : ३६ हजार ४४६ : ३४ हजार ३१८

कागल : ३ लाख २४ हजार ४५६ : ४ हजार १५८ : ४३ हजार ३०७ : ४० हजार ९८१

करवीर : ५ लाख ७२ हजार ६९७ : ७ हजार २९९ : ७६ हजार ६५८ : ७२ हजार २६५

कोल्हापूर शहर :) ५ लाख ७० हजार १६७ : ६ हजार ५३४ : ७७ हजार १३१ : ७१ हजार २०२

पन्हाळा : ३ लाख ३७ हजार ४३ : ४ हजार ३५३ : ४५ हजार ३४६ : ४२ हजार ४११

राधानगरी : २ लाख ६८ हजार ६९९ : ३ हजार ५२१ : ३६ हजार ५७ : ३३ हजार ९०१

शाहूवाडी : २ लाख २६ हजार ७५२ : २ हजार ८६२ : ३० हजार १९९ : २८ हजार ६०२

शिरोळ : ४ लाख ८० हजार ५७ : ६ हजार १३७ : ६४ हजार ७ : ६० हजार ७५२

एकूण : ४४ लाख ९१ हजार ३७९ : ५६ हजार ४७९ :६ लाख १ हजार २९६ : ५ लाख ६६ हजार १७६

-----

गाडी बंद पडली, धान्यावरच चरितार्थ

माझी रमणमळा परिसरात चहाची गाडी होती. कोरोनामुळे गाडी बंद झाली. या कठीण काळात मोफत धान्यामुळे माझ्या कुटुंबाची उपासमार झाली नाही. अजूनही माझ्या हाताला काम नाही. त्यामुळे पुढे आणखी काही महिने मोफत धान्य मिळाले असते तर बरं झालं असतं.

शंकर काटाळे (कळंबा)

---

मी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो. कोरोनापासून हा व्यवसाय बंद आहे. माझ्यासोबत अनेक कामगार काम करतात. मोफत धान्यामुळे इतके दिवस रोजीरोटीचा प्रश्न आला नाही; पण अजूनही व्यवसाय पूर्णत: सुुरू झालेला नाही. पुढील काळाची चिंता आहे.

संदीप जाधव (कोल्हापूर)

--

कोरोनाकाळात रोजगार नव्हता, मोफत धान्य योजनेमुळे हातावरचे पोट असलेले मजूर, शेतकरी, कामगार यांच्या अन्नाची भ्रांत थांबली. लाभार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली नाही. ऑनलाईन प्रणालीमुळे आम्ही प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचवू शकलो.

दत्तात्रय कवितके (जिल्हा पुरवठा अधिकारी)

---